Thursday, May 14

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ghuman Yatra : महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये ऋणानुबंध निर्माण करणारी एकमेव चळवळ : ‘घुमान यात्रा‘ -NNL

Ghuman Yatra : महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये ऋणानुबंध निर्माण करणारी एकमेव चळवळ : ‘घुमान यात्रा‘ -NNL

नांदेड, लेख
महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्याचे अनोखे नाते आहे. राष्ट्र बलिदानाची आणि शेतीनिष्ठ परिश्रमाची पंजाब राज्याची खासियत तंतोतंत महाराष्ट्राशी जुळणारी आहे. या दोन्हीही राज्याच्या ऐतिहासिक संघर्षाची गाथासुध्दा खुपच प्रेरणादायी आहे. त्या सोबतच महाराष्ट्रात धर्मसुधारणेची चळवळ राबविणारे संत नामदेव यांच्या कार्याचा महिमा हा पंजाब आणि महाराष्ट्र राज्यांना जोडणारा आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पंजाब पर्यंत गेलेल्या संत नामदेवांच्या सातशे वर्षापुर्वी सुरू केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या चळवळीला पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न दरवर्षी न चुकता होतो ती म्हणजे नानक साई फाऊंडेशनची 'घुमान यात्रा' होय. जेष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन श्री पंढरीनाथ बोकारे यांच्या कल्पनेतुन घुमान यात्रेचे गेल्या १० वर्षांपासून सातत्याने नियोजन होत असते. खर म्हणजे महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातले सांस्कृ...
Why is it so sour when the safe is shaking? तिजोरीत खडखडात असतांना उगाच खटाटोप कशाला? -NNL

Why is it so sour when the safe is shaking? तिजोरीत खडखडात असतांना उगाच खटाटोप कशाला? -NNL

लेख, नांदेड
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड, यांच्या वतीने योजना माहिती केंद्र सर्व शासकीय कार्यालयात राबविण्यात येत आहेत, परंतु लोकांना माहित असलेल्या व कार्यान्वित असलेल्या विविध योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही हे वास्तव परिस्थिती आहे. याकडे शासन आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. संजय गांधी निराधार योजना, रमाई आवास योजना,भारतरत्न,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,श्रावणबाळ योजनासह विविध योजना आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाहीत दोन दोन महिने उशीरा मिळतात, सोईनुसार विधवा, परितकत्या महिलांची नावे पात्र केली जातात किंबहुना पीडित महिलांचा अवमान केला जातो. गरजू व बेघर व्यक्तींना रमाई आवास योजनेचा लाभ वेळेवर दिला जात नाही. त्यांना आंदोलन किंवा उपोषण करण्याची वेळ येते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा निधी विध्यार्थ्यांना त्यांच्या श...
Why is 52 percent OBC deprived in India? 52 टक्के ओबीसी भारतात वंचित का आहे ? -NNL

Why is 52 percent OBC deprived in India? 52 टक्के ओबीसी भारतात वंचित का आहे ? -NNL

नांदेड, लेख
देशात संख्येने सर्वाधिक असलेला ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय समाज आज सर्व क्षेत्रात वंचित का आहे ? "जिस की जितनी संख्या भारी, उस की उतनी भागीदारी !" असा नारा बहुजन नायक मान्यवर कांशीराम जी यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात या नाऱ्याची अंमलबजावणी का केली जात नाही ? याचे उत्तर सोपे आहे, "जिस का शासन होता है, उस का शोषण नही होता है." संख्येने सर्वाधिक असलेल्या ओबीसीने आपले शासन आणून आपले प्रश्न आपण स्वतः सोडवावेत हे साधे सुत्र आहे पण नेमके तेच ओबीसीला जमेनासे झाले आहे. ओबीसी संख्येने जास्त असला तरी तो एकसंघ नाही. विविध पक्ष, संघटना व चळवळीत ओबीसी विभागलेला आहे. आपला दोस्त कोण आणि दुष्मन कोण याची नेमकी ओळख नसल्याने तो बुचकाळ्यात पडला आहे. शिवाय धर्माच्या कचाट्यात तो स्वखुषीने भरडल्या जात आहे. सामाजिक प्रश्नांपेक्षा तो धार्मिक कर्मकांडाला जास्त महत्व देत असतो. नेमक्या याच कमजोरीचा फायदा घेत भार...
Triveni ; सामान्य माणसांच्या जगण्याची लय : त्रिवेणी – NNL

Triveni ; सामान्य माणसांच्या जगण्याची लय : त्रिवेणी – NNL

नांदेड, लेख
दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या 'त्रिवेणी' या कवितासंग्रहाचे प्रकाशन नांदेड येथे होत आहे. यानिमित्ताने कवितासंग्रहाची ओळख करून देणारा डॉ. पृथ्वीराज तौर यांचा लेख देत आहोत. साहित्य आणि संस्कृतीच्या दृष्टीने, त्यांचे भरणपोषण व जोपासणा करण्याच्या दृष्टीने नांदेड शहर मराठवाड्यात अग्रस्थानी आहे. या शहराची स्वतःची स्वतंत्र वाङ्मयीन ओळख आहे, तिला काही शे वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे एखाद्याकडे कलेच्या क्षेत्रातील बीजभूमी असेल तर तिला येथे लगेच खतपाणी व पोषक वातावरण मिळते. नांदेडमध्ये राहून लेखन करणाऱ्या साहित्यिकांकडे व त्यांच्या व्यवसायांकडे नजर फिरवली तरी हे सहजच लक्षात येते की या शहराने कित्येकांच्या स्वप्नांना व छंदांना जपून ठेवले आहे. इतकेच नव्हे तर ही स्वप्ने साकार करण्यासाठी हातभार लावला आहे. भिन्न भिन्न व्यवसाय क्षेत्रात...
The people’s election! ; लोकांनी आपल्या हाती घेतलेली लोकनिवडणूक – NNL

The people’s election! ; लोकांनी आपल्या हाती घेतलेली लोकनिवडणूक – NNL

लेख, राजकीय
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल जाहीर झाला आणि ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली होती, अशी चर्चा रंगू लागली. भाजप आणि मित्रपक्षांच्या पराभवाची कारणमीमांसा होऊ लागली; मात्र निवडणूक निकालापूर्वीच कोण येणार आणि कुणाला घरचा रस्ता दाखवला जाणार यांचे आडाखे मोठ्या प्रमाणावर बांधले जाऊ लागले होते. मिडियाच्या एक्झिट पोलचे सगळे अंदाज फोल ठरले असले तरी पारावरच्या, चावडीवरच्या आणि चौका चौकातल्या सर्वसामान्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की लोकांनी आपले स्वतःचे एक्झिट पोल तयार केले होते. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात पूर्णांशाने लोकशाही नांदावी, तिची पाळेमुळे खोलवर रुजावीत अशी लोकशाहीप्रेमीची धारणा असते. लोकशाहीची व्याख्याही आपण तशा प्रकारचीच करतो. एकमेकांना सांगत असतो. मात्र, गेल्या काही दशकांत लोकशाहीप्रणीत आणि लोकशाहीप्रधान निवडणूक ही लोकांची राहिलेली नाही. ही खूपच गंभीर बाब आहे. येनकेन प्रकारे...
Transformation of rural areas : ग्रामीण भागाचा कायापालट करणारी महात्मा गांधी रोजगार हमी योजना -NNL

Transformation of rural areas : ग्रामीण भागाचा कायापालट करणारी महात्मा गांधी रोजगार हमी योजना -NNL

लेख
ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम देणे आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या दुहेरी उद्देशाने राज्यात 'महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना' राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून गावा गावातील सार्वजनिक विकासाची विविध कामे हाती घेतली जातात. तसेच शेतकऱ्यांना लाभ होणाऱ्या अनेक योजना या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट होत असल्याचे चित्र दिसते आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये 19 लाख 50 हजार कुटुंबातील 32 लाख 50 हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच योजनेंतर्गत 700 लाख मनुष्यदिवसांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महिलांचा 44 टक्के इतका वाटा आहे. आतापर्यंत 2 हजार 963 कोटी इतका खर्च या योजनेत झाला असून त्यापैकी 1 हजार 850 कोटी इतका ...
Teacher’s Day ; पंचवीस शाळांच्या माध्यमातून मोबाईल लायब्ररी: अनोखा सामाजिक उपक्रम – NNL

Teacher’s Day ; पंचवीस शाळांच्या माध्यमातून मोबाईल लायब्ररी: अनोखा सामाजिक उपक्रम – NNL

लेख, नांदेड
धरणगुत्ती येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील या शिक्षक दांपत्याने आपला मुलगा चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील याच्या सहयोगाने मागील अनेक वर्षांपासून आपल्या परिसरात जास्तीत जास्त मुलांनी वाचलं पाहिजे या उदात्त हेतूने एक सामाजिक दायित्व या भावनेने निरपेक्षपणे कार्य करीत आहेत. लेखकाची संवेदनशीलता समाजाचे प्रश्न मांडते आणि ते सोडवण्यासाठीसुद्धा पुढाकार घेते हे पाटील परिवाराने आपल्या प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिले आहे. ग्रामीण भागातील, खाजगी शाळा, जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या सुमारे पंचवीस पेक्षा अधिक शाळांना मोठ्या प्रमाणात ग्रंथ देणगी स्वरुपात देऊन त्या - त्या शाळांच्या माध्यमातून लहान - लहान ग्रंथालयांची निर्मिती केली आहे. प्रत्येक शनिवारी मुले या ग्रंथालयातील आपल्या आवडीची पुस्तके घरी घेऊन जातात. एकदा निवडलेले पुस्तक सदर वि...
gopalkala; गोपाळकाला – NNL

gopalkala; गोपाळकाला – NNL

लेख
गोपाळकाला म्हटले की, उंचच्या उंच हंड्या आणि त्या फोडण्यासाठी जिवाचे रान करणारे तरुण डोळ्यांसमोर येतात; मात्र गोपाळकाला या सणाला आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी असून ते शास्त्र लक्षात घेऊन साजरा केल्याने जिवाला त्याची अनुभूती घेता येते. गोपाळकाल्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि त्याचे लाभ यांविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया. 1. ‘गोपाळकाला’चा अर्थ अ. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला आणि सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. आ. गोपाळकाला म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा अधिकाधिक प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा आणि पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समूच्चय. ‘काला’ हा शब्द एकसंध आणि वेगात सातत्य...
Nanded MP Vasantrao Chavan : प्रतिकूल परिस्थितीत निवडणुका जिंकणारा नेता गेला -NNL

Nanded MP Vasantrao Chavan : प्रतिकूल परिस्थितीत निवडणुका जिंकणारा नेता गेला -NNL

नांदेड, लेख
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन अनपेक्षित नसले तरी दुःखदायक निश्चित आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील एक मृदुभाषी, सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न राजकारणी आपल्यातून गेला आहे. नांदेड जिल्ह्यातील जी राजकारणातील परंपरागत घराणी आहेत त्यातील बळवंतराव चव्हाणांच्या घराण्याचे प्रतिनिधीत्व करणारे वसंतराव सत्तेच्या परिघात वावरत असतानाही कधी घमेंडी झाले नाही की कधी त्यांनी उद्धटपणा दाखविला नाही. ज्या काळात त्यांची पक्षाला अत्यंत गरज होती त्या काळात त्यांना नियतीने हिरावून नेले हे अत्यंत दुर्देवी आहे. नायगाव सारख्या अत्यंत ग्रामीण भागात आपली राजकीय कारकिर्द सुरु करणारे वसंतराव सलग २४ वर्षे नायगावचे सरपंच होते. बळवंतराव चव्हाण आमदार असल्याने राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले. परंतु केवळ राजकीय वारसाच्या बळावर त्यांनी आपली कारकिर्द पुढे नेली नाही तर जनसामान्यात वावरत असताना लोकांच्या क...
Baswantrao Mundkar : स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या अविस्मरणीय गोष्टी- इनामदार -NNL

Baswantrao Mundkar : स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या अविस्मरणीय गोष्टी- इनामदार -NNL

नांदेड, लेख
स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या विषयीच्या अनेक गोष्टी आहेत. त्या विसरण्यासारख्या नाहीतच. जपून ठेवलेले आहेत.अविस्मरणीय आहेत. त्यातील दोन- तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. 1952 - 53 ची गोष्ट मी त्यावेळी इयत्ता चौथीला होतो. खेडेगावातील शाळा संपवून मी बिलोलीच्या शाळेत दाखल झालो. खेडेगावात एकच शिक्षक सर्व शाळा सांभाळत असे मात्र बिलोली च्या शाळेत तासा तासाला शिक्षक होते. धैर्याचे बिजारोपण - कै. बसवंतराव इयत्ता चौथीत असताना भाषण स्पर्धा ठेवण्यात आली होती. याबाबत शाळेची नोटीस आली यात विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घ्यावा. मी पहिल्यांदा आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी केलो. दर शनिवारी आमचे मुख्याध्यापक भाषण स्पर्धा ठेवत .त्यात विषयाच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाजू मांडायची असे. शनिवार आला ठरल्याप्रमाणे म्हाळप्पाच्या घरा पाठीमागील जागेत सर्व विद्यार्थी एकत्र झालो. संपूर्ण शाळेवर स्वर्ग...
error: Content is protected !!