Sunday, May 17

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Agriculture News: शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

Agriculture News: शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

कृषी, मुंबई
Low-cost innovative technology in agriculture मुंबई| मानव विरहित शेती, ‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज व हवामान अनुकूल पीक पद्धती घेणे, काटेकोर सिंचन पद्धती विकसित करणे, जिल्हास्तरावर शेती प्रयोगशाळा उभारणे, शेतीसाठी मोबाईल व्हॅनची सोय करणे, पीक साठवणूक सुविधा वाढवणे, शेतीसाठी कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रद्यान वापरून, उत्पादन वाढवून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यावर शासनाचा भर आहे, असे मत कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे दि. १ जुलै २०२५ रोजी स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिनानिमत्ताने 'महाकृषी ए. आय. धोरण या विषयावर' कृषी विभागातर्फे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त ...
Pandharpur Wari : सावधान ! वारीची भक्तीपरंपरा विकृत केली जात आहे !

Pandharpur Wari : सावधान ! वारीची भक्तीपरंपरा विकृत केली जात आहे !

मुंबई, लेख
Beware! The devotional tradition of Wari is being distorted! पंढरपूरची वारी म्हणजे जणू विठ्ठलभक्तांचा चालता कुंभमेळाच ! शेकडो वर्षांची ही वारी परंपरा आध्यात्मिक परंपरेचे प्रतिनिधत्व करते. ही वारी एखाद्याने थोडीदेखील अनुभवली असेल, पाहिली असेल, ती व्यक्ती वारकऱ्यांचा भोळा भाव, साधेपणा, शिस्त पाहून भारावून गेल्याविना रहाणार नाही. या वारीमध्ये कुणी एकमेकांना जात विचारत नाही, प्रांत विचारत नाही, आर्थिक उत्पन्न विचारत नाही; पण सर्व जण एकमेकांशी आपुलकीच्या आणि विठ्ठलभक्तीच्या धाग्याने जोडलेले असतात. भक्तीची ही ताकद आहे; पण गेल्या काही वर्षांपासून ही वारी विकृत करण्याचा प्रयत्न चालू आहे. संविधान समतेच्या नावाखाली देवा-धर्माला (केवळ हिंदु धर्माला) शिव्या देणे, हे आयुष्याचे इतिकर्तव्य मानणारी मंडळी ‍वारीत शिरकाव करू पहात आहे. या अश्रद्ध लोकांच्या दिंडीचे नाव समता दिंडी असले, तरी त्यांचा मूळ हेतु मात...
Harshvardhan Sapkal : हिंदी सक्ती विरोधात मोठे जनआंदोलन उभे; ५ तारखेच्या मोर्चा आधीच सरकार निर्णय रद्द करेल – हर्षवर्धन सपकाळ.

Harshvardhan Sapkal : हिंदी सक्ती विरोधात मोठे जनआंदोलन उभे; ५ तारखेच्या मोर्चा आधीच सरकार निर्णय रद्द करेल – हर्षवर्धन सपकाळ.

मुंबई, राजकीय
A large public movement is being held against Hindi compulsion; the government will cancel the decision before the march मुंबई| हिंदी भाषा सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर लगेच याला विरोध करत हिंदी सक्ती करू नये अशी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली. तसेच सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले होते. हा संस्कृती रक्षणाचा लढा सर्वांनी मिळून लढला पाहिजे. आज राज्यात हिंदी सक्तीच्या विरोधात मोठे आंदोलन उभे राहिले आहे. ५ तारखेला मोर्चा निघत आहे पण मार्चाच्या आधीच हा निर्णय रद्द करण्याची वेळ सरकारवर येईल मात्र हा मोर्चा काढून मराठी संवर्धनासाठी आपण कट्टीबद्ध आहोत हा संदेश देशात पोहचला पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. मराठी भाषा केंद्र व समविचारी संस्था, राजकीय पक्ष यांच्यावतीने आझाद मैदानात हिंदी भाषेच्या सक्तीव...
CM. Devendra Fadnavis : हिंदी भाषे संदर्भातील दोन्ही शासन जीआर रद्द – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

CM. Devendra Fadnavis : हिंदी भाषे संदर्भातील दोन्ही शासन जीआर रद्द – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मुंबई, राजकीय
Both government GRs regarding Hindi language cancelled - Chief Minister Devendra Fadnavis' announcement मुंबई| पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत हिंदी भाषेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र जाधव यांचे अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून या समितीच्या अहवालानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. महायुतीचे हे चौथे अधिवेशन असून, बहुतांश भागांत पावसाचे आगमन झाले आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी कमी पाऊस ...
Raj Thackeray : मराठी एकजुटीचा धसका सरकारने घेतला – राज ठाकरें

Raj Thackeray : मराठी एकजुटीचा धसका सरकारने घेतला – राज ठाकरें

मुंबई, राजकीय
Government took a hit on Marathi unity - Raj Thackeray मुंबई| महायुतीसरकारने हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावरून विरोधकांनी प्रतिक्रिया देणे सुरू केले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या दबावामुळे मागे घेतली गेली असे म्हणत सरकारने मराठी एकजुटीचा धसका घेतला असून, हिंदी सक्तीसाठी सरकारवर नेमका कोणाचा दबाव ? होता असा सवाल राज ठाकरें यांनी विचारला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या एक्स हैण्डलवरून महायुती सरकारने हिंदी भाषेसंदर्भातील निर्णय रद्द केल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी म्हंटले कि, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घ...
Uddhav Thackeray : मोर्चा होऊ नये म्हणून शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला – उद्धव ठाकरें

Uddhav Thackeray : मोर्चा होऊ नये म्हणून शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला – उद्धव ठाकरें

मुंबई, राजकीय
Government cancelled Hindi compulsory GR to prevent march - Uddhav Thackeray मुंबई| दिनांक ०५ जुलै रोजी हिंदी सक्तीच्या विरोधात मोराचा आयोजित करण्यात आल्याने शासनाने हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत माहिती दिली आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने घेतलेल्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देत मराठी माणसाचा मोर्चा होऊ नये म्हणून शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला असल्याचे उद्धव ठाकरें यांनी म्हंटले आहे. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. परंतु आपल्या देशात भाषावार प्रांतरचना झाली. प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे, त्या प्रांताच्या अनुसार तिथल्या मातृभाषेला सर्वोच्च मान दिलाच पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात मरा...
Stop pampering Waqfs : हिंदु विधिज्ञ परिषदेची राज्य शासनाकडे तक्रार !

Stop pampering Waqfs : हिंदु विधिज्ञ परिषदेची राज्य शासनाकडे तक्रार !

मुंबई, राजकीय
मुंबई| ‘वक्फ बोर्डा’कडे नोंदणी झालेल्या वक्फच्या इमारतींवरील अतिक्रमण काढण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करण्याची मुभा काँग्रेस सरकारने दिली आहे. त्यासाठी वर्ष 2008 मध्ये ‘महाराष्ट्र शासकीय इमारती (उदकासन) कायदा (Maharashtra Government Premises (Eviction) Act, 1956)’ या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. मंदिरे आणि वक्फ हे दोन्ही धार्मिक स्थळे असूनही वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारी यंत्रणा दिली जाते; मात्र मंदिरांवरील अतिक्रमणासाठी विश्वस्तांना न्यायालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागतात. अशा प्रकारे मंदिरे आणि वक्फ बोर्ड यांसाठी वेगवेगळा कायदा आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे. वक्फ बोर्डाला जो लाभ दिला जातो, त्याप्रमाणे मंदिरालाही देण्यात यावा अन्यथा मंदिरांप्रमाणे वक्फ बोर्डाला देण्यात आलेला विशेष लाभ बंद करण्यात यावा, असे पत्र हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्...
Prepare a master plan : नांदेड शहर,परिसराचा २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करा

Prepare a master plan : नांदेड शहर,परिसराचा २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करा

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई/नांदेड| शहर व परिसराचा पुढील २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी एमएमआरडीएने नांदेड जिल्हाधिकारी, महपालिका आयुक्त आणि संबंधित यंत्रणांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. या शहराचा सुनियोजीत विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्याबाबत देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना केली. सह्याद्री अतिथीगृह येथे नांदेड शहर विकास आराखड्यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार सर्वश्री अशोक चव्हाण, अजित गोपछेडे, रविंद्र चव्हाण, आमदार सर्वश्री हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आनंद बोंडारकर, नगरविकास विबागाचे प्रधान सचिव गोविंदराज, एमएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त विक्रमकुमार आदी यावेळी उपस्थित होते. नांदेड जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. ...
Governor C. P. Radhakrishnan : भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Governor C. P. Radhakrishnan : भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण - भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते....
Five senior journalists awarded : पाच ज्येष्ठ पत्रकारांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर

Five senior journalists awarded : पाच ज्येष्ठ पत्रकारांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| शासनाच्या वतीने सन 2019, 2020, 2021, 2022 व 2023 या पाच वर्षातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सन 2019-राही भिडे, 2020-सुधीर पाठक, 2021-भाऊ तोरसेकर, 2022-विजय बाविस्कर, दै.लोकमत आणि 2023 - बाळासाहेब जाधव, दै.पुढारी यांना पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे 2019, 2020, 2021, 2022 व 2023 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पाच वर्षाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारार्थींचे नावे पुढीलप्रमाणे. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2019 अंतिम निकाल             अ.क्र. पुरस्काराचे नाव पारितोषिक विजेता नाव 1. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.संदीप...
error: Content is protected !!