हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील काही प्रतिष्ठाच्या प्रभागातच रोडचे नालीचे कामे करण्यात आल्याने शहरातील अतर्गत रोड वर निधी न टाकल्या मुळे चिखलासह मोठ मोठे जीवघेणी खड्डे पडलेले आहे तसेच हदगाव तालुक्यातील काही प्रमुख रोड वर विविध योजना द्वारे शासनाच्या निधी खर्च करण्यात आला. माञ रोडचा दर्जा पाहता हे काम निव्वळ थातुर-मातुर करण्यात आल्याने या संबधी माञ विरोधक व सत्ताधारी माञ या बाबतीत ‘चुप्पी ‘साधली असल्या मुळे नागरिकात आश्चर्य व्यक्त करण्यातयेत आहे. यामुळे शहरातील तालुक्यातील विद्यार्थ्यांना हा प्रवास चिखलात व खड्ड्यातून करण्यात येत असल्याने हे तालुक्याच्या नेतृत्वच्या राज्यकीय दृष्टीने भूषणवाह नाही. अशी चर्चा शहरात व तालुक्यात ऐकवायास मिळत आहे.

हदगाव शहर चिखलाच व खड्ड्याच शहर म्हणून ओळख होतांना दिसुन येत आहे. हदगाव शहरात जानकीलाल राठी चौक ते माजी खा. वानखेडे यांचे निवास्थान पर्यंत गेल्या 20ते 25 वर्षा पासुन रोड नाही तसेच डाँ मनाठकर याचे घरा पासुन ते जुने बस्थानक तसेच राठी चौक आझाद चौक ते दत्त बर्डी जुने बस्थानक ते बाभळी रोड मुल्लागली ते शाम सारडा यांचे शेता पर्यत. तसेच माजी खा हरीहरराव सोनुले चौक ते दत्तबुवा मठ ते माळोदे गल्ली तसेच पोलिस स्टेशन ते पत्रकार वैजनाथ गुडुप यांच्या घरापर्यंत जुने बस्थानक ते शफी भाई यांचे घरा पर्यंत.तसेच मसाई मंदीर ते विवेकानंद शाळा आझाद चौक ते पोलिस काँलोनी हे जुने बसस्थानक ते जिल्हा परिषद शाळा हदगाव शहरातील प्रमुख रोड आहेत. ह्या रोडवर गेल्या 20 ते 25 वर्षापासुन कोणत्या ही प्रकारच निधी द्वरे कामे करण्यात आलेली नाही. परिणाम स्वरुप ह्या शहरातील प्रमुख रोडवर चिखल व जीवघेणी खड्डे झालेले आहे.

विशेष म्हणजे जिथे शहरात मणुष्यवस्ती तुरळक विशिष्ट भागात लाखो करोडो रुपायाच कामे टाकुन थातुर मातुर कामे टाकुन बिले काढण्यात आलेली आहेत ही वस्तुस्थिती आहे. अशीच परिस्थिती तालुक्यात असुन याबाबतीत माञ विरोधक व सत्ताधारी पक्षानी चुप्पी साधल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विद्यमान आ.माधवराव पा.जवळगावकर व अन्य नेते हदगाव शहराच्या मुख्य समस्याकडे दुर्लक्ष करुन इतर तालुक्यातील इ गावाचे विकासाच कामाचे ढोल पिटण्यात मश्गुल आहेत. शहरात व तालुक्यात ज्या रोडचे कामे झालेली आहेत सध्या त्या रोडची आवस्था संबधी हे लोकप्रतिनिधी ‘मौण ‘पाळुन लोकप्रतिनिधी सोबत विरोधक ही गप्प आहेत .


विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा चिखलातुन प्रवास
हदगाव शहराच्या मध्य भागातुन जाणाऱ्या रोडवरील सर्वात जास्त खड्डे असुन, या रोडवरुनच विद्यार्थ्यांना व नागरिकांना जाव लागत आहे. ज्या रोडवर विद्यमान खा .जि.प. शाळा विवेकानंद आयटीआय महावितरण कार्यालय विशेष म्हणजे नव खा नागेश पाटील आष्टीकर ह्याच्या शैक्षणिक संस्था आहे. ह्या रोडवर असुन ह्या चिखलमय व हजारो खाड्या मधून प्रवास करावा लागत आहे. शिक्षण घेणे सुद्धा फार कठीण झाल्याचे प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या ऐकवायास मिळत आहे.

निवेदनावर कोणतीच कार्यवाही होत नाही
हदगाव शहरातील व तालुक्यातील काही जागरुक नागरिक व सामाजिक संघटनाकडुन सार्वजनिक बाधकाम व नगरपरिषदला तोडी व लेखी पञाद्वरे निवेदन देण्यात आले. परंतु गेल्या पाच वर्षापासून नागरिकाच्या निवेदनाची दखल घ्यायचीच नाही. अस जणु काय संबंधित प्रशासनाने ठरविलेले दिसुन येते. तात्पुरते थातुर मातूर खड्डे बुजविण्यात येत असले तरी शहराच्या विद्रुपतेला अणखी बहार आलेली दिसुन येत आहे. शासनाचा विकास निधी व विद्यमान आमदारच विशेषतः रोडच्या निधीकडे गेल्या पाच वर्षात विशेष लक्ष नाही. हदगाव शहरासह तालुक्याला करोडो रु. निधी मिळालेला आहे. माञ यामध्ये मुळ कञाटदाराच्या नावे भालत्यानीच कामे केल्याने कामाचा दर्जा राहीलेल नाही ही वस्तुस्थिती आहे. माञ शासनाचा निधी कसा वापरायचा हाच ध्यास सध्या तरी दिसुन येत आहे.

