Farmars Demand : सरसकट कर्जमाफी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी
हिमायतनगर, अनिल मादसवार| यंदा जुलै महिन्यापासून हिमायतनगर तालुक्यात सततच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुर परीस्थीती निर्माण होऊन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे पुर येवुन पिके पुर्णपणे जमिनीसह वाहुन गेले आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत देण्यात यावी. अशी मागणी नायब तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निवेदन पाठवून हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यावर्षी हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरस्थितीत अनेक शेतजमिनी पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टर शेती पिके वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक २४ रोजी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन, शेत...









