Monday, May 18

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ahmadabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या कारणांवर अंतिम अहवालानंतरच प्रकाश

Ahmadabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या कारणांवर अंतिम अहवालानंतरच प्रकाश

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड| अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघाताच्या नेमक्या कारणांवर अंतिम अहवालानंतरच प्रकाश पडेल, असे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांनी आज सांगितले. राज्यसभेत खा. अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरक प्रश्नाद्वारे अहमदाबाद-लंडन विमानाच्या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत खा. अशोक चव्हाण यांनी प्रश्न विचारला होता. विमानाचे दोन्ही इंजिने बंद होण्यामागील नेमके कारण काय आणि त्याकरिता विमान उत्पादक कंपनी, इंजिन निर्माती कंपनी किंवा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स भाग बसवणाऱ्या कंपनीला काही निर्देश देण्यात आले आहेत का, अशी विचारणा त्यांनी केली. यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू म्हणाले की, या अपघाताचा...
Ban on conversion : फाळण्या टाळण्यासाठी ‘धर्मांतरबंदी’ आवश्यक !

Ban on conversion : फाळण्या टाळण्यासाठी ‘धर्मांतरबंदी’ आवश्यक !

नांदेड, मुंबई, लेख
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी संकलित केलेला मराठी लेख .... प्रस्तावना : भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. हिंदूंसाठी भारत आणि मुसलमानांसाठी पाकिस्तान निर्माण झाला. धर्माच्या आधारावर फाळणी झाल्यानंतर खर्‍या अर्थाने हिंदूंसाठी असलेल्या भूप्रदेशात हिंदूंचे रक्षण करणे, हे सरकारचे नैतिक दायित्व आहे; पण अद्यापपर्यंत कुठल्याच सरकारने त्याकडे विशेष लक्ष दिले नाही, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. आज सरगना जलालुद्दिन (छांगुर बाबा) सारखे लोक मोकाटपणे धर्मांतराचे रॅकेट चालवतात, आफताबसारखा धर्मांध श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवतो, ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी दबाव आणणार्‍या मिशनर्‍यांना कंटाळून लावण्या, ऋतुजा यांसारख्या हिंदु मुली स्वतःचे आयुष्य संपवतात. ‘लव्ह जिहाद’ची घटना उघडकीला आली नाही, असा एकही दिवस जात नाही; तरीही यावर कोणतीच कठोर उ...
Love Jihad : “लव्ह जिहाद : धर्मनिरपेक्षतेच्या आड दडलेले जिहादी आक्रमण”

Love Jihad : “लव्ह जिहाद : धर्मनिरपेक्षतेच्या आड दडलेले जिहादी आक्रमण”

लेख, मुंबई
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी संकलित केलेला मराठी लेख प्रस्तावना - सध्या महाराष्ट्रात विविध माध्यमातून हिंदूंचा बुद्धिभेद करून धर्मा पासून दूर नेण्याचा विडाच जणू काहींनी उचलला आहे. विविध नावाखाली करत आहे. कुठे वारीमध्ये समरसता वारी या गोंडस नावाखाली श्रद्धेला तडा देण्याचे कार्य होतांना दिसत तर कुठे हिंदूंचा वंशविच्छेद करणाऱ्या लव्ह जिहाद सारख्या महाभायंकर षडयंत्राला काल्पनिक प्रचार असल्याचे सांगून हिंदूंचा बुद्धिभेद करण्यात येत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) एका कार्यकर्त्याने 'लव्ह जिहाद' ही कल्पना न्यायालय, सरकार किंवा तपास यंत्रणांनी सिद्ध केलेली नाही. या संकल्पनेचा वापर मुस्लिमद्वेष आणि राजकीय ध्रुवीकरणासाठी होतो. काही राज्यांनी यासंदर्भात कायदे केले, पण त्यात स्पष्ट पुरावे किंवा व्याख्या नाही. 'लव्ह जिहाद' हा ...
Ganeshotsav : राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

Ganeshotsav : राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

धार्मिक, उमरखेड, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, मुंबई, लातूर
मुंबई| शेकडो वर्षाची घरगुती गणेशोत्सव परंपरा व अनेक वर्षापासूनची सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचे मानबिंदू आहे. त्यामुळे राज्यात आता गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे केली. मंत्री ॲड. शेलार म्हणाले, गणेशोत्सवाचे महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर व्हावी, आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड व्हावी, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी मजबूत व्हावे, गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर ठळक व्हावे, यासाठी गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्याच्या आर्थिक, ...
Maratha Military Territory : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

Maratha Military Territory : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामरिक इतिहासात मानाचे स्थान असणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 'स्वराज्य' संकल्पपूर्तीतील अलौकिक दुर्गसंपदा म्हणून ओळखल्या जाणाऱया एकूण १२ किल्ल्यांना जागतिक पटलावर मानाचे स्थान बहाल करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात 'युनेस्को'ने - रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदूर्ग, सुवर्णदूर्ग, विजयदुर्ग, खांदेरी असे महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी हा एक अशा एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा (12 forts of Chhatrapati Shivaji Maharaj listed as "Maratha Military Territory" by UNESCO) बहाल केला आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचा समृद्ध वारसा कायमस्वरुपी जागतिक पटलावर नोंदवला जाणे, हा महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे, अशी माहिती सांस्कृत...
MLA Amit Deshmukh : महाराष्ट्रातील वाढत्या अपघातांच्या घटनांकडे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सरकारचे लक्ष वेधले

MLA Amit Deshmukh : महाराष्ट्रातील वाढत्या अपघातांच्या घटनांकडे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सरकारचे लक्ष वेधले

लातूर, मुंबई, राजकीय
मुंबई| राष्ट्रीय महामार्गावर शहरानजीक वाहनांची वेग मर्यादा नियंत्रणात राहावी म्हणून उपाययोजना आहेत मात्र ग्रामीण भागात याबाबतीत दुर्लक्ष असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीवित हानी होत आहे, हे रोखण्यासाठी तसेच दुर्दैवाने अपघात झालाच तर जखमींना वेळेत उपचार मिळण्याच्या दृष्टीने रोड सेफ्टी असिस्टंन्स प्रणाली अधिक मजबूत करावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना केली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील वाढते अपघात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी या संदर्भाने सरकारचे लक्ष वेधताना आमदार अमित विलासराव देशमुख यांनी एका अपघाताच्या संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, मागच्या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे जात असताना औसा तालुक्यात दोन दुचाकीचा अपघात ...
Eng. Chandraprakash Degalurkar : चर्मोद्योगाचे कर्ज माफ करुन महामंडळास तीन हजार कोटीचे बजेट द्यावे – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

Eng. Chandraprakash Degalurkar : चर्मोद्योगाचे कर्ज माफ करुन महामंडळास तीन हजार कोटीचे बजेट द्यावे – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ अर्थात लिडकाॅमचे जुने कर्ज तात्काळ माफ करुन नविन कर्जासाठी महाराष्ट्र शासनाने या महामंडळास तीन हजार कोटींचे बजेट द्यावे अशी मागणी चर्मकार ऐक्य परिषदेचे प्रदेश महासचिव इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केली. चर्मकार समाजाची शिखर संघटना "चर्मकार ऐक्य परिषद" आयोजित महा एल्गार आंदोलनात आझाद मैदान मुंबई येथे इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे बोलत होते. ऐक्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर आणि प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ. वसंतराव धाडवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मागील अनेक वर्षांपासून चर्मकार समाजाचे असंख्य ज्वलंत प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्याबद्दल आपल्या भाषणातून आक्रोश व्यक्त करतांना इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, चर्मोद्योग महामंडळ असून अडचण नसून खोळंबा असे झाले आहे. माय जेऊ घालेन आणि बाप भीक मागू देईना अशी या महामं...
loan waiver : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात अभ्यास समिती गठीत

loan waiver : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात अभ्यास समिती गठीत

कृषी, मुंबई
मुंबई| शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याच्या जीवनात आर्थिक उन्नती साधण्यासाठी राज्य शासन संवेदनशीलपणे काम करीत आहे. याच अनुषंगाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत (Study committee formed regarding farmers' loan waiver) करण्यात आली असल्याची घोषणा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत केली. विधानसभेत विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावास उत्तर देताना सहकार मंत्री श्री. पाटील बोलत होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि शेतीविषयक इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषी, पणन, वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील योजनांची अंमलबजावणी, वितरित निधी आणि प्रलंबित प्रकरणांचा सखोल आ...
Meeting of the minister : मुंबई पोलीस आणि आयुक्तांच्या सहकार्याने घडली दिव्यांग मंत्र्यांची भेट

Meeting of the minister : मुंबई पोलीस आणि आयुक्तांच्या सहकार्याने घडली दिव्यांग मंत्र्यांची भेट

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड/मुंबई| बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र,दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने राज्य व केंद्र शासनाला वारंवार निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढुनही दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे व महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने दिव्यांगांचा आमदार खासदार निधी योग्य रित्या खर्च केला जात नसल्यामुळे सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्याकडून पावसाळी अधिवेशन विधानभवन मुंबई येथे हजारो दिव्यांगांच्या वतीने विधानभवनावर बुधवार दिनांक ९ जुलै २०२५ रोजी भव्य मोर्चा धडकला, यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड शिवानंद मिनगिरे आणि मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्टमंडळास दिव्यांग मंत्री अतुल सावे यांची भेट घडवली. प्रश्न मार्गी लावण्यासाठी आश्वासन दिले. सविस्तर वृत्त असे की, बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य...
Latur Bus stand : लातूरच्या बसस्थानक व डेपो स्थलांतरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा

Latur Bus stand : लातूरच्या बसस्थानक व डेपो स्थलांतरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा

मुंबई, राजकीय, लातूर
लातूर| लातूर शहर शिक्षण, कृषी आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले असून, शहरात दररोज ८०० ते ९०० बसची ये-जा असते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता सध्याचे मध्यवर्ती बसस्थानक अपुरे पडत असून, त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार्किंग व्यवस्थेसह सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे, त्याचबरोबर लातूर येथून महत्त्वाच्या शहरासाठी अद्यावत इलेक्ट्रिक बस सुरू कराव्यात यासह विविध मागण्या राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीदरम्यान केल्या आहेत. त्यांनी या सर्व मागण्यांना अनुकूलता दर्शवत संबंधितांना सूचना केल्या आहेत. परिवहन विभागाच्या संदर्भाने लातूर शहर व जिल्ह्यातील विविध मागण्यांची निवेदने परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे वेळोवेळी देण्यात आली आहेत, या सर्व निवेदनावर विचार करून नि...
error: Content is protected !!