नांदेडमहाराष्ट्र

Usmannagar ; उस्माननगरमध्ये ग्रामसभा वादळी: २.५६ कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सरपंच व ग्रामसेवक निरुत्तर, संतप्त नागरिकांचा बहिष्कार

उस्माननगर,माणिक भिसे l उस्माननगर ता.कंधार येथील ग्रामपंचायतीच्या कारभारावर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा, सरपंच आणि ग्रामसेवकांच्या मौनामुळे आणि ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे चांगलीच गाजली. सुमारे दोन कोटी छप्पन्न लाख रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केल्यानंतरही अध्यक्ष व सचिवांनी मौन बाळगल्याने, ‘ही ग्रामसभा होती की शोकसभा?’ असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.

काय आहेत गावकऱ्यांचे आरोप? – गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. बोगस कामांचे बिल: गावात सुमारे २ कोटी ५६ लाख रुपयांची कामे झाल्याचे केवळ कागदोपत्री दाखवून, प्रत्यक्षात काम न करता ती रक्कम हडप केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

निधीचा गैरवापर:  स्वच्छतेच्या नावाखाली, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तसेच १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून गावाच्या विकासासाठी मंजूर झालेल्या निधीचा वापर गावात न करता तो परस्पर हडप करण्यात आला.

खोट्या सह्या करून ग्रामसभा: मागील काळात अनेकदा ग्रामसभा न घेताच, कागदोपत्री कामकाज दाखवण्यासाठी गावकऱ्यांच्या खोट्या सह्या करून ग्रामसभा झाल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

ग्रामसभेत गोंधळ आणि बहिष्कार – काल आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत या सर्व आरोपांवर ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवकांना जाब विचारला असता, दोघांनीही मौन बाळगले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या अनेक नागरिकांनी ग्रामसभेवर बहिष्कार टाकत सरपंच व ग्रामसेवक यांचा निषेध व्यक्त केला.  काही गावकऱ्यांनी विरोध करूनही काही ठराव ग्रामपंचायतीने पारित केल्याचे समजते.

जिल्हा स्तरावरून चौकशीची मागणी – या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा स्तरावरून निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी आणि दोषी आढळणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अनेक संतप्त नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button