Sunday, May 17

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Amit Deshmukh : विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा सरकारच्या कारभारावर घणाघात

Amit Deshmukh : विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा सरकारच्या कारभारावर घणाघात

मुंबई, राजकीय, लातूर
मुंबई| महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे या परिस्थितीत कसे जगावे हा शेतकरी आणि सामान्य माणसांसमोर प्रश्न पडला आहे असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख (Former minister MLA Amit Deshmukh attacks government's governance in the Assembly) यांनी विधानसभेत बोलताना म्हटले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबई येथे सुरू आहे, पवनचक्की बसवणाऱ्या कंपनीकडून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना मारहाण होत असून, पोलीस अधिकारीही शेतकऱ्याऐवजी कंपनीच्या लोकांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आज विधानसभेत उपस्थित झाली तेव्हा शासनाकडे यासंबंधीची कसलीच माहिती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. या संदर्भाने सुरू असलेल्या चर्चेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सहभाग घेतला. पवनचक्की बसवणाऱ्या कंपनीकडून महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अडवणूक होतेय, पिळवणूक ह...
Warkari Mahaadhiveshan : एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

Warkari Mahaadhiveshan : एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

मुंबई, धार्मिक, नांदेड
पंढरपूर| प्रतिवर्षी लक्षावधी वारकरी आषाढी, कार्तिकीच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. ‘लोचनात त्रिभुवन अवघे लेकरांस गवसुन जाय माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय’, असे म्हणत वारकर्‍यांच्या दिंड्या पंढरपूर येथे विसावत आहेत. वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. गेली अनेक शतके वारकरी संप्रदाय नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आला आहे. आजच्या काळातही धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांच्या हितासाठी वारकरी समाज अग्रभागी आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असूनही अद्याप पंढरपूर आणि आळंदी येथील तीर्थक्षेत्रांना म्हणाव्या अशा सुविधा नाहीत. याचसमवेत आळंदी येथे प्रस्तावित असलेला कत्तलखाना, वारीत होणारी घुसखोरी, संतांच्या श्‍लोकांचा चुकीचा अर्थ लावून लोकांची दिशाभूल करणे यांसह अन्य प्रश्‍नांचा वाच...
Wari Bhakti : श्रद्धेच्या नावाखाली विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न ! वारी भक्तीची नास्तिकतावादाची नाही !

Wari Bhakti : श्रद्धेच्या नावाखाली विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न ! वारी भक्तीची नास्तिकतावादाची नाही !

लेख, मुंबई
प्रस्तावना - २ जुलैला महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेच्या सचिव व प्रवक्ता आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये अर्बन नक्षल्यांचा शिरकाव झाल्याची वस्तूस्थिती सदनासमोर मांडली आणि याची चौकशी करण्याची मागणी केली. डॉ. कायंदे यांनी ढोंगी पुरोगाम्यांचा बुरखाफाड केल्याने आता संविधानाच्या आडून स्वतःचा बचाव करण्याचा पवित्रा या लोकांनी घेतला आहे. डॉ. कायंदे यांनी जो आक्षेप घेतला आहे, तो संविधानाचे नाव पुढे करून या लोकांकडून केल्या जाणाऱ्या हिंदुद्रोहाविषयी आहे.  भारतीय संविधान सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते, परंतु याचा अर्थ असा नाही की, वारीचा वापर नास्तिकतेच्या प्रसारासाठी करण्यात येईल.  जर संविधान दिंडी खरंच सर्वसमावेशकता मांडते, तर ती फक्त वारीमध्येच का ? मातम, मोहरमला किंवा ख्रिस्ती नववर्षाच्या संध्येला का नसावी? हा दुजाभाव का ? ही चळवळ वारीसारख्या धार्मिक यात्रांचा ...
Revenue Minister Bawankule : नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार – महसूलमंत्री बावनकुळे

Revenue Minister Bawankule : नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार – महसूलमंत्री बावनकुळे

मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यात नोंदणी आणि मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी जमा होणारा "एक टक्का निधी" थेट आणि तात्काळ संबंधित संस्थांना मिळावा यासाठी सरकार लवकरच नवीन कार्यपद्धती तयार करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. विधानसभेत आमदार रणधीर सावरकर यांनी अकोल्यातील स्थानिक संस्थेला मिळालेल्या निधीबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तरात महसूलमंत्री म्हणाले , “अकोल्यात सुमारे ३५ कोटी रुपये या स्वरूपात थकित आहेत. संपूर्ण राज्यात पाहता ही थकित रक्कम तब्बल ७९०० कोटी रुपयांवर आहे. आजच्या स्थितीत, मुद्रांक शुल्क शासनाच्या खात्यात जमा होते. त्यानंतरच अर्थसंकल्पात तरतूद होऊनच संबंधित संस्थांना निधी वितरीत होतो. त्यामुळे अनेकदा ३-५ वर्षे निधी वितरित होत नाही. यावर उपाय म्हणून, ज्या दिवशी मुद्रांक नोंदणी होते, त्याच दिवशी १% ...
Revenue Minister Bawankule : दिव्यांगांच्या प्रश्नावर सहा मंत्र्यांची चर्चा; महसूलमंत्री बावनकुळे यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा

Revenue Minister Bawankule : दिव्यांगांच्या प्रश्नावर सहा मंत्र्यांची चर्चा; महसूलमंत्री बावनकुळे यांच्या मध्यस्थीने यशस्वी तोडगा

कृषी, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, मुंबई, हिंगोली
मुंबई| राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, ग्रामपंचायत कर्मचारी व दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक तोडगा अखेर आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या तातडीच्या मध्यस्थीमुळे निघाला. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात आयोजित विविध विभागांच्या मंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या बैठकीस कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, पणन मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विभागांमधील समन्वय घडवून आणत काही प्रश्नांवर थे...
Devendra Fadnavis : पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन – मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन – मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

क्राईम, नांदेड, मुंबई
मुंबई| युवकांमधील अंमली पदार्थांच्या व्यवसनाधिनतेला रोखण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अमली पदार्थ आढळल्यास टेस्टिंगपासून पुढील कायदेशीर कारवाईपर्यंतची यंत्रणा उभी करण्यात आली आहे. (Separate anti-narcotics unit set up in police stations - Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis) पोलीसांकडून शाळा-कॉलेज परिसरात विशेष लक्ष देण्यात येत असून मुंबईत 2000 हून अधिक पानटपऱ्यांवर कारवाई करत त्यांचे अतिक्रमण काढण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतील लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले अंमली पदार्थासंदर्भात विधानपरिषद सदस्य भाई जगताप यांनी नियम 101 अन्वये लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षेवधीत विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे, सदस्य शिवाजीराव गर्जे, संजय केनेकर, सतेज पाटील आणि संजय ख...
Barti : यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य

Barti : यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य

मुंबई, करियर
मुंबई| राज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. सन २०२४ - २५ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा २०२४ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी १० हजार रुपयांचे एकरकमी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ होती. तसेच जाहिरातीसह दिलेला अर्ज भरून ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत टपालाद्वारे 'बार्टी', पुणे कार्यालयात पाठविणे बंधनकारक आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२५ साठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीतील उमेदवारांना ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्...
Police special campaign : अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Police special campaign : अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

क्राईम, मुंबई
Police launch special campaign against schemes that lure high interest rates मुंबई| राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. याबाबत सदस्य भिमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी उपप्रश्न विचारले. मुख्यमंत्री श्रीफडणवीस म्हणाले, नागरिकांनी गुंतवणूक करताना संबंधित संस्थेकडे आवश्यक परवाने, नोंदणी व अधिकृत मंजुरी आहेत की नाही, याची खातरजमा करावी. कोणतेही अतिरिक्त लाभाचे किंवा अधिक व्याजाचे आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून दूर राहावे. अशा योजनांमार्फत फसवणुकीचे प्रकार घडू नयेत याकरिता फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट कार...
Cm Devendra Fadanvis ; दुष्काळाला भूतकाळ बनवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपा समर्पित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Cm Devendra Fadanvis ; दुष्काळाला भूतकाळ बनवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपा समर्पित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नांदेड, मुंबई, राजकीय
BJP is dedicated to making drought a thing of the past and building a developed Maharashtra - Chief Minister Devendra Fadnavis assures नांदेड । लोकसभेच्या निवडणुकीत फेक नॅरेटिव्हद्वारे जनतेची दिशाभूल करून मिळविलेले यश विधानसभेच्या निवडणुकीत थेट नॅरेटिव्हद्वारे आम्ही हिरावून घेतले आहे, पण येत्या निवडणुकांमध्ये बोलबच्चन भैरवी सुरू होईल, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचे रडगाणे सुरू होईल, पण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची ताकद कोणाकडेही नसून मुंबई महाराष्ट्राचीच आहे, अशी ग्वाही देतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताबरोबर, विकसित महाराष्ट्र हे आमचे ध्येय असून दुष्काळ हा भूतकाळ ठरावा यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पदग्रहण सोहळ्यानि...
Bjp News ; भाजपाची राष्ट्रवादाची विचारधारा सामान्य माणसांपर्यंत नेणार – भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा निर्धार

Bjp News ; भाजपाची राष्ट्रवादाची विचारधारा सामान्य माणसांपर्यंत नेणार – भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा निर्धार

नांदेड, मुंबई, राजकीय
BJP's new state president Ravindra Chavan is determined to take the ideology of nationalism of the BJP to the common people मुंबई। भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन, असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला. वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात श्री. चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते ही फार मोठी गोष्ट...
error: Content is protected !!