Sunday, May 17

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Narhar Kurundkar : ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाला 3 कोटीचा निधी

Narhar Kurundkar : ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाला 3 कोटीचा निधी

नांदेड, मुंबई
मुंबई| लेखक, विचारवंत आणि व्याख्याते दिवंगत नरहर कुरुंदकर (senior thinker Narhar Kurundkar) यांच्या स्मारकाच्या कामासाठी दुसऱ्या टप्प्यात 3 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज विधानपरिषदेत दिली. विधान परिषदेत आज पुरवणी मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर सांस्कृतिक विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या उत्तराच्या भाषणात मंत्री शेलार यांनी प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाला 3 कोटींचा निधीची देण्यात आल्याची माहिती दिली. नरहर कुरुंदकर यांचे वाङ्मयीन योगदान मोठे असून विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ म्हणून त्यांनी केलेले काम मोठे आहे. त्यामुळे त्यांचे भव्य स्मारक नांदेड येथे उभारण्यात येत असून त्याला प्रयत्नपूर्वक दुसऱ्या टप्प्यात 3 कोटी देण्यात आल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील कोकणात असलेली कातळशिल्पे हा मोठा ऐतिहासिक ठेवा ...

Investigation ; आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी

मुंबई
मुंबई l राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून पुढील तीन महिन्यांत अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिले. आमदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, "१९७४ मध्ये लागू झालेल्या कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण करण्यात आले होते. परंतु १९७४ ते २००४ या ३० वर्षांच्या काळात जर कोणतीही जमिन बेकायदेशीररीत्या बिगर आदिवासींनी घेतली असेल, तर २०३४ पर्यंत त्या प्रकरणाची तक्रार शासनाकडे करता येऊ शकते." ४०४ जमिनी परत; २१३ प्रकरणे प्रलंबि २०२१ ते २०२३ या काळात सुमारे ६१७ जमिनीचे गैरहस्तांतरण झाल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी ४०४ जमिनी परत करण्यात आल्या असून २१३ प्रकरणे सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. संबंधित...

fragmentation law ; तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याचा निर्णय

मुंबई, कृषी
मुंबई l राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत क्रांतिकारी घोषणा केली. १ जानेवारी २०२५ पर्यंत नागरी क्षेत्रांमध्ये जे तुकडे झाले आहेत, त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार आहे. तर भविष्यात कायमस्वरुपी हा कायदा रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती ( एसओपी) ठरविली जाईल, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली. विधानसभेत आमदार अमोल खताळ यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. राज्यात अनेक भागांमध्ये महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियमामुळे (एमआरटीपी) व तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झाले असून, नागरिकांच्या मालमत्तांवर नोंदणीसह अन्य कायदेशीर प्रक्रियांना अडथळे निर्माण झाले आहेत. असा प्रश्न खताळ यांनी उपस्थित केला होता. तर...
Vande Bharat Express extended : मुंबई – जालना वंदे भारत एक्स्प्रेस हजूर साहिब नांदेड पर्यंत विस्तारीत

Vande Bharat Express extended : मुंबई – जालना वंदे भारत एक्स्प्रेस हजूर साहिब नांदेड पर्यंत विस्तारीत

नांदेड, परभणी, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| भारतीय रेल्वेचा अभिमान आणि भारताची स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन - वंदे भारत एक्सप्रेसने - (Vande Bharat Express extended) महाराष्ट्रातील मराठवाड्यातून आपला पहिला प्रवास दिनांक 30 डिसेंबर, 2023 पासून सुरु केला होता. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर, 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते. या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जालना वंदे भारत एक्स्प्रेस चा विस्तार हजूर साहिब नांदेड पर्यंत करण्यात आला आहे. या विस्तारित गाडीचे उद्घाटन दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात येणार आहे. या करिता एक उद्घाटन विशेष गाडी 26 ऑगस्ट ला चालविण्यात येईल. या उद्घाटन विशेष गाडीचे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल. या विस्तारित गाडीची नियमित सेवा दिनांक 27 ऑगस्ट प...
MLA Chikhlikar : बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी आ. चिखलीकर यांचा विधानसभेत आवाज बुलंद

MLA Chikhlikar : बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी आ. चिखलीकर यांचा विधानसभेत आवाज बुलंद

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्यात नुकत्याच खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून खरीप हंगामात बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात बियाण्याची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सरकार अर्थसहाय्य करणार का ? शिवाय शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्राच्या संचालकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार का ? (MLA Chikhlikar's voice is raised in the Legislative Assembly for farmers whose seeds have not germinated) असा प्रश्न आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज पावसाळी अधिवेशनात अत्यंत पोटतिडकीने उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देत असताना राज्याचे कृषी राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, दोषी कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. पावस...
Cemetery question : राज्यातील दफनभूमी, स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा

Cemetery question : राज्यातील दफनभूमी, स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम राबवावा

लातूर, मुंबई, राजकीय
मुंबई| मुंबईसह महाराष्ट्रात सध्या दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे असे नमूद करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील एकूण लोकसंख्या, जन्मदर, मृत्युदर आणि क्षेत्रफळ या गोष्टींचा विचार करून हा प्रश्न सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवारी विधानसभेत या विषयावरील चर्चेत सहभागी होताना केली आहे. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख या विषयावरील चर्चेत सहभागी होताना म्हणाले की, दफनभूमी तसेच स्मशानभूमी उपलब्धतेची मुंबई येथे खूपच गंभीर समस्या आहे, त्याचप्रमाणे राज्यात गावागावातही अलीकडच्या काळात या संदर्भातील अडचणी निर्माण होत आहेत, बहुतांश ठिकाणी शासनाने दफनभूमी आणि स्मशानभूमीची व्यवस्था केली आहे, काही ठिकाणी खाजगी स्वरूपाची ही व्यवस्था आहे परंतु, वेगवेगळ्या समाजाची वाढलेली लोकसंख्या, वाढलेल्या वस्त्या यामुळे अनेक ठिकाण...
Chief Minister Devendra Fadnavis : राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई| राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करणे, आदी उद्दिष्टे दिली आहेत. या उद्दिष्ट पूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या रिक्त पदांसाठी राज्य शासन 'मेगा भरती' करेल, ('Mega recruitment' soon for vacant posts in the state - Chief Minister Devendra Fadnavis) असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या भरतीबाबत सदस्य भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य डॉ. नितीन राऊत, नाना पटोले, भास्कर जाधव, सुरेश धस यांनीही उपप्रश्न उपस्थिती केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील काळात शासनाने ७५ हजार...
Mla Bondharkar’s demand : गुरुद्वारा बोर्डाच्या कायद्यातील संशोधन रद्द करा : आ.बोंढारकर यांची विधानसभेत मागणी

Mla Bondharkar’s demand : गुरुद्वारा बोर्डाच्या कायद्यातील संशोधन रद्द करा : आ.बोंढारकर यांची विधानसभेत मागणी

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड| शीख धर्मियांची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड नांदेड या संस्थेच्या कायद्यात संशोधन करून राज्य सरकारने केलेला बदल , कलम ११ तील संशोधन त्वरित मागे घ्यावे आणि मूळ तरतुदीनुसार गुरुद्वारा बोर्डाचा कारभार सुरू ठेवावा अशी मागणी आ.आनंदराव पाटील बोंढारकर यांनी आज विधानसभेत केली. महाराष्ट्र विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे . या पावसाळी अधिवेशनात आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी गुरुद्वारा बोर्डाच्या कायद्यामध्ये आणि कलमांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनावर प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये फेब्रुवारीच्या विधानसभा अधिवेशन मध्ये गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड कायदा १९५६ मधील कलम ११ आणि कलम सहा मध्ये संशोधन करून संस्थेच्या अध्यक्ष नियुक्तीचे अधिकार शासनाकडे वर्ग केले होते. पूर्वी १७ सदस्य मधून अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि सचिव यांची निवड केली...
Vitthal Rukmini : आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

Vitthal Rukmini : आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

धार्मिक, नांदेड, मुंबई
पंढरपूर| पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वा...
Nana Patole : देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत: नाना पटोले

Nana Patole : देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत: नाना पटोले

मुंबई, राजकीय
मुंबई| राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे," असे उत्तर देतात. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले, त्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतील, तर हे राज्याला भूषणावह नाही. ही सर्व परिस्थिती बिघडवण्याचे काम सरकारने केले आहे असा सरकारवर हल्लाबोल ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. विधानसभेत बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात खरीप हंगामाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. DBT च्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना प...
error: Content is protected !!