Monday, July 6

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Nanded News : नळाच्या पाईपलाईन साठी तोडलेल्या रोडवर फक्त तीन इंचाचा थर ?

Nanded News : नळाच्या पाईपलाईन साठी तोडलेल्या रोडवर फक्त तीन इंचाचा थर ?

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,गोविंद मुंडकर| येथील शोभा नगर ते आनंद नगर रोडवर नवीन नळाच्या पाईपलाईन साठी तोडलेल्या रोडवर फक्त ३ ते ४ इंचाचा थर देण्याच्या उद्देशाने गुत्तेदारांनी तब्बल दोन महिन्यानंतर काम सुरू केले आहे. ह्या निकृष्ट कामाबाबत मनपाच्या बांधकाम विभागाने लक्ष द्यावे आणि दिलेल्या वर्क ऑर्डर व इस्टिमेट नुसारच काम करून घ्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व नगर सुधार कृती समिती, प्रभाग क्रमांक ०४ ने केलेली आहे. आनंदनगर ते शोभानगर रोडवरील पाण्याच्या टाकी पासून मोरगे यांच्या घरापर्यंत नळाची नवीन पाईप लाईन २० मे २०२५ च्या दरम्यान टाकली आहे. तेव्हापासून आजपर्यंत खोदकामाचे मटेरियल उचलण्यासाठी गुत्तेदाराला आज दिनांक ,, १७ ऑगस्ट २०२५ रोज रविवारी तब्बल २ महिन्यानंतर मुहूर्त मिळाला आहे. तोडलेल्या रोडवर फक्त ३ ते ४ इंचाचे मटेरियल काढले असल्यामुळे रोडवर फक्त ३ ते ४ इंचाचा थर देणार हे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्य...
Deglur News : पंजाब राज्यातील १०० सरपंच अभ्यासासाठी देगलूर तालुक्यातील येरगीत दाखल

Deglur News : पंजाब राज्यातील १०० सरपंच अभ्यासासाठी देगलूर तालुक्यातील येरगीत दाखल

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर, गंगाधर मठवाले| भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औछद साधून देगलूर तालुक्यातील येरगीत पंजाब राज्यातील १०० सरपंच येरगीत दाखल झाले होते. त्यानी गावातील विविध विकास कामाची पाहणी करून पंचायत स्मीता कार्यालयास भेट दिली. देगलूर तालुक्यातील येरगी गावात आगमन होताच पंजाब सरपंचाचे तिलक स्वागत आरती करून ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने उत्फुर्त स्वागत केले. गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत स्वागत गीत सादर करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण करण्यात आले पंजाब व महाराष्ट्र राज्यातील ससकुरतीचा संगम घडवणारा कार्यक्रम पार पडला. गावात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. येरगी गावात सरपंच संतोष पाटील यांनी चालुक्यकालीन, स्थापत्य व वारसा, स्थळाची पाहणी करून नागरिकाच्या अनुषंगाने चालुक्यीन सपदा आज अस्तित्वात असून, कुठल्याही धरन तलाव पाणीसाठा नदी पाञ...
Vidarbha-Marathwada : मुसळधार आणि इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे गांजेगाव पुलावरून पाणी; विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला

Vidarbha-Marathwada : मुसळधार आणि इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे गांजेगाव पुलावरून पाणी; विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
हिमायतनगर, अनिल मादसवार| मुसळधार पाऊस आणि इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली असून, गांजेगाव पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सलग विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला असून दळणवळण ठप्प झाले आहे. गांजेगाव पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली जातो आणि मार्ग बंद पडतो. नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी ३०–३५ किमी वळसा घ्यावा लागतो. मात्र अद्यापही पूल उंचावण्याची मंजुरी मिळालेली नाही. शेतकऱ्यांचे नुकसान - पैनगंगेत इसापूर धरणाचा विसर्ग आणि कयाधू नदीचा पुर मिसळल्याने आणि मुसळधार पावसामुळे नदीला महापूर येतो. यामुळे काठावरील शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. महत्त्वाचा मार्ग ठप्प - हा पूल विदर्भ–मराठवाडा–तेलंगणा–आंध्र प्रदेश–कर्नाटकला जोडणारा आहे. माहूर, बासर, पोहरा देवी आदी ...
Mahesh Shirfule Kamarikar ; साहेब सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा हो : महेश शिरफुले कामारीकर

Mahesh Shirfule Kamarikar ; साहेब सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा हो : महेश शिरफुले कामारीकर

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | मागील 24 तासांपासून मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हिमायतनगर तालुक्यातील दुय्यम बाजारपेठ असलेले कामारी गाव हे बहुसंख्य लोकसंख्येचे असून गावाला लागून असलेल्या पैनगंगा नदीला मोठा पूर आल्यामुळे नदीचे पाणी गावात शिरले. परिणामी गावातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन व कापूस पिके पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यापूर्वी पावसा अभावी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसला होता. आता पुरामुळे पुन्हा मोठा धक्का बसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ठाम मागणी शेतकरी पुत्र महेश शिरफुले कामारीकर यांनी न...
Tipper swept away : बिलोली तालुक्यात टिपर पुराच्या पाण्यात वाहून! चालक बालबाल बचावला

Tipper swept away : बिलोली तालुक्यात टिपर पुराच्या पाण्यात वाहून! चालक बालबाल बचावला

नांदेड, महाराष्ट्र
बिलोली,गंगाधर मठवाले| शहापूर-बिलोली तालुक्यातील खतगाव येथून मुरुमाने भरलेला टिपर पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज चुकल्याने नदीच्या पाण्यात वाहून गेला. सुदैवाने वाहनचालकाने प्रसंगावधान राखल्याने तो थोडक्यात बचावला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे छोट्या नद्यांना पूर आला आहे. तरीसुद्धा मुरुम वाहतुकीसाठी टिपर चालवल्याने जनतेत प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. "वाहनचालक जीव मुठीत घेऊन गाडी चालवतोय का?" असा सवाल परिसरात चर्चेत आहे....
Kandhar News : कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे भिंत कोसळून आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ठार 

Kandhar News : कंधार तालुक्यातील कोटबाजार येथे भिंत कोसळून आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ठार 

नांदेड, महाराष्ट्र
कंधार, सचिन मोरे | गेल्या दोन दिवसापासून कंधार तालुक्यात पावसाने रौद्ररूप धारण केले असून संततधार पावसामुळे गाढ झोपेत असलेले पती पत्नीवर भिंत कोसळून ते जागीच ठार झाल्याची ऱ्हदयद्रावक घटना तालुक्यातील कोटबजार येथे घडली असून या वृध्द दाम्पत्याच्या दुर्दैवी निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबत कोटबाजार ग्रामस्थांच्या वृतानुसार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हसीना बेगम शेख नासेर (वय ६८ वर्ष) व त्यांचे पती माजी ग्रामपंचायत सदस्य शेख नासेर शेख अमीन (वय ७२ वर्ष) हे आपले रोजचे दैनंदिन कामकाज आटोपून नेहमी प्रमाणे जेवण करून गाढ झोपेत होते. गेल्या दोन तीन दिवसापासून तालुक्यामध्ये मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असून या पावसामुळे नदी नाले यांना प्रचंड प्रमाणात पुर आला आहे. या सततच्या पावसामुळे अनेक नागरिकांची घरे कोसळत आहेत. तर काही ठिकाणी गुरेढोरे देखील वाहून गेल्याचे समजते. याच पार्श्वभूमीव...
Guardian Minister Atul Save : नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

Guardian Minister Atul Save : नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
· मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन · शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी · शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नांदेड| केंद्र व राज्य शासनाच्यावतीने समाजातील सर्व घटकांसाठी विविध लोकाभिमुख योजना राबविण्यात येत आहेत. यात प्राधान्याने शेतकरी, सामान्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे. सर्वच क्षेत्रात नांदेड जिल्ह्याची वाटचाल प्रगतीशिल असून, जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या सर्वांचे स्मरण करुन त्यांनी यावेळी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त ...
Independence Day : मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

Independence Day : मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे. आज भारताच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य अतिशय वेगाने पुढे जात आहे. विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्र विशेष योगदान देत आहे. देशाची ही विकासगाथा यापुढे थांबणार नाही. प्रधानमंत्री यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे, हा नारा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याकरता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. या समारंभाप्रसंगी संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी म...
Sonkhed Police : नांदेड परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या मूल्यमापनात सोनखेड पोलीस ठाणे सलग चौथ्यांना अव्वल

Sonkhed Police : नांदेड परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या मूल्यमापनात सोनखेड पोलीस ठाणे सलग चौथ्यांना अव्वल

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| परिक्षेत्रातील (91) पोलीस ठाण्यांचे पोलीस कामकाजाशी संबंधित विषयावर दर महिन्यास परिक्षण करुन त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याची योजना नांदेड परिक्षेत्रात मागील नोव्हेंबर महिन्यापासून सुरु करण्यात आली आहे.  गुन्हे निर्गती, गुन्हे उघडकीस आणण्याचे व मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाण, अर्ज चौकशी, चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट, समन्स व वॉरंट बजावणी, फरारी व पाहिजे असलेले आरोपी अटक करणे, प्रतिबंधक कार्यवाही, दोषसिध्दी, सीसीटीएनएस, अभिलेख अद्यावतीकरण, अवैध व्यवसाय विरोधी कारवाई इत्यादी बाबत प्रत्येक पोलीस स्टेशनने केलेल्या कामगिरीचे दरमहा परिक्षण करण्यात येते. उपरोक्त महत्वाच्या विषयात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन पोलीस ठाण्यांना प्रत्येक महिन्यास अनुक्रमे 5,000, 3,000 व 2,000 रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येते. नांदेड परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या ए...
Independence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Independence Day celebrated : हिमायतनगर तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील तहसील कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एक दिवस आधीपासूनच देशभक्तीच्या वातावरणात सजावट व तयारी करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. सकाळी ९:०५ वाजता तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सौ. पल्लवी टेमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर पोलिस बांधवांनी तिरंग्याला मानवंदना दिली. तहसीलदार टेमकर यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, नायब तहसीलदार पंगे, नगरपंचायतीचे महाजन, बोकारे आदी मान्यवरांसह विविध शासकी...
error: Content is protected !!