Indian Freedom Movement ; भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात दलित महिला वीरांगणांचे योगदान – NNL
भारतीय स्वातंत्र्य आंदोलन जरी 1857 ला सर्वप्रथम राष्ट्रीय उठावाच्या माध्यमातून आणि महात्मा गांधींजी यांच्या नेतृत्वाखाली गो- बॅक ब्रिटीश, इंग्रज चले जाव आदी आंदोलने प्रखरतेने झाले. सदरील आंदोलनात क्रांतीकारकांच्या आवाहनावरुन अनेक दलित महिलांनी राष्ट्रीय उठावाच्या प्रदर्शनामध्ये स्वातंत्र्य आंदोलनात उत्स्फुर्तपणे सक्रियतेने योगदान दिले आहे. विशेषतः दलित महिलांचे योगदान विशेष नोंद घेण्यासारखी बाब आहे. इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणे आहेत. दलित आणि शोषित समाजाच्या महिलांनी आपापल्या परीने गाव, मोहल्ला, शहर, महानगर आदी ठिकाणी ब्रिटीशांना अतिशय प्रखरतेने विरोध दर्शवला.
डब्ल्यू गार्डन अलेक्झांडरने सिकंदरबागच्या किल्ल्यावरुन काही दलित मर्दानी महिलांना स्वातंत्र्य आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तत्कालीन 1857 च्या राष्ट्रीय उठाव...









