Thursday, May 21

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Yeilwad Family ; लाकडी लक्ष्मीचा त्याग ; सुनबाईचे केले गौरीपूजन -येईलवाड परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम!

Yeilwad Family ; लाकडी लक्ष्मीचा त्याग ; सुनबाईचे केले गौरीपूजन -येईलवाड परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम!

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
कंधार, सचिन मोरे| सबंध महाराष्ट्रामध्ये सासर कडून सुनेचा छळ झाल्याच्या अनेक घटना आजही नेहमीच घडत असतात. चित्रपटातून देखील सासूला 'खलनायिका' दाखवल्याचे पहावयास मिळते. सासू व सुनेच्या नात्यांमध्ये भांडणाची परंपरा तशी जुनीच आहे. सासू व सुनेमध्ये नेहमीच वाद होत असतात. वादाचे रूपांतर अनेक वेळेस हाणामारी मध्ये झाल्याचे ऐकण्यात आहे. या सर्व कटू आठवणी हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जि.प.सदस्य रामचंद्र येईलवाड व परिवाराने ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी लाकडी लक्ष्मीचा त्याग करत आपल्या तीन सुनांचे ज्येष्ठ व कनिष्ठ गौरी म्हणून पूजन करत समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गौरी पूजनाचे हे त्यांचे पाचवे वर्ष आहे. हिंदू संस्कृतीमध्ये गौरी पूजनास अनन्य साधारण महत्व आहे. सबंध देशांमध्ये घराघरात लक्ष्मीचे मोठ्या थाटामाटात देखावे सजावट करत पूजन ...
flood-affected areas : देगलूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी न केल्याने पालकमंत्र्यांचा निषेध

flood-affected areas : देगलूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी न केल्याने पालकमंत्र्यांचा निषेध

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून, अनेक गावांमध्ये घरे, धान्यसाठा व जनजीवन विस्कळीत झाले आहे. तरीही पालकमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी न करता तालुक्यातून निघून गेल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी पसरली असून त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे. तेलंगणातील निझामसागर धरणाच्या कामारेड्डी परिसरात ढगफुटी झाल्याने धरणाचे तब्बल २७ दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे वाझरा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊन नदीकाठच्या गावात पाणी शिरले. परिणामी शेतीचे अतोनात नुकसान झाले, तर अनेक घरातील अन्नधान्य व साहित्य पाण्यात भिजून नष्ट झाले. याशिवाय कंधार तालुक्यात रेकॉर्डब्रेक २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने ते पाणी देगलूर तालुक्यातील १०-१२ गावात शिरले. त्यामुळे पिके पूर्णपणे भुईसपाट झाली, घरांची व जना...
Guardian Minister Atul Save : आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे

Guardian Minister Atul Save : आपत्तीग्रस्तांना मदत व पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करणार : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नांदेड शहरासह तालुक्यातील अनेक गावात पुरपरिस्थिती निर्माण होवून नागरिक पाण्यात अडकले होते. जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने आर्मी, एसडीआरएफ टीम व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदत व बचाव कार्य वेगाने करुन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांना मदत व त्यांच्या पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली. नांदेड शहरात व जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त गावांना भेट देवून त्यांनी आज नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. आज सकाळी पालकमंत्री श्री. सावे यांनी नांदेड शहरातील श्रावस्तीनगर, विष्णुनगर भागात भेट देवून त्या भागाची पाहणी...
SDRF team safely rescued : मेदनकल्लूर गावातील 8 नागरिकांना पुराच्या पाण्यातून एसडीआरएफ टीमने काढले सुखरुप बाहेर

SDRF team safely rescued : मेदनकल्लूर गावातील 8 नागरिकांना पुराच्या पाण्यातून एसडीआरएफ टीमने काढले सुखरुप बाहेर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/देगलूर| नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामधील मेदनकल्लूर या गावामध्ये 8 लोक पुराच्या पाण्यामुळे अडकलेले होते. दिनांक 27 ऑगस्टपासून निजामसागर धरणाचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे त्याचा फटका देगलूर तालुक्यामधील तमलूर, मेदनकल्लूर, उमर सांगवी या गावांना बसला. त्या अनुषंगाने प्रशासनामार्फत 27 ऑगस्ट रोजी प्रत्येक गावी भेट देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन करण्यात आले होते. मेदनकल्लूर गावांमधील 8 व्यक्तींना प्रशासनामार्फत वेळोवेळी संपर्क साधून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आवाहन केले होते. तरी देखील संबंधित व्यक्ती गावामधून बाहेर पडले नाहीत. 28 ऑगस्ट रोजी प्रशासना मार्फत संबंधित व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी गेले असता संबंधित व्यक्ती पळून जाऊन गावामध्ये लपून बसले. परंतु पाण्याचा प्रवाह वाढतच राहिल्याने प्रशासनाने काल 29 ऑगस्ट 2025 रोजी एसडीआरएफ टीमच्य...
Nanded administration : नांदेड प्रशासनाची तत्परता ! पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी व्यवस्था

Nanded administration : नांदेड प्रशासनाची तत्परता ! पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी व्यवस्था

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी बिलोली तालुक्यातील मौजे नागनी येथील मांजरानदी पात्राचे पाणी गावात शिरून काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागनी गावातील महिला व नागरिक यांना कुंडलवाडी येथे के रामलू मंगल कार्यालय येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. येथे प्रशासनाच्यावतीने त्याच्या निवास व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बऱ्याच गावात पुराचे पाणी आले. अनेक नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य करुन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. नांदेड येथील सीआरपीएफ च्या मदतीने नायगाव तालुक्यातील कुंचेली येथील 80 नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केले आहे. मदतकार्य - नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासन नेहमी दक्ष असून सतत तत्परतेने कार्यवाही करत आहे. 28 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टी...
Strong resentment : पूरग्रस्तांमध्ये पालकमंत्र्यांविरोधात तीव्र नाराजी

Strong resentment : पूरग्रस्तांमध्ये पालकमंत्र्यांविरोधात तीव्र नाराजी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, गोविंद मुंडकर| बिलोली तालुका नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी रविवारी दौरा केला. मात्र, कुंडलवाडी येथील के. रामलू सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पूरपीडित नागरिकांशी संवाद साधला गेला नाही, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या स्थलांतरित ग्रामस्थांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली की – 👉 “सामान्यासाठी पालकमंत्री नाहीत, ते फक्त पुढे पुढे करणाऱ्यांसाठीच आहेत... आम्हाला दिलासा नव्हे तर दिखावा दिसत आहे.” पूरग्रस्तांचे म्हणणे आहे की प्रत्यक्ष मदत, अन्नधान्य, निवारा व वैद्यकीय सुविधा तातडीने मिळणे गरजेचे असताना, केवळ औपचारिक दौऱ्यांनी प्रश्न सुटत नाहीत. खरी मदत आणि आधार आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांच...
Kandhar Flood : कंधार तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी ; दोन तलाव फुटले : जगतुंग तलाव तुडुंब, ४४ जनावरे वाहून गेले

Kandhar Flood : कंधार तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी ; दोन तलाव फुटले : जगतुंग तलाव तुडुंब, ४४ जनावरे वाहून गेले

नांदेड, महाराष्ट्र
कंधार, सचिन मोरे| गेल्या ४८ तासापासून कंधार तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील चिखली,बोरीचा तलाव फुटला तर ४४ जनावरे वाहून गेले.दोन गावे पुराच्या पाण्याने वेढलेले आहेत.बाधित गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. तसेच तालुक्यातील अतिवृष्ठीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली त्यामुळे शेतकऱ्याचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दि.७ आगस्ट च्या रात्रीपासून कंधार तालुक्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे, जवळपास ३० ते ३५ गावात पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे. तर तालुक्यातील चिखलीचा भवानी तलाव व बोरीचा तलाव फुटला असून नंदनवनच्या तलावास धोका निर्माण झाल्यामुळे सांडवा खोदण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. तालुक्यातील २१ पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला. लिंबोटी धरणाचे १५ दरवाजे उघडल्यामुळे पुराचे पाणी मन्याडीत ...
Minister Atul Save : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : पालकमंत्री अतुल सावे

Minister Atul Save : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करुन अहवाल शासनाकडे सादर करावा. जेणेकरुन नुकसानग्रस्तांना तातडीने नुसान भरपाई देण्यात येईल, असे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रविंद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकार...
MLA Bhimrao Keram : संपूर्णता अभियान सन्मान व आकांक्षा हाटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन

MLA Bhimrao Keram : संपूर्णता अभियान सन्मान व आकांक्षा हाटचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा सन्मान आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते एन. के. गार्डन किनवट येथे करण्यात आला. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत समावेशित 500 तालुक्यात जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आले होते. यात किनवट तालुक्याने 6 पैकी 4 निर्देशक संतृप्त केले आहेत. किनवट तालुक्याने राज्यातील 27 तालुक्यातुन तिसरे स्थान प्राप्त करून यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते तालुकास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तत्कालीन गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांना पदक व प्रशस्तीपत्र तर संबंधित विभागप्रमुख, अधिकारी व गावपातळीवरील कर्मचारी यांचा आज प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भीमराव केराम,...
Manjara river : मांजरा नदी किना-यावरील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली,अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले

Manjara river : मांजरा नदी किना-यावरील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली,अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले

तेलंगणा, नांदेड, महाराष्ट्र
बिलोली/नांदेड, गोविंद मुंडकर| बिलोली तालुक्यात दि. २७ ऑगस्टच्या मध्यरात्री पासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. अशातच तेलंगानातील निजामसागर धरणातून सोडलेल्या २७ गेटमधील निसर्गाच्या पाण्यामुळे बिलोलीच्या सिमेवरुन वाहणाऱ्या मांजरा नदीला पुर आला आहे. या पुरामुळे मांजरा व मन्याड नदी काठावर असलेल्या गावांसह हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाली आहे. धोक्याच्या पातळीवरून वाहणा-या मांजरा नदीच्या पुर परिस्थिती बाबत खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मांजरा व मन्याड नदी काठावरील काही गावातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविले असून प्रशासन या पुर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बिलोली तालुक्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या मांजरा व मन्याड नदी पात्राच्या पाणी पातळीत गेल्या दोन दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. तेलंगणातील मांजरा नदी पात्राव...
error: Content is protected !!