Disaster ; आपत्तीच्या काळात रगडे बंधूंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केली प्रशासनास मदत
नवीन नांदेड l गोदावरी नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होऊन जिल्हाभर नदीकाठ परिसरात पूर परिस्थिती उदभवली होती याच काळात शंकरराव चव्हाण जलाशय विष्णुपरी येथील गेट न 11 ला तांत्रिक अडचणी मुळे उघडता येत नव्हते ,ही बाब लक्षात येताच असर्जन येथील रगडे बंधूनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून गेटची दोरी बरोबर करून गेट पुर्वत सुरूळीत करून प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे त्यांचे अभिनंदन होत असुन राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल यांनी रगडे बंधुचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
राज्यात उद्भवलेली पूर परिस्थिती बघता गोदावरी नदीतील पाणीपत्रात अचानक वाढ झाली असून परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, शंकरराव चव्हाण जलाशय विष्णुपुरी प्रकल्प नांदेड या ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडे करण्यात आले होते.
यातील 11 नंबरचा गेट काही कारणास्तव उघडत न...








