BJP Gajanan Joshi : ताई आणि गाईची रक्षा प्रत्येक हिंदूचे कर्तव्य – भाजपा गजानन जोशी

नांदेड | नवरात्रोत्सव काळात राज्यभरात दांडिया व गरबा महोत्सवांचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. मात्र या पेंडॉल्समध्ये काही विधर्मी प्रवृत्तीचे लोक आपल्या माता-भगिनींवर वाईट नजर ठेवू नयेत, यासाठी आयोजकांनी ठोस उपाययोजना कराव्यात, असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गजानन जोशी यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, प्रशासन हे सर्व समाजासाठी काम करत असते, मात्र आपणही दक्ष राहणे गरजेचे आहे. “ताई आणि गाईची रक्षा प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे” हे लक्षात ठेवून कार्य केले, तर कोणत्याही ठिकाणी अडचणी निर्माण होणार नाहीत.

महाराष्ट्रातील नवरात्रोत्सव मंडळांनी सुरक्षित व सुसंस्कृत पद्धतीने दांडिया-गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यास कटिबद्ध असावे, असेही ते म्हणाले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button