Tuesday, May 19

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Independence Day : मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

Independence Day : मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे. आज भारताच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य अतिशय वेगाने पुढे जात आहे. विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्र विशेष योगदान देत आहे. देशाची ही विकासगाथा यापुढे थांबणार नाही. प्रधानमंत्री यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे, हा नारा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याकरता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. या समारंभाप्रसंगी संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी म...
Operation Sindoor : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वदेशी’ विषयी जनजागृती करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Operation Sindoor : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वदेशी’ विषयी जनजागृती करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, धार्मिक, मुंबई
मुंबई| सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत ' ऑपरेशन सिंदूर' वर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, त्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आढावा घेताना बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता म...
Deputy Chief Minister Ajit Pawar : कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

Deputy Chief Minister Ajit Pawar : कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| कुरेशी समाज हा परंपरेने मांस व्यापाराशी जोडलेला असून महाराष्ट्राच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे या समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात कुरेशी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा बैठकीदरम्यानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी यासंदर्भात दूरध्वनीवर चर्चा करुन कुरेशी समाजाला जनावरांची वाहतूक करत असताना येत असलेल्या अडचणींबाबत माहिती दिली. जनावरांची वाहतूक करण्यासंदर्भात असलेल्या कायद्यात बदल करण्याबाबत कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करुन निर्ण...
local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन प्रभाग रचनेला सर्वोच्च न्यायालयाचा दुजोरा

local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन प्रभाग रचनेला सर्वोच्च न्यायालयाचा दुजोरा

मुंबई, नांदेड, राजकीय
नांदेड | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य सरकारने अलीकडेच नवीन प्रभाग रचनेचे आदेश निर्गमित केले होते. या आदेशाला हरकत घेऊन काही याचिकाकर्त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्या याचिकेला नकार दिला असून, नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणानुसारच महापालिका निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, राज्यातील विविध महापालिकांमध्ये लवकरच निवडणुकीची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजासाठी आरक्षण कायम ठेवत नवीन प्रभाग रचना लागू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळाल्यामुळे, निवडणूक आयोग आता निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे पुढे सरकणार आहे. महत्वाचे मुद्दे: सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका फेटाळली, नवीन प्रभाग रचना व ओ...
Kisan Samman : पंतप्रधान किसान सन्मान निधीची 20वा हप्ता 2 ऑगस्टला जारी होणार

Kisan Samman : पंतप्रधान किसान सन्मान निधीची 20वा हप्ता 2 ऑगस्टला जारी होणार

कृषी, देश विदेश, नांदेड, मुंबई
नवी दिल्ली| पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता येत्या 2 ऑगस्ट 2025 रोजी जारी केला जाणार आहे. यासंदर्भात आज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत 2 ऑगस्ट रोजी वाराणसी येथे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत आणि अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. देशभरातील 731 कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू आणि प्रमुख व्हर्च्युअल माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले. केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर शेतकऱ्यांना या कार्यक्रमाशी जोडण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आणि देशव्यापी स्तरावर मोहिमेच्या स्वरूपात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी रूपरेषा ...
protests in Mumbai : वैद्यकीय शिक्षणात 80:20 लिंगभेदी नियमानुसार मेल नर्सेसवर अन्याय — रद्द करा! 5 ऑगस्ट रोजी मुंबईत तीव्र निदर्शने

protests in Mumbai : वैद्यकीय शिक्षणात 80:20 लिंगभेदी नियमानुसार मेल नर्सेसवर अन्याय — रद्द करा! 5 ऑगस्ट रोजी मुंबईत तीव्र निदर्शने

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| मेल नर्सेस बचाव समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी मुंबईत तीव्र निदर्शने आयोजित करण्यात येत आहेत. याआधी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदने सादर करण्यात आली, तसेच सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांना निवेदने देऊन न्यायाची मागणी केली गेली. अधिवेशनातही भेटीगाठी घेऊन आवाज उठवण्यात आला. खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार निलेश लंके, आमदार डॉ तुषार राठोड, मा.सत्यजित दादा तांबे, रविकांत दादा तुपकर साहेब इत्यादीनी पत्र लिहून विरोध दर्शविला. वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक, आयुक्त, सचिव आणि खुद्द मंत्री यांना चार ते पाच वेळा थेट भेटून चर्चा करूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, हे शर्मनाक आणि दुर्दैवी आहे! आमचा अंत पाहू नका! लिंगभेदाचा अन्याय सहन केला जाणार नाही! आज डॉक्टर, टेक्निशियन, पोलिस, फार्मासिस्ट या सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी आहे – ...
Chief Minister Devendra Fadnavis : “मातृभाषेचा अभिमान बाळगतांना अन्य भाषांचा सन्मान करावा”-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : “मातृभाषेचा अभिमान बाळगतांना अन्य भाषांचा सन्मान करावा”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, देश विदेश
नवी दिल्ली| भाषा हे संवादाचे प्रभावी साधन असून या माध्यमातून ज्ञानाचा खजिना उपलब्ध होतो. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचा देखील सन्मान ठेवला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि सरंक्षण विशेष अध्यासन केंद्र ’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित , तंजावर घराण्याचे छत्रपती बाबाजीराजे भोसले, कुलसचिव प्रा. रविकेश उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक...
Chief Minister Devendra Fadnavis : संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, धार्मिक
संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा सोलापूर/पंढरपूर| समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व वाणीने देशभर पोहोचविणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल. संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी वैश्विक दर्जाचे स्मारक उभारतांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यांचे विचार हे त्यांचे खरे स्मारक असून हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंढरपूर येथे आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठ शतकोत्तर संजीवन समाधी सोहळा कार्यक्र...
Chief Minister Devendra Fadnavis : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले” – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार

Chief Minister Devendra Fadnavis : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले” – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार

मुंबई, राजकीय
मुंबई| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने विविध क्षेत्रात भरीव प्रगती केली असून, त्यांचे नेतृत्व हे राज्याच्या विकासाला गतिमान करणारे ठरल्याचे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ( Governor C. P. Radhakrishnan) यांनी काढले. विकास, पारदर्शक प्रशासन, आणि जनतेशी थेट संवाद हीच त्यांच्या यशाची त्रिसूत्री आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘महाराष्ट्र नायक’ या विशेष कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे हस्ते राजभवन येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची कॉफी टेबल बुकची निर्मितीची संकल्पना अभिनंदनीय असल्याचेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांन...
Mp ajit gopcchade : विवाह नोंदणी वेबसाईट नियंत्रित करा : खा. डॉ. अजित गोपछडे यांची राज्यसभेत मागणी

Mp ajit gopcchade : विवाह नोंदणी वेबसाईट नियंत्रित करा : खा. डॉ. अजित गोपछडे यांची राज्यसभेत मागणी

नांदेड, मुंबई, राजकीय
नवी दिल्ली| देशात अनेक विवाह नोंदणी वेबसाईट वरून अविवाहित आणि विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या संबंधितांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी विवाह नोंदणी वेबसाईट केंद्र सरकारने नियंत्रित कराव्यात अशी मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत केली आहे. देशातील विविध भागात विविध भाषेत विवाह नोंदणी वेबसाईट मोठ्या प्रमाणात चालविल्या जातात. यामधून अविवाहित मुला मुलींसाठी स्थळ शोधून दिली जातात. परीतक्त्या , विधवा , विधुर यांच्यासाठीही विवाह जुळवून देण्यासाठी या वेबसाईटवरून अनेक अमिष आणि प्रलोभन दाखविले जातात . त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जातो . अशातच छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका व्यक्तीने देशभरातील तब्बल 500 नागरिकांना फसवल्याचा प्रकार नुकताच पुढे आला आहे. त्याने वेगवेगळ्या सहा वेबसाईट तयार करून विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या मुलामुली...
error: Content is protected !!