Approach is wrong : डोकेदुखीवर गोळी, तापावर सिरप… पण ठिकाण चुकतंय!
नांदेड | हवामानातील अचानक बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी व घसा खवखवणे यांसारख्या आजारांत लक्षणीय वाढ झाली आहे.
मात्र या आजारांवर उपचार करताना अनेक नागरिक डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट किराणा दुकाने व पानटपऱ्यांमधून औषधे खरेदी करून सेवन करत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. ही बाब आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून, अशा प्रकारे औषधांचे सेवन जीवावर बेतू शकते, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व अधिकृत औषध विक्रेत्यांशिवाय इतर ठिकाणांहून औषधे घेणे हे मानवी शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. चुकीचे औषध, चुकीचा डोस किंवा बनावट औषधे यामुळे आजार बळावण्यासह दुरगामी दुष्परिणाम होण्याचा धोका वाढतो.
विशेष म्हणजे, किराणा दुकाने, पानटपऱ्या किंवा तत्सम आस्थापनांकडून सर्दी, खोकल...









