Thursday, May 14

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Indian Freedom Movement ; भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात दलित महिला वीरांगणांचे योगदान – NNL

Indian Freedom Movement ; भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात दलित महिला वीरांगणांचे योगदान – NNL

लेख
भारतीय स्वातंत्र्य आंदोलन जरी 1857 ला सर्वप्रथम राष्ट्रीय उठावाच्या माध्यमातून आणि महात्मा गांधींजी यांच्या नेतृत्वाखाली गो- बॅक ब्रिटीश, इंग्रज चले जाव आदी आंदोलने प्रखरतेने झाले. सदरील आंदोलनात क्रांतीकारकांच्या आवाहनावरुन अनेक दलित महिलांनी राष्ट्रीय उठावाच्या प्रदर्शनामध्ये स्वातंत्र्य आंदोलनात उत्स्फुर्तपणे सक्रियतेने योगदान दिले आहे. विशेषतः दलित महिलांचे योगदान विशेष नोंद घेण्यासारखी बाब आहे. इतिहासामध्ये असे अनेक उदाहरणे आहेत. दलित आणि शोषित समाजाच्या महिलांनी आपापल्या परीने गाव, मोहल्ला, शहर, महानगर आदी ठिकाणी ब्रिटीशांना अतिशय प्रखरतेने विरोध दर्शवला. डब्ल्यू गार्डन अलेक्झांडरने सिकंदरबागच्या किल्ल्यावरुन काही दलित मर्दानी महिलांना स्वातंत्र्य आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तत्कालीन 1857 च्या राष्ट्रीय उठाव...
15th August Independence Day : 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस; लेखिका….वर्षा संजय जमदाडे -NNL

15th August Independence Day : 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस; लेखिका….वर्षा संजय जमदाडे -NNL

नांदेड, लेख
"जिथे भाव आहे, ताल आहे, राग आहे अशी माझी भारतमाता" आज "15 ऑगस्ट" आपल्या भारत मातेला प्रथम आपण वंदन करूयात. आपल्या जीवनामध्ये पाच माता खुप महत्त्वाच्या आहेत. 1) भारतमाता 2) भुमाता 3) गोमाता 4) गंगा माता 5) जन्म देणारी आपली आई या पाच मातांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. ते आपण कसेहि फेडू शकत नाही. या माता खुप खुप महान आहेत. यांचे वर्णन आणि स्तुती करण्यास हो आपण साधारण माणसे कमी पडतो या मातांना आपण वंदन आणि कोटी कोटी प्रणाम करूयात. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खुप आनंदाचा, हर्षाचा, उल्हासाचा मोठा सण आहे "15 ऑगस्ट" हा दिवस आपल्या राष्ट्राचा भाग्योदय आणि समाजाला अभय प्राप्त करून देणारा दिवस आहे. कितीतरी मानवपुष्प हसत हसत समर्पित झाले आपल्या या भारत भुमीला स्वतंत्र करण्यासाठी आणि म्हणूनच "15 ऑगस्ट" ची पहाट हि स्वतंत्रता दिवसाची पहाट म्हणून उदयास आली आपली भारत माता गुलामगिरीतून स्वतंत्र झाली. तो ह...
Mukhya Mantri Annapurna Yojana : महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” -NNL

Mukhya Mantri Annapurna Yojana : महिलांच्या आरोग्य सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” -NNL

नांदेड, लेख
फार पूर्वीपासून चुलीवर स्वयंपाक करण्याची पध्दत होती व अजूनही काही ठिकाणी आहे. यासाठी जंगलातील, रानातील लाकूड-फाटा गोळा करुन किंवा वृक्षतोड करुन इंधनाची व्यवस्था केली जाते. यातून महिलांना धुरांचा खूप त्रास होवून अनेक आरोग्याबाबतच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व समस्यांपासून महिलांची सुटका व्हावी. तसेच इंधनासाठी त्यांना वणवण भटकावे लागू नये यासाठी शासनाने यापूर्वीही अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा होऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 पासून सुरु केली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील पात्र कुटूंबाना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्याच्या सहकार्याने सुरू आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत गॅस जोडणी घेतलेले तसेच, या योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभा...
sap-sucking worms and pink bollworms ; असे रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे करा व्यवस्थापन… – NNL

sap-sucking worms and pink bollworms ; असे रस शोषक कीडी व गुलाबी बोंड अळीचे करा व्यवस्थापन… – NNL

लेख
कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडीचा प्रादूर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादूर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो तर तूडतुड्यांचा प्रादूर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकीड्यांचा ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून आढळून येतो. तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसुन येतो. वरील सर्व प्रकारच्या किडीमुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊ शकते. सुरुवातीपासुनच या किडींचे व्यवस्थापन केल्यास हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. त्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब करावा. एकात्मिक व्यवस्थापन: रस शोषक कीडींचे व्यवस्थापन - बीटी कपाशीच्या बियाण्याला इमिडाक्लोप्रीड किंवा थायमिथोक्झाम किटकनाशकांची बीजप्रक्रीया केलेली असते. त्यामुळे रस शोषक किडींपासून सर्वसाधारण २ ते ३ आठवड्यापर्यंत प...
Khudiram Bose : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून देणारा तरुण क्रांतीकारक – खुदीराम बोस -NNL

Khudiram Bose : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून देणारा तरुण क्रांतीकारक – खुदीराम बोस -NNL

लेख
खुदीराम बोस ! भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर. हिंदुस्थानवर जुलमी सत्ता गाजवणार्‍या ब्रिटीश साम्राज्यावर ज्यांनी अलौकिक धैर्याने पहिला बॉम्ब फेकला, शालेय जीवनातच वन्दे मातरम् या पवित्र मंत्राने भारावून ज्यांनी भारतभूच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले त्या खुदीराम बोस यांचा 11 ऑगस्ट या दिवशी बलिदानदिन साजरा केला जातो. 11 ऑगस्ट 1908 या दिवशी वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी हातात भगवद्गीता घेऊन खुदीराम बोस यांनी फाशीच्या खांबाला आलिंगन दिले. 1. खुदीराम बोसने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करणे ! काळ होता 1903 चा ! बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने निश्‍चित केले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला. देशासाठी काहीतरी करावे, असे सारखे वाटू लागल्याने मेदिनीपूर येथे थोडेफ...
freedom struggle ; भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रीयांचे योगदान – NNL

freedom struggle ; भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रीयांचे योगदान – NNL

लेख
भारतीय स्वातंत्र्य लढा हा केवळ पुरुषांचाच नव्हे तर स्त्रियांचाही मोठा संघर्ष होता. समाजाच्या बंधनांना आणि रूढींना आव्हान देत, अनेक स्त्रिया या लढ्यात सहभागी झाल्या आणि त्यांनी देशासाठी मोठे बलिदान दिले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विचार केला तर भारतातील महिला स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बेगम हजरत महल या पहिल्या भारतीय महिला होत्या ज्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या. त्यांनी स्वांतंत्र्यलढ्यातील १८५७ च्या उठावात सक्रिय सहभाग घेतला. स्वतंत्र भारताच्या लढ्यात महिलांचे योगदान दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. अनेक धाडसी महिलांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध आवाज उठवला. अनेक महिलांनी रस्त्यावर उतरून मिरवणुका काढल्या आणि व्याख्याने आणि निदर्शने केली. या महिलांमध्ये प्रचंड धाडस आणि प्रखर देशभक्ती होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्त्रियांच्या यो...
Significance of Nagpanchami and how to worship the serpent deity? : नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ? – NNL

Significance of Nagpanchami and how to worship the serpent deity? : नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ? – NNL

नांदेड, लेख
श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा ! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा’, यासाठी प्रतीवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते. या वर्षी 9 ऑगस्ट या दिवशी नागपंचमी आहे. या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात, तर काही ठिकाणी वारूळाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य मानले जाते. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात नागपंचमीचा इतिहास आणि महत्त्व पाहणार आहोत. 1. नागपंचमीचा इतिहास : सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, अस...
How to do ‘Mangalagouri Vrat’ :‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?….NNL

How to do ‘Mangalagouri Vrat’ :‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?….NNL

नांदेड, लेख
मंगळागौरीचे व्रत : ‘श्रावण मासात अनेक स्त्रिया ‘मंगळागौरीचे’ व्रत करतात. नववधू हे व्रत ‘सौभाग्य आणि पतीला चांगले आयुष्य लाभावे अन् पुत्रप्राप्ती व्हावी’, यांसाठी करतात. श्रावण मासातील मंगळवारी हे व्रत केले जाते. (या वर्षी ०५.८.२०२४ या दिवसापासून ‘श्रावण’ मास चालू होत आहे. ०६.८.२०२४ या दिवशी पहिला मंगळवार आहे.) अनेक ठिकाणी सभागृह घेऊन हे व्रत करण्याचे आयोजन केले जाते. ‘मंगळागौरी’चे हे व्रत आठ किंवा पाच वर्षांच्या कालावधीचे असते. सांप्रत काळात महिला पाच वर्षे हे व्रत करतात. 1 अ. देवीचे पूजन अ १. षोडशोपचार पूजन : ज्यांना देवीची ‘षोडशोपचार’ पूजा करणे शक्य आहे, त्यांनी देवीची षोडशोपचार पूजा करावी. शेवटी ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम: ।’ हा नाममंत्र म्हणत उपचार अर्पण करावे. अ २. पंचोपचार पूजन : ज्यांना षोडशोपचार पूजा करणे शक्य नाही, त्यांनी देवीची ‘पंचोपचार’ (गंध, हळद-कुंकू, पुष्प, धूप, दीप आण...
The only standing statue of Shri Parameshwara in Harihara avatar in India : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव – NNL

The only standing statue of Shri Parameshwara in Harihara avatar in India : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव – NNL

लेख, नांदेड
हिमायतनगर (वाढोणा} नगरीतील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर सातशे 12 वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. या मंदिराचा इतिहास अतिप्राचीण असुन, हेमाडपंथी उत्तराभीमुख मंदिरातील गाभा-यात शिवशंकर - विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्री ची उभी मुर्ती आहे. अत्यंत देखणी व सर्वांग सुंदर अशी श्री परमेश्वराची मुर्ती काळ्या पाशानात घडवीलेली असुन, परम अधिक इश्वर म्हणजेच परमेश्वर हे देवाधीदेव आहेत. या मुर्तीचे वर्णन किंवा या मुर्तीशी अन्य देवतांच्या मुर्तीशी साम्य असणारे वर्णण आढळुन येत नाही. त्यामुळे हि मुर्ती भारतात एकमेव मुर्ती आहे, असे म्हणता येईल. भक्तांच्या नवसाला पावणारा देव म्हणुन विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश व ईतर भागात ख्यातीप्राप्त झाला असुन, या मंदिराशी तसेच जनतेशी भावनीक नाळ जुळालेली आहे. म्हणुन महाशीवरात्रीआणि श्रावण महिन्य...
Shravani Monday and Shivamuth (Shivmushtivrat) : श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत) -NNL

Shravani Monday and Shivamuth (Shivmushtivrat) : श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत) -NNL

लेख, नांदेड
प्रस्तावना - हिंदू धर्म शास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर (म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीनंतर) येणारा पहिला मास हा श्रावण मास होय. रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रत वैकल्ये सुरु होतात. या मासाला पवित्र मास म्हणतात. या मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचे व्रत अशी अनेक व्रते केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी 'श्रावणी सोमवार' हे व्रत केले जाते. या वर्षी हे व्रत 5,12,19,26 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर या दिवशी असणार आहे. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालणे,पूजा करणे, शिवामूठ वाहणे अश्या प्रकारे हे व्रत केले जाते. प्रस्तुत लेखातून 'श्रावणी सोमवार' हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी विवेचन करण्यात आले आहे. सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्या प्रमाणे आणि रूढी परंपरेनुसार सुरु असता...
error: Content is protected !!