Ahmadabad plane crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या कारणांवर अंतिम अहवालानंतरच प्रकाश
नांदेड| अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघाताच्या नेमक्या कारणांवर अंतिम अहवालानंतरच प्रकाश पडेल, असे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांनी आज सांगितले. राज्यसभेत खा. अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरक प्रश्नाद्वारे अहमदाबाद-लंडन विमानाच्या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत खा. अशोक चव्हाण यांनी प्रश्न विचारला होता. विमानाचे दोन्ही इंजिने बंद होण्यामागील नेमके कारण काय आणि त्याकरिता विमान उत्पादक कंपनी, इंजिन निर्माती कंपनी किंवा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स भाग बसवणाऱ्या कंपनीला काही निर्देश देण्यात आले आहेत का, अशी विचारणा त्यांनी केली.
यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री के. राममोहन नायडू म्हणाले की, या अपघाताचा...









