करियरनांदेड

Vice Chancellor Dr. Manohar Chaskar : आपल्या विद्यापीठाची विद्यार्थीनी आज राज्याची राज्यमंत्री आहे, ही बाब भूषणावह – कुलगुरु डॉ. मनोहर चासकर

नांदेड| प्रत्येक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठाची आपले विद्यार्थी मोठे व्हावेत हीच अपेक्षा असते. त्यामुळे आपल्याही विद्यापीठाची ही अभिमानास्पद बाब आहे की, आपली विद्यार्थीनी मा. ना. मेघनाताई साकोरे बोर्डीकर या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, उर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री अशी खाती आहेत, असे उद्गार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या विविध पुरस्कार वितरण समारंभात ते आज गुरुवार, दि.१८ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, उर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना. मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासमवेत विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.अशोक महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य नारायण चौधरी, डॉ.डी.एन. मोरे, डॉ.सुरेखा भोसले, कुलसचिव डॉ.ज्ञानेश्वर पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुहास पाठक, क्रीडा विभागाचे संचालक डॉ.भास्कर माने, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.जगदीश कुलकर्णी, डॉ.अंबादास कदम यांच्यासह इत्तर मान्यवर उपस्थित होते.

पुढे कुलगुरु म्हणाले, स्टार्टअपसाठी विद्यापीठाने ५० लक्ष रुपयाचा निधी राखून ठेवला आहे. जे विद्यार्थी महाविद्यलय अथवा विद्यापीठ संकुलामधून स्टार्टअपसाठी पुढे येतील त्यांना एक लक्ष रुपयापर्यंत बक्षीस देण्यात येणार आहे. एक संकुल एक कौशल्य या संकल्पने बरोबरच यापुढे स्टार्टअपला चालना देण्यासाठी एक संकुल एक स्टार्टअप हा प्रकल्प राबविणार आहोत.

मा. ना. मेघनाताई साकोरे बोर्डीकर म्हणाल्या, मी याच विद्यापीठातून पदवी घेतलेली आहे. त्यामुळे या विद्यापीठाबद्दल माझ्या मनात एक आदर आहे. आपल्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये थोडासा न्यूनगंड आहे. याबाबतीत त्यांना थोडेसे योग्य मार्गदर्शन लाभले तर निश्चितच त्यांचा आत्मविश्वास वाढतो. देशाचे भविष्य घडविण्याची ताकत आपल्या विद्यार्थ्यामध्ये आहे. नवनवीन संकल्पना विद्यापीठाने राबवाव्यात, त्यासाठी शासन स्तरावर संपूर्ण सर्वोत्तपरी मदत करण्याची तयारी माझी आहे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बारावी व दहावीमध्ये विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांमध्ये रोशीत वाढेर, वेधा कुमार, अंजली शिंदे, आयुष साळवे, जान्हवी भराडिया, वरद पाटील, सृष्टी गायकवाड, राजवीर अचलखांब, श्लोक निंगदळी आणि हितीक्षा बाविस्कर यांचा प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मनदीपसिंग सिलेदार यांची एन.सी.सी. स्पेशल इंट्रीद्वारे भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

वर्धापन दिनानिमित्ताने विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या गुणवंत विद्यार्थी स्नेहल पांचाळ, सागर गोरगीळे, जहीर काजी, नाजिया शेख, वैष्णवी साकोळे, आदित्या उरगुंडे, दीप्ती शिंदे, गायत्री चव्हाण, पार्वती सावंत, शारदा गिल्डा, रत्नशील सोनकांबळे, अवंतिका पवार, दुरानी हुद्दा, अकिब अहेमद, फारुकी तमकीन, मनियार मारियाम, वैष्णवी मीठपल्ले, आरती रोडगे, स्वाती कदम, बलजिंदरकौर कांचवाले, अंजुम शेख, ऐश्वर्या लांडगे, अरफत खान, प्रीती कारभारी, मनदीप तुलसाणी, मो. लबीब सिद्दिकी, अदिती कुलकर्णी, ऐश्वर्या कुलकर्णी, सरस्वती लंगुटे, ऐश्वर्या कांबळे, काशीबाई गिरी, अवंतिका यादव, श्रद्धा जाधव, सानिया मासुलदार, अंकिता बडदे, जिगीषा देशपांडे, वैशाली अकुलवाड, ज्योती मोतीपोळे, गायत्री सोळुंके, अपूर्वा नवले, सुषमा पाटील, व्यंकट पांचाळ, कल्पना गाजरे, काजल वाघमारे, शिल्पा गोरे, पूजा कांबळे, भीमराव बुक्‍तरे, प्रियंका लोखंडे, हरिष सागर, नरसिंग बुगडे, सयदा तय्यबा आणि संघमित्रा गोणारकर या ५२ गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्ताने विद्यापीठीय कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन (महिला सिंगल) या क्रीडा प्रकारात बेबी शिंदे (प्रथम), संगीता तोटलवार (द्वितीय), वर्षाताई घोगरे (तृतीय), बॅडमिंटन (पुरुष सिंगल) या क्रीडा प्रकारात डॉ. सचिन नरंगले (प्रथम), रविकिरण शिंदे (द्वितीय), वसंत वाघ (तृतीय). मॅरेथॉन (पुरुष) शिवराम लुटे (प्रथम), उद्धव हंबर्डे (द्वितीय), सुनील लुटे (तृतीय). बॅडमिंटन (महिला डबल) या क्रीडा प्रकारात बेबी शिंदे व अनुताई देवशेटवार (प्रथम), संगीता तोटलवार व वर्षाताई घोगरे (द्वितीय) आणि बुद्धीबळ (पुरुष) या क्रीडा प्रकारात शिवम लुटे (प्रथम), डॉ. योगेश लोलगे (द्वितीय) आणि डॉ. सचिन नरंगले (तृतीय) क्रमांक मिळविला. या विजेत्या खेळाडूसह निबंध स्पर्धेत नागेश खडकेकर (प्रथम), अब्दुल बशीर (द्वितीय), अतुल शिंदे (तृतीय) व रांगोळी स्पर्धेत महामाया कदम (प्रथम), बेबी शिंदे (द्वितीय), संगीता तोटलवार (तृतीय) या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

वर्धापन दिनानिमित्ताने आंतरमहाविद्यालयीन विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत यशवंत महाविद्यालय, नांदेड (प्रथम), महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर (द्वितीय), शिवाजी महाविद्यालय, परभणी (तृतीय). वकृत्त्व स्पर्धेमध्ये किशन जाधव, शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी(प्रथम), गार्गी बस्तापुरे, दयानंद विधी महाविद्यालय, लातूर (द्वितीय), गीता वाडकर, महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा (तृतीय). रांगोळी स्पर्धेत वैष्णवी जाधव, बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत (प्रथम), पूनम हाळदे, औषधनिर्माणशास्त्र संकुल, विद्यापीठ परिसर (द्वितीय), आदिती धसवाडीकर, दयानंद विधी महाविद्यालय, लातूर (तृतीय). भित्तीपत्रक स्पर्धेत विधी मुंदडा, भाषा संकुल, विद्यापीठ परिसर (प्रथम), तमन्ना गर्ग, भौतिकशास्त्र संकुल, विद्यापीठ परिसर (द्वितीय), हुमेरा फिरदोस, शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी(तृतीय) आणि निबंध स्पर्धेत प्रगती टाकणखार, बहिर्जी स्मारक महाविद्यालय, बसमत (प्रथम), ज्ञानेश्वर कोल्हे, दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर (द्वितीय), अनुसया कुलथे, शिवाजी महाविद्यालय, परभणी (तृतीय) पटकावला आहे. प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकास रु.२१००/-, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकास रु.१५००/-, आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकास रु.११००/- रुपयाचा धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

वर्धापन दिनानिमित्ताने विद्यार्थी विकास विभागामार्फत महाविद्यालयीन वार्षिक अंकास भोकरच्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयास प्रथम, सेलूच्या नूतन महाविद्यालयास द्वितीय, लातूरच्या दयानंद विधी महाविद्यालयास तृतीय तर सिडको, नांदेडच्या इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय व औंढा नागनाथ येथील नागनाथ महाविद्यालयास उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीताने झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प.पूज्य. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय तसेच आभार प्रदर्शन डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button