Thursday, May 21

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Godavari river bridge ; गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी, वाहतूक बंद,मुझामपेठ भागातील नदीकाठच्या नागरीकांचे स्थलांतर

Godavari river bridge ; गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी, वाहतूक बंद,मुझामपेठ भागातील नदीकाठच्या नागरीकांचे स्थलांतर

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l जुन्या नांदेडात जाणाऱ्या येणाऱ्या गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजुंनी मनपाच्या वतीने बॅरिकेड्स लावुन दोन्ही बाजुंनी बंद करण्यात आली. तर धनेगाव/मुजामपेठ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या नदीकाठच्या जुने व नवे मुजामपेठ येथील जवळपास शंभर निवासस्थानी पाणी शिरल्याने व प्रवाहात वाढ झाल्याने जिल्हा परिषद शाळा जूने मुजामपेठ व नविन मुजा मपेठ येथे कुटूंब स्थलांतरित करण्यात आली असून राहण्याची व जेवणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव /मुजामपेठ यांच्या कडून करण्यात आली आहे, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ व नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी पाहणी केली आहे. दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे विष्णुपुरी जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने व संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या धनेगाव/ मुजामपेठ ग्रामपंचायत कार्यालय अंतर...
CIDCO ; संततधार पावसामुळे सिडको परिसरातील अनेक निवासस्थानी पाणीच पाणी,आ.हेमंत पाटील, आ.बोढारकर, उपमहापौर विनय पाटील गिरडे,संजय घोगरे यांनी केली पाहणी

CIDCO ; संततधार पावसामुळे सिडको परिसरातील अनेक निवासस्थानी पाणीच पाणी,आ.हेमंत पाटील, आ.बोढारकर, उपमहापौर विनय पाटील गिरडे,संजय घोगरे यांनी केली पाहणी

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l सिडको हडको परिसरातील भागात दोन दिवसांपासून झालेल्या संततधार व 28 ऑगस्ट रोजी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिडको हडको परिसरासह विविध भागातील निवासस्थानी व सिडको भागातील एन.डी.42 भागातील जवळपास दोनशे घरात पाणी शिरल्याने परिसरातील नागरिकांनी घरातील पाणी काढले ,या परिसरातील मुख्य नाला व नालेसफाई न केल्याने, नव्याने मलसिरण लाईन तुंबलेल्या असल्याने पाणी घरात शिरले असल्याचा आरोप केला यावेळी शिवसेना आ.हेमंत पाटील, नांदेड दक्षिण आमदार आनंदराव पाटील बोढारकर व शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या सह भाजपा शहर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी पाहणी मनपा आयुक्त यांच्याशी संवाद साधला यावेळी लोकप्रतिनिधी अगोदर व मनपा अधिकारी नंतर आल्याचे पाहावयास मिळाले. वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड दक्षिण महानगर यांच्या वतीने मनपा सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन पंचनामा करून तात्काळ आर्थिक...
Flood Control : नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात :  योग्य ती खबरदारी घेवून बचावकार्य सुरु

Flood Control : नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात :  योग्य ती खबरदारी घेवून बचावकार्य सुरु

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच नांदेड शहरात काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, एसडीआरएफ, सीआरपीएफ, नांदेड मनपा व स्थानिक शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून शोध व बचाव कार्य युध्द पातळीवर सुरु आहे. पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासनकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून सर्व यंत्रणासोबत संपर्क व समन्वय ठेवून जिल्हा प्रशासनाची कार्यवाही सुरु आहे. या परिस्थितीत नागरिकांनी अति आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. नांदेड येथील पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या बटालीयनला बोलाविले आहे. तात्पुरते स्थलांतरीत नागरिकांन...
Urdhva Manar (Limboti) dam ; ऊर्ध्व मानार (लिंबोटी) धरणाचे सर्व १५ दरवाजे उघडले; मान्यड नदीपात्रात ७०हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Urdhva Manar (Limboti) dam ; ऊर्ध्व मानार (लिंबोटी) धरणाचे सर्व १५ दरवाजे उघडले; मान्यड नदीपात्रात ७०हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

नांदेड, महाराष्ट्र
लोहा l ऊर्ध्व मानार (लिंबोटी) धरण यंदा गुरुवारी(२८ ऑगस्ट,) रोजी सकाळी पूर्ण भरले सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धरणाचे सात दरवाजे दशांश पाच मीटरने उचलले त्यातून330 क्युमेंक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. पण धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत अहमदपूर, रेणापूर ,आंबेजोगाई या भागात जोरदार पाऊस झाल्याने दुपारी धरणाचे सर्व १५ दरवाजे दीड मीटर उचलण्यात आले.त्यातून नदीपात्रात ७०हजार ५८०क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. नदीकाठच्या१३ गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर आमदार प्रतापराव पाटील यांनी भरपावसात अतिवृष्टी झालेल्या भागांत जाऊन पाहणी केली .प्रशासनाना सूचना केल्या पूरपरिस्थिती ओढवलेल्या भागातील नागरिकांना दक्षता घेण्याचे अहवान केले उर्ध्व मानार प्रकल्प ( लिंबोटी ) धरणाची पाणी पातळी- 447.56 मिटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा- 75.09 द.ल.घ.मी. इतका आहे धरण पूर्ण भरले आहे. गुरुवा...
Health center closed : उपचाराअभावी कलंबर बू. येथील शेतकऱ्याचा मृत्यू ;आरोग्य केंद्राला ठोकले टाळे

Health center closed : उपचाराअभावी कलंबर बू. येथील शेतकऱ्याचा मृत्यू ;आरोग्य केंद्राला ठोकले टाळे

नांदेड, महाराष्ट्र
उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे कलंबर (बु) लोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २६ ऑगस्ट डॉ.अनुपस्थित असल्याने एका शेतकऱ्याचा जीव गेला. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. शेतकरी मारुती लक्ष्मण सपूरे (रा. कलंबर बु.) यांनी २६ ऑगस्ट रोजी कर्जाला कंटाळून विष प्राशन केले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी कलंबर बू.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथे एकही डॉक्टर हजर नसल्याने तातडीने नांदेडच्या शासकीय रुग्णालयाकडे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत संतप्त गावक-यांनी दि.२७ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावून आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तिव्र नाराजी व्यक्त केली. ही बातमी समजताच कलंबर सर्कलचे माजी जि.प.सदस्य बालाजी परदेशी...
Nizamsagar opened : निझामसागरचे २७ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

Nizamsagar opened : निझामसागरचे २७ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
देगलूर/कामारेड्डी,अमृत गोजे, गंगाधर मठवाले| तेलंगणा राज्यातील कामारेड्डी परिसरात झालेल्या ढगफुटी पावसामुळे निझामसागर धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले असून वाझरा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने मेदनकलूर गावात पाणी शिरले. परिणामी प्रशासनाने तात्काळ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. नदीकाठावरील शेळगाव, तमलूर, सागवी, उमरशेवाळा, शेकापूर या गावातील नागरिकांनी विधिवत गणेशपूजन करून रात्रीच गाव सोडून नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे. पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नरगल इंग्लिश स्कूल (शहापूर), विठ्ठलेश्वर मंगल कार्यालय (शहापूर), सिद्धेश्वर मंगल कार्यालय (देगलूर) यांसह अन्य ५ ठिकाणी पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे उभारली आहेत. पूराच्या पाण्यामुळे करडखेड–उदगीर, बळेगाव–देगलूर, भोकसखेडा–नांदेड, लखा–वझरगा, तुपशेळगाव–कुरुडगी, नर...
Maratha : आरक्षण घेतल्याशिवाय आता परतणार नाही मराठा सेवकांचा निर्धार!

Maratha : आरक्षण घेतल्याशिवाय आता परतणार नाही मराठा सेवकांचा निर्धार!

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदान येथे आमरण उपोषण आंदोलनाचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना दि.26 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी ता. अंबड जि.जालना या ठिकाणी मुक्कामासाठी बोलवले होते. दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली येथून मनोज जरांगे पाटील समाज बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघणार होते, त्याच अनुषंगाने पूर्ण मराठवाड्यात गेले दोन महिने झाले मराठा सेवकांनी वाड्या–तांडे अक्षरशः झोडपून काढले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी कशी रास्ता आहे, ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण का हव आहे, मराठा समाजाची खालवलेली परिस्थिती, विद्यार्थ्यांची दशा सर्वच गोष्टी या विचार करायला भाग पाडणाऱ्या नक्कीच आहेत. मराठा समाज आज घडीला हतबल झाला असून मराठा समाजाची आर्थिक विवंचना दूर करायचे असेल सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजात...
DJ-free Ganeshotsav : पर्यावरणपूरक व डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

DJ-free Ganeshotsav : पर्यावरणपूरक व डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड| बुधवार पासून गणपती उत्सवास प्रारंभ होत असून, यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व डीजे मिक्स करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव, अतिरिक्त मनपा आयुक्त गिरीश कदम, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख तसेच विविध संबधीत विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. मनपा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागांनी यांनी त्यांच्या स्तरावरील कामे दिलेल्या निर्देशानुसार विहित वेळेत पूर्ण करावीत. यावेळेस गणपती विसर्जनाच्या दिवशी जीव रक्षकांची संख्या वाढविण्यात आली असून स्वयंसेवकांचे सहाय्य घेण्यात ...
Vande Bharat Express : नांदेड- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Vande Bharat Express : नांदेड- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड| मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासन येथील गतिमान दळणवळणावर भर देत आहे. ' वंदे भारत एक्सप्रेस' ने नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आले असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश कुमार पांडे, विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न...
Vande Bharat Express : हजूर साहिब नांदेड – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ २६ ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते

Vande Bharat Express : हजूर साहिब नांदेड – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ २६ ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड | मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी हजूर साहिब नांदेड – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू झाली. हा कार्यक्रम नांदेड रेल्वे स्टेशनवर झाला असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी केंद्रीय व राज्य मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित राहतील. ही गाडी मूळ जालना – मुंबई सीएसएमटी – जालना वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार असून आता ती हजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. या गाडीचा क्रमांक २०७०५/२०७०६ असा असून ती नांदेड व मुंबईदरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावेल. नांदेडहून ही गाडी बुधवारी सुटणार नाही, तर मुंबईहून ती गुरुवारी सुटणार नाही. प्रवास अधिक वेगवान व आरामदायी एकूण ६१० किलोमीटर अंतर ही गाडी ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करेल. वंदे भारतमध्ये २० डब...
error: Content is protected !!