Sunday, July 5

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Chief Minister Devendra Fadnavis : सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत; दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत; दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, महाराष्ट्र, लातूर
लातूर| राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, आमदार राणा जगजितसिंह ...
Vasundhara Payi Dindi : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या वतीने वसुंधरा पायी दिंडीचे आयोजन

Vasundhara Payi Dindi : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या वतीने वसुंधरा पायी दिंडीचे आयोजन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नागपूर ते नाणीजधाम या पायी दिंडीतून पर्यावरण रक्षणाचा जागर संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या वसुंधरा पायी दिंडीला आज १३ वा दिवस पूर्ण झाला असून हिंगोली जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. कै. बाबुराव देशमुख विद्यालय, डोंगरकडा (ता. हिंगोली, कळमनुरी) येथे सकाळी साडेसहा वाजता पूजा करून दिंडीचा नांदेड जिल्ह्यात प्रवेश झाला. त्यानंतर पार्डी (ता. अर्धापूर) येथील केसरिया संभाजी टोलनाक्याजवळ भोकर विधानसभा काँग्रेसचे युवा नेतृत्व तिरुपती पाटील कोंडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण व यात्रेकरूंना नाश्त्याचे वाटप करण्यात आले. तब्बल ४० दिवसांचा आणि ११२० कि.मी.चा हा प्रवास असून, हजारो श्रद्धाळू यात्रेकरू पायी चालत नाणीजधाम गाठणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वृक्षारोपण, युवकांद्वारे पथनाट्य सादर करून वसुंधर...
corruption in development works : सरसम व पोटा बिटमधील विकासकामांवर भ्रष्टाचाराचा डोंगर; दोषींवर कारवाईची मागणी

corruption in development works : सरसम व पोटा बिटमधील विकासकामांवर भ्रष्टाचाराचा डोंगर; दोषींवर कारवाईची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर (अनिल मादसवार) सरसम (दूधड–वाळकेवाडी) व पोटा (सोनरी फाटा परिसर) या दोन्ही बिटमध्ये 2024-25 या कालावधीत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून मजुरांमार्फत नव्हे तर थेट JCB मशीनद्वारे झाडे लावली तर काही ठिकाणी थेट दगडगोट्यामध्ये झाडे लावल्याचे आढळून आले आहे. झाडांमधील अंतर नियमावलीनुसार न ठेवता मनमानी पद्धतीने लागवड करण्यात आली असून, जाळी व दगडी बंधाऱ्यांवर आवश्यक संरक्षणात्मक जाळी बसविण्यात आलेली नाही. तक्रारदार राजकुमार दगडू पवणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, माती तळी निकृष्ट दर्जाचे असल्याने ती वाया गेली असून, जंगल परिसरात सध्या झाडांची अनधिकृत तोड सुरू आहे. या कामांमध्ये मजुरांचे हक्काचे पैसे रोखून ते संबंधित अधिकाऱ्यांनी JCB मालक व स्वतःच्या फायद्यासाठी वळविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...
Farmars Demand : सरसकट कर्जमाफी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी

Farmars Demand : सरसकट कर्जमाफी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| यंदा जुलै महिन्यापासून हिमायतनगर तालुक्यात सततच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुर परीस्थीती निर्माण होऊन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे पुर येवुन पिके पुर्णपणे जमिनीसह वाहुन गेले आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत देण्यात यावी. अशी मागणी नायब तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निवेदन पाठवून हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावर्षी हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरस्थितीत अनेक शेतजमिनी पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टर शेती पिके वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक २४ रोजी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन, शेत...
Nanded ; वाढीव मदतीसाठी राज्य सरकारकडे मागणी करणार!: खा. अशोकराव चव्हाण ; नांदेड जिल्ह्यात पूररेषा बदलण्याची मागणी

Nanded ; वाढीव मदतीसाठी राज्य सरकारकडे मागणी करणार!: खा. अशोकराव चव्हाण ; नांदेड जिल्ह्यात पूररेषा बदलण्याची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l महाराष्ट्रात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला असून, शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला खा. रवींद्र चव्हाण, आ. राजेश पवार, भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. जिल्हाधिकारी व इतर प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या या बैठकीत नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व उपाययोजनांबाबत चर्चा झाली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ५५३ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी नुकसानाची तीव्रता पाहता वाढीव मदतीची आवश्यकता असल्याचे खा. अशोकराव चव्हाण याप्रसंगी म्हणाले. तेलंगणाती...
Journalist Protection act : पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा आत्मदहन करणार

Journalist Protection act : पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा आत्मदहन करणार

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड|  राज्यात पत्रकार संरक्षण कायदा येत्या २६ नोव्हेंबर पूर्वी म्हणजेच संविधान दिनाच्या पूर्वी लागू करावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या कक्षासमोर आत्मदहन करू असा इशारा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनाही पाठविले आहे. राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. पत्रकारांना कायद्याने संरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त , महाराष्ट्राच्या तमाम पत्रकारांचे पाठीराखे एस .एम. देशमुख यांनी तब्बल 40 वर्षे संघर्ष करून पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करून घेतला परंतु...
Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एस.टी. आरक्षण द्या – गोरसेनेची मागणी

Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एस.टी. आरक्षण द्या – गोरसेनेची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव (शेख चांदपाशा) निजाम प्रांतातील १९०१ ते १९४८ या काळात हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा, लमाण, लंबाडी समाजाची नोंद अनुसूचित जमात म्हणून करण्यात आली होती. त्यानुसार तेलंगणा व आंध्रप्रदेशातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत असताना, राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडा, विदर्भ व खानदेश महाराष्ट्रात आल्याने या समाजाचे आरक्षण काढून टाकण्यात आले व त्यांना विमुक्त जातीच्या प्रवर्गात टाकण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील बंजारा समाजावर अन्याय झाल्याचा आरोप गोरसेनेने केला आहे. मराठा–कुणबी समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण लागू होत असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीचे (एस.टी.) आरक्षण द्यावे, अशी मागणी गोरसेनेने हदगाव तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली. गोरबंजारा समाज...
Let’s go to Mumbai: आता पत्रकारांचेही “चलो मुंबई” — पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Let’s go to Mumbai: आता पत्रकारांचेही “चलो मुंबई” — पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पत्रकार संघटना आता रस्त्यावर उतरणार आहेत. विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच” च्या मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित बैठकीत “चलो मुंबई”चा नारा देत राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत नाशिक, त्र्यंबकेश्वर, मुंबई, अमरावती यासह राज्यातील पत्रकारांवरील झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ म्हणून पारित झालेल्या पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने तातडीने नोटिफिकेशन काढावे, असा ठराव या बैठकीत संमत झाला. 📅 आंदोलनाचा आराखडा : 11 ऑक्टोबर : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना राज्यभरातून हजारो एस.एम.एस. पाठवून मागण्यांकडे लक्ष वेधले जाईल. 25 नोव्हेंबर...
Journalists attacked : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; दोषींवर कठोर कारवाईची पत्रकार संरक्षण समितीची मागणी

Journalists attacked : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; दोषींवर कठोर कारवाईची पत्रकार संरक्षण समितीची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर, गंगाधर मठवाले| त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. या हल्ल्यातील सर्व दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. २० सप्टेंबर २०२५ रोजी 'झी २४ तास'चे ब्युरो चीफ योगेश खरे, 'साम टीव्ही'चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि 'पुढारी न्यूज'चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला आघात आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, तसे...
Marathwada ranks : मराठवाड्यातील देगलूर उपविभागीय कार्यालय राज्यात पहिल्या क्रमांकावर

Marathwada ranks : मराठवाड्यातील देगलूर उपविभागीय कार्यालय राज्यात पहिल्या क्रमांकावर

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर, गंगाधर मठवाले| महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत राज्यभरातील १३,५०० शासकीय कार्यालयांचा कार्यक्षमतेच्या निकषांवर आढावा घेण्यात आला. या आढाव्यात मराठवाड्यातील देगलूर उपविभागीय कार्यालयाने अव्वल स्थान पटकावले असून, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या नेतृत्वाखालील या कार्यालयाला पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा सन्मान मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, खासदार अजित गोपछडे, मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांसह अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. मोहिमेतील उपक्रम या विशेष मोहिमेत कार्यालयीन कामकाजात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा हे घटक महत्वाचे मानले गेले. देगलूर उपविभागीय ...
error: Content is protected !!