Wednesday, May 20

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारला येथे अखंड हरिनाम सप्ताह

Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारला येथे अखंड हरिनाम सप्ताह

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार|गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारला येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, शिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भक्तीमय सोहळा १९ मार्चपासून सुरू होऊन २६ मार्चपर्यंत चालणार असून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. कारला गावात गेल्या अकरा वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. यंदाही गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यात भव्य शिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा ज्ञानयज्ञ पार पडणार आहे. या सप्ताहात शिवपुराण कथा ह.भ.प. बालयोगिनी मुक्ताईनाथ गुरु महेश्वरीनाथ यांच्या वाणीतून सादर होणार आहे, तर ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ गणेश महाराज मुटेवाड हे सांभाळणार आहेत. ...
Bhokar News : ‘बेबी किट’ वाटपात निकृष्ट साहित्यामुळे मातांचा संताप, अंगणवाड्यांत गोंधळ

Bhokar News : ‘बेबी किट’ वाटपात निकृष्ट साहित्यामुळे मातांचा संताप, अंगणवाड्यांत गोंधळ

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड/भोकर | नवजात बालकांच्या संगोपनासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या ‘बेबी केअर किट’च्या वाटपात मोठा गोंधळ उडाल्याचा प्रकार भोकर तालुक्यात समोर आला आहे. अंगणवाडी केंद्रांमार्फत वितरित करण्यात आलेल्या या किटमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य, अपूर्ण वस्तू आणि खराब पॅकिंग असल्याचे उघड झाल्याने लाभार्थी मातांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या योजनेंतर्गत नवजात बालकांसाठी आवश्यक साहित्य देण्यासाठी ‘बेबी किट’ वाटप केले जाते. मात्र भोकर तालुक्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांमध्ये वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये दर्जाहीन कपडे, वापरण्या योग्य नसलेल्या वस्तू आणि काही ठिकाणी अपूर्ण साहित्य आढळून आले आहे. त्यामुळे नवजात बाळांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेल्या या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही लाभार्थी मातांनी सांगितले की, किटमधील कपडे, टॉवेल, ब्लँकेट यांसारख्या वस्तू अत्यंत हलक...
Black market : नांदेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघड; श्रीनगर भागातून १० सिलिंडर जप्त

Black market : नांदेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघड; श्रीनगर भागातून १० सिलिंडर जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा पुरवठा विभागाने श्रीनगर परिसरात धाड टाकून १० रिकामे गॅस सिलिंडर जप्त केले असून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमान मंदिर रोड, श्रीनगर भागात राहणारे मकसूद अहमद हे आपल्या राहत्या घरी घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अवैध साठा करून चढ्या दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. या तक्रारीची दखल घेत राहुल कर्डिले (जिल्हाधिकारी, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. जगदीश बारदेवाड (जिल्हा पुरवठा अधिकारी) व संजय वारकड (तहसीलदार) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १२ मार्च २०२६ रोजी संबंधित ठिकाणी आकस्मिक तपासणी केली. तपासणीदरम्यान पथकाला एकूण १० रिकामे गॅस सिलिंडर आढळून आले. त्यामध्ये घरगुती वापराचे ७ सिलि...
Yellow alert for Nanded district : नांदेड जिल्ह्यासाठी १६ ते १९ मार्चदरम्यान यलो अलर्ट

Yellow alert for Nanded district : नांदेड जिल्ह्यासाठी १६ ते १९ मार्चदरम्यान यलो अलर्ट

कृषी, नांदेड
नांदेड| भारतीय हवामान विभाग अंतर्गत प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १६ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत यलो (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. माहितीनुसार १६ व १७ मार्च या दोन दिवसांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच १८ व १९ मार्च या दोन दिवसांत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे...
Saint Shrestha Dnyaneshwar Mauli : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ कार्यक्रम

Saint Shrestha Dnyaneshwar Mauli : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ कार्यक्रम

नांदेड, धार्मिक
नांदेड| संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कुसुम सभागृह (व्ही.आय.पी. रोड) येथे संपन्न होणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या महान ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, प्रेमभाव आणि मानवतेचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित हा कार्यक्रम संत परंपरेच्या स्मरणार्थ तसेच अध्यात्मिक विचारांच्या प्रसारासाठी विशेष मह...
Rahul Kardile : पुस्तकामुळेच माणूस घडतो – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Rahul Kardile : पुस्तकामुळेच माणूस घडतो – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, करियर
नांदेड| माणसांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची खरी ताकद पुस्तक वाचनात असते. केवळ कायदे किंवा नियमांच्या आधारे समाजात बदल घडत नाहीत; ते स्वयंप्रेरणेनेच घडतात. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची सवय जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. नांदेड ग्रंथोत्सव 2025 च्या समारोप प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अच्युत बन होते. व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, निरीक्षक प्रताप सूर्यवंशी, राजेंद्र हंबीरे, गोविंद वडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, लहानपणापासून मला वाचनाची आवड आहे. पुस्तकावर केलेली गुंतवणूक आयुष्य...
Dr. Sanvi Jethwani : तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व कधी? — डॉ. सान्वी जेठवाणी यांची खंत

Dr. Sanvi Jethwani : तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व कधी? — डॉ. सान्वी जेठवाणी यांची खंत

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्यातील समाजासाठी गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक पातळीवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सान्वी जेठवाणी यांनी तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नांदेड महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपल्या नावाचा विचार न झाल्याने डॉ. सान्वी जेठवाणी यांनी खंत व्यक्त केली आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका असतानाही तृतीयपंथी समाजाला अद्याप राजकीय स्तरावर योग्य संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. सान्वी जेठवाणी या सह-उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळ, अध्यक्ष – सप्तसतरंग सेवाभावी संस्था, नांदेड, तसेच PRO – इंटरनॅशनल किन्नर अखाडा या पदांवर कार्यरत आहेत. सामाजिक कार्यासोबतच त्या एक सांस्कृतिक कार्यकर्त्या, लावणी नृत्यांगना, प्लस साईज मॉडेल तसेच तृतीयपंथी समाजातून मिस प्लस साई...
Nanded : नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे उद्घाटन; १२५ स्टॉलमधून कृषी उत्पादने व तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

Nanded : नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे उद्घाटन; १२५ स्टॉलमधून कृषी उत्पादने व तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

नांदेड, कृषी
नांदेड | नांदेड येथे तीन दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर १५ ते १७ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात १२५ विविध स्टॉल उभारण्यात आले असून कृषी उत्पादने, तंत्रज्ञान, शेतीपूरक उद्योग आणि सेंद्रीय उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उद्घाटन प्रसंगी बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी हा देशाचा अन्नदाता असल्याचे सांगितले. उत्पादन वाढीसोबतच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असून शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)सारख्या आधुनिक साधनांचा वापर केल्यास उत्पादनवाढीस मदत होईल, असे त्यांनी सांगितले. शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून नुकत्याच जाहीर झालेल...
Farmers Banana Trees Distroy : पार्डीत अज्ञात माथेफिरूंचा धुडगूस; ५ शेतकऱ्यांच्या ३२०० केळीच्या झाडांची कोयत्याने कत्तल

Farmers Banana Trees Distroy : पार्डीत अज्ञात माथेफिरूंचा धुडगूस; ५ शेतकऱ्यांच्या ३२०० केळीच्या झाडांची कोयत्याने कत्तल

नांदेड, कृषी
नांदेड /अर्धापूर | नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मौजे पार्डी (म) येथे अज्ञात माथेफिरूंच्या टोळीने शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांवर हल्ला करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनांक १२ मार्चच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी पाच शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेत घुसून तब्बल ३२०० केळीच्या झाडांची कोयत्याने कत्तल केली. तसेच ठिबक सिंचन आणि सबलाईनच्या पाईपांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत शेतकरी साईनाथ मारोतराव हापगुंडे (गट क्र. १७९), प्रसाद साहेबराव हापगुंडे (गट क्र. १७९), नवनाथ दतराव हापगुंडे (गट क्र. १२), प्रफुल्ल बाबूराव देशमुख आणि रविकुमार हरीआप्पा पत्रे यांच्या केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ झाडांची कत्तलच नव्हे तर ठिब...
Retiring does not mean becoming obsolete : निवृत्त होणे म्हणजे कालबाह्य होणे नव्हे

Retiring does not mean becoming obsolete : निवृत्त होणे म्हणजे कालबाह्य होणे नव्हे

नांदेड, लेख
जीवनाच्या प्रवासात एक टप्पा असा येतो, जेव्हा मनुष्य नोकरीतून किंवा अधिकृत जबाबदाऱ्यांमधून सेवानिवृत्त होतो. अनेकांच्या मनात या क्षणानंतर आयुष्य थांबते, उपयोग संपतो किंवा समाजात महत्त्व कमी होते अशी भीती निर्माण होते. परंतु खरे पाहता निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, तर आयुष्याच्या दुसऱ्या आणि अधिक अर्थपूर्ण पर्वाची सुरुवात असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महान भारतीय सांख्यिकी तज्ज्ञ Calyampudi Radhakrishna Rao (सी. राधाकृष्ण राव). त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात जे कार्य केले, ते अनेक तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे. राव साठाव्या वर्षी सेवानिवृत्त झाले आणि आपल्या मुलगी व नातवंडांसोबत अमेरिकेत स्थायिक झाले. साधारणपणे या वयात अनेकजण विश्रांती घेण्याचा विचार करतात. परंतु राव यांनी निवृत्तीला विश्रांती न मानता नवीन संधी मानली. ६२ व्या वर्षी त्यांनी अमेरिकेतील University of Pittsburgh येथे स...
error: Content is protected !!