Monday, July 6

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Vande Bharat Express : नांदेड- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Vande Bharat Express : नांदेड- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
नांदेड| मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासन येथील गतिमान दळणवळणावर भर देत आहे. ' वंदे भारत एक्सप्रेस' ने नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आले असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश कुमार पांडे, विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या न...
Vande Bharat Express : हजूर साहिब नांदेड – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ २६ ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते

Vande Bharat Express : हजूर साहिब नांदेड – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ २६ ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड | मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी हजूर साहिब नांदेड – मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू झाली. हा कार्यक्रम नांदेड रेल्वे स्टेशनवर झाला असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी केंद्रीय व राज्य मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित राहतील. ही गाडी मूळ जालना – मुंबई सीएसएमटी – जालना वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार असून आता ती हजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. या गाडीचा क्रमांक २०७०५/२०७०६ असा असून ती नांदेड व मुंबईदरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावेल. नांदेडहून ही गाडी बुधवारी सुटणार नाही, तर मुंबईहून ती गुरुवारी सुटणार नाही. प्रवास अधिक वेगवान व आरामदायी एकूण ६१० किलोमीटर अंतर ही गाडी ९ तास २५ मिनिटांत पूर्ण करेल. वंदे भारतमध्ये २० डब...
Guardian Minister Atul Save : नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू – पालकमंत्री अतुल सावे

Guardian Minister Atul Save : नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू – पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी, मुक्रमाबाद या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होवून मोठया प्रमाणात हानी झाली. अनेक घरांची पडझड झाली तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. या सर्व नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. पालकमंत्री यांनी आज मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावणगाव, भासवाडी, मुक्रमाबाद या पूरग्रस्त गावांना भेट देवून पूराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी र...
Sahasrakund Project permanently cancelled : केवळ स्थगिती नको… आता सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प कायमस्वरूपी रद्द झालं पाहिजे

Sahasrakund Project permanently cancelled : केवळ स्थगिती नको… आता सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प कायमस्वरूपी रद्द झालं पाहिजे

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| “जय जवान जय किसान… जान देंगे जमीन नहीं” जमीन आमच्या हक्काची नाहीं कुणाच्या बापाची.... या घोषणांनी कामारी परिसर दणाणून गेला. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प पैनगंगा धरणाच्या विरोधात हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे रविवारी (दि.२४ ऑगस्ट) भव्य महाएल्गार सभा आठ दिवसाखाली झालेल्या अतिवृष्टीच्या पुराणे गावाला वेढा घातला त्याच हनुमान मंदिर परिसरात पार पडली. यावेळी धरण म्हणजे तुमचं आमचं मरण आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्या असे आवाहन करण्यात आले. तसेच निगनूर येथे होणार सहस्रकुंड जलविददूत प्रकल्प हद्दपार करा, मिटवून टाका, बंद करा, आणि पर्याय शोधून सिंचनाचा प्रश्न सोडवा, नदीवर 10 किमीवर बैरेजेस बांधा, सोलर मधून विज उत्पन्न करा, असा संदेश शासनाला प्रमुख मार्गदर्शक वक्त्यांनी दिला. हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठावरील कामारी गावात संपन्न झालेल्या महाएल्गार सभेच्या अ...
S. P. Abinash Kumar : संकेत दिघे हदगाव ठाण्याचा प्रशासकीय कालावधी पूर्ण करतील – जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार

S. P. Abinash Kumar : संकेत दिघे हदगाव ठाण्याचा प्रशासकीय कालावधी पूर्ण करतील – जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा | हदगाव पोलीस ठाण्याला नुकतेच नियुक्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे (Sanket Dighe) यांचा पूर्ण प्रशासकीय कार्यकाळ हदगावमध्येच राहील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार (Abinash Kumar) यांनी दिली. ते गणेशोत्सवानिमित्त गुरुवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीनंतर ते नांदेड न्यूज लाईव्हशी बोलत होते. मागील तीन वर्षांत हदगाव पोलीस स्टेशनमध्ये वारंवार बदल्या झाल्याने कोणत्याही निरीक्षकाला कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. परिणामी पोलिसांचे गुन्हेगारीवरील नियंत्रण कमी झाले होते. या संदर्भात तालुका प्रतिनिधी शेख चांदपाशा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एसपींनी दिघे यांच्या कार्यकाळाबाबत आश्वासन दिले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हदगाव तालुक्याचे सामाजिक व राजकीय वातावरण “आदर्श” असल्याचे सांगितले. “विविध राजकीय पक्षांचे नेते परस्पर सहक...
heavy rains and floods :अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याबाबतच्या सूचना

heavy rains and floods :अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याबाबतच्या सूचना

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| दिनांक 14, 15, 16, 17 व 18 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. या अनुषंगाने वेळोवेळी जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त या आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील महत्त्वाच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तरी संबधित यंत्रणानी यांची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत. जीवितहानी टाळण्याकरिता उपाययोजना पूर परिस्थिती अतिवृष्टी किंवा इतर कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी होणार नाही याची पूर्ण दक्षता प्रशासनाने व क्षेत्रीय यंत्रणेने घ्यायची आहे. त्याअनुषंगाने येणाऱ्या आपत्ती बाबत मिळालेली अधिकृत सूचना ही लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे याबाबत सर्व क्षेत्रीय य...
District Magistrate ; आपत्ती प्रतिसाद दलाचे काम अतुलनीय जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

District Magistrate ; आपत्ती प्रतिसाद दलाचे काम अतुलनीय जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर #पाऊस व #अतिवृष्टी झाल्याने काही गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी मदत व बचाव करण्यासाठी नांदेड येथे मागील दोन महिन्यांपासून तैनात असलेली राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी जिल्हाप्रशासनाने तातडीने पाठविली. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीचे #कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले. मुखेड तालुक्यातील 17 व 18 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस व अनेक मंडळात अतिवृष्टी झाली होती. दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी मंडळात ३५४.७५ मिमी व मुक्रामाबाद मंडळात २०६.७५ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे हसनाळ, रावणगाव, भासवाडी व भिंगोली या गावात पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ अडकून पडले होते. दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ०२:३० वाजता हसनाळ ...
Lendi flood area ; लेंडी बुडीत क्षेत्रातील दुर्घटनेवर शिवसेनेचा संताप – तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याकडे आर्थिक मदतीची मागणी

Lendi flood area ; लेंडी बुडीत क्षेत्रातील दुर्घटनेवर शिवसेनेचा संताप – तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याकडे आर्थिक मदतीची मागणी

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र
मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील दुर्घटनेत गावकऱ्यांचे मोठे हाल झाले असताना शासन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे १२ जणांचा बळी गेला. शेकडो जनावरे दगावली, शेतपिके व घरे वाहून गेली, शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तरीसुद्धा महाराष्ट्र शासन व स्थानिक आमदार गप्प बसले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने थेट तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याकडे धाव घेत तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे. हैदराबाद येथे नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शिवसेनेचे पाटील यांनी सांगितले की, लेंडी प्रकल्पातील ६० टक्के पाणी तेलंगणाचा वाटा असल्याने या आपत्तीत बाधित कुटुंबांना, शेतकऱ्यांना, मजुरांना व गोरगरीबांना तेलंगणा सरकारकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर व्हावी. प्रशासनाने ...
rescue operation : रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे राबवून प्रशासनाने केले पुरग्रस्तांचे मदतकार्य सुरू

rescue operation : रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे राबवून प्रशासनाने केले पुरग्रस्तांचे मदतकार्य सुरू

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| पूरग्रस्त भागात येणाऱ्या मौजे सिरपल्ली गावातील एक गर्भवती महिलेला बोट च्या सहाय्याने सुखरूप बाहेर आणले आहे. सदर गर्भवती महिलेस पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे पाठवण्यात आले आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाची टीम आणि महसूल विभागाची टीम कार्यरत आहे. मागील पाच दिवसांपासून अतिवृष्टी व इसापूर धरणाच्या विसर्गामुळे शिरपल्ली व डोल्हारी गावांचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. रस्ते व पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने प्रशासनाला या गावात पोहोचणे अशक्य झाले होते. आज दिनांक २१ रोजी हादगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या नेतृत्वात व नायब तहसीलदार एच. जी. पठाण यांच्या पुढाकारातून महसूल विभाग व वैद्यकीय पथकाने बोटीच्या सहाय्याने या गावात प्रवेश केला. गावात पोहोचताच पथकाने तात्काळ आरोग्य सेवा स...
Rahegaon ; उपविभागीय अधिकारी खल्लाळ व तहसीलदार वारकड यांच्यी राहेगाव येथे भेट व पाहणी..

Rahegaon ; उपविभागीय अधिकारी खल्लाळ व तहसीलदार वारकड यांच्यी राहेगाव येथे भेट व पाहणी..

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील राहेगाव येथील पुलावर गोदावरी नदीच्या देवापूर बंधाराचा बाक्य वाॅटर मुळे आलेल्या पुरामूळे आठेचाळीस तासांपासून गावकऱ्यांचा संपर्क तुटल्यामुळे या ठिकाणी नांदेड उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ व नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी19 ऑगस्ट रोजी भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले. नांदेड येथील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे देवापुर बंधाराचा बाक वाॅटर मुळे राहेगाव येथील गावकऱ्यांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटला होता, किक्की येथुन गावकरी यांना जाणे येणे होत नव्हते,अखेर सरपंच विलास पाटील इंगळे व पोलीस पाटील प्रतिनिधी संजय पाटील इंगळे यांनी महसूल प्रशासनानाशी संपर्क साधुन आवश्यक ती मदत करण्याची मागणी केली होती. नांदेड उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ व नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी संबंधित स्थळी भेट देऊन पाहण...
error: Content is protected !!