Saturday, May 16

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

The kind-hearted king of the world of friendship: Vijay Joshi : मैत्रीच्या दुनियेचा दिलदार राजा: विजय जोशी

The kind-hearted king of the world of friendship: Vijay Joshi : मैत्रीच्या दुनियेचा दिलदार राजा: विजय जोशी

नांदेड, मुंबई, लेख
मानवी जीवनामध्ये मैत्री एक असा दागिना आहे की, संपूर्ण जगतामध्ये या दागिन्याचे महत्त्व सर्वाधिक. आणि मग समान शिले समान व्यसनेसु सख्यम या न्यायाने आपले आहार आपले विचार आपले स्वातंत्र्य आपली अभिव्यक्ती आणि आपले छंद या सर्व प्रकारातून विविध मित्रांच्या गाठीभेटी आयुष्यभर होत असतात. जन्मापासून ते या जगाचा निरोप घेईपर्यंत अनेकविध पातळीवर आपण काम करत असतो, परंतु प्रत्येक ठिकाणी आपणाला भेटणारी माणसे त्यांच्याशी आपले होणारे अनुबंध आणि त्यातून निर्माण होणारा आनंद हा नेहमी सर्व आनंदांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो! अशाप्रकारे ओळख झालेला आणि अचानक जीवनामध्ये जिवलग मित्र बनून गेलेला आमचा हर हुन्नरी कलाकार कलंदर मित्र म्हणजे पत्रकार विजय जोशी! जे सामना पेपरचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून आहेत! विशेष म्हणजे विजय जोशी या नावाचं गारुड सगळ्या मित्रांनाच असतं! विजय जोशी हा माणूस अनेक विविध पातळीवर अनेक पैलू ब...
Sediment-free dam : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना महत्वाची

Sediment-free dam : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना महत्वाची

नांदेड, लेख
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेचे महत्व पाहता ही योजना राज्य शासनाकडून जोमाने राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातही ही महत्वांकाक्षी योजना राबविण्यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुढाकार घेवून जिल्ह्यातील अनेक तलाव, नदी, नाले यातील गाळ काढण्याचे काम पुढाकार घेवून मागील वर्षी केले. तेच कार्य आताचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही पुढे सुरु ठेवलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची कामे येत्या दोन महिन्यात विविध ठिकाणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी 13 प्रकल्पामधून एकूण 1 लाख 41 हजार 846 घमी गाळ काढण्यात आलेला आहे. तर यावर्षी 53 प्रकल्पातून 5 लक्ष 80 हजार 721 घ.मी गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. हे काम नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स, भारतीय जैन संघटना तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. प्...
Agristack Scheme – Digital Revolution in Agriculture ! ॲग्रीस्टॅक योजना – शेतीतील डिजिटल क्रांती !

Agristack Scheme – Digital Revolution in Agriculture ! ॲग्रीस्टॅक योजना – शेतीतील डिजिटल क्रांती !

नांदेड, लेख
शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल डाटाबेस तयार करून, शेतीविषयक सेवा अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जातील. नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. ॲग्रीस्टॅक म्हणजे काय? ‘ॲग्रीस्टॅक’ म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली. यात प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक (Unique Farmer ID) दिला जातो. या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. तसेच, पीककर्ज, विमा, अनुदान, खत व बियाणे या सर्व बाबतीत ही योजना उपयुक्त ठरेल. जिल्हयातील नोंदी ॲग्रीस्टॅक’ म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली. आतापर्यत जिल्...
Kanmantra : कानमंत्र – जागतिक महिला दिन विशेष

Kanmantra : कानमंत्र – जागतिक महिला दिन विशेष

लेख, नांदेड
जिने वाहिले नऊ मास ओझे.... जिने चिंतीले नित्य कल्याण माझे.... जिला मोद होतो देखोनी बाललीला .... नमस्कार माझा जन्मदात्या माऊलीला .... 8 मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने तुझं सगळीकडे कौतुक होईल. शेजारीपाजारी, मित्र आप्तेष्ट, तुला भरभरून शुभेच्छा देतील, तुझा उर अभिमानाने भरून येईल, तुला कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल. माझ्या सारखं कोणीही नाही. माझ्यामुळेच घर चालतं. मीच घरात सर्वश्रेष्ठ आहे असं वाटेल. पण सखी तुला खरच एक कानमंत्र देते. या महानपणाच्या, स्त्री पुरुष समानतेच्या पायदळी तुझा साजरा संसार, तुझी चिमुकली पिलं यात भरडली जाणार नाहीत याचं भान ठेव.... तुला खरच माझा राग येईल एक स्त्री असून प्रवाहाच्या विरुद्ध काय बोलते, स्त्री-पुरुष समानतेच्या युगात नमतं घ्यायला काय सांगते असंच वाटेल तुला. पण सखी तुला खरं सांगू बदल अचानक घडत नसतात. त्याला युगे लोटावी लागतात. पूर्वीच्या काळी म्ह...
Balance between daily work and personal life : दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन

Balance between daily work and personal life : दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन

नांदेड, नागपूर, मुंबई, लेख
आधुनिक जगात, जिथे कामाचा ताण आणि वेगवान जीवनशैली हे सर्वसाधारण बनले आहे, तिथे दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखणे हे एक आव्हानात्मक कार्य बनले आहे. कामाच्या ठिकाणी उच्च अपेक्षा, वेळेची कमतरता आणि वाढत्या जबाबदार्‍या यामुळे अनेकांना त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे दुर्लक्ष करावे लागते. परंतु, या दोन्ही बाजूंमध्ये योग्य संतुलन नसल्यास, ताण, थकवा आणि अगदी आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून, काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखणे हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर दीर्घकालीन आनंद आणि यशासाठी देखील आवश्यक आहे. दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन राखणे आजच्या धावपळीच्या जगात खूप महत्त्वाचे आहे. कामाच्या आणि वैयक्तिक जीवनातील ताण-तणाव कमी करण्यासाठी, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हे संतुलन आवश्यक आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये, दैनंदिन कामकाज आणि व...
Maharashtra government’s move towards raising indigenous cows : देशी गाईंच्या संगोपनात महाराष्ट्र शासनाची वाटचाल

Maharashtra government’s move towards raising indigenous cows : देशी गाईंच्या संगोपनात महाराष्ट्र शासनाची वाटचाल

नांदेड, लेख
महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य आहे आणि येथे विविध प्रकारच्या देशी गाईंच्या जाती आढळतात. यामध्ये मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील लाल कंधारी, लातूर जिल्ह्यातील देवणी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी, तर विदर्भात गवळाऊ जातींचा समावेश आहे. देशी गाईचे दूध हे मानवी आहारातील अत्यंत पोषणमूल्य असलेले पदार्थ आहे, ज्याचा उपयोग आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत आणि सेंद्रिय शेतीत मोठ्या प्रमाणावर केला जातो. देशी गाईंच्या दुधाचे मानवी आहारात स्थान असतेच, परंतु त्याचबरोबर देशी गाईंचे गोमूत्र व गोशेण यांचा सेंद्रिय शेतीसाठी महत्त्वपूर्ण उपयोग होतो. त्यामुळे, देशी गाईंच्या संख्येत होणारी घट ही चिंतेची बाब बनली आहे. महाराष्ट्रात देखील यामध्ये घट होत असताना, महाराष्ट्र शासनाने देशी गाईंच्या संरक्षणासाठी आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. चला, जाणून घेऊया महाराष्ट्र ...
Protecting the environment – ​​our duty : पर्यावरण जपणे – आपले कर्तव्य

Protecting the environment – ​​our duty : पर्यावरण जपणे – आपले कर्तव्य

लेख, नागपूर
पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक जिवाच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार. हवा, पाणी, सुपीक जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा समतोल टिकवून पर्यावरण आपल्याला जगण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी प्रदान करते. मात्र, मानवी हस्तक्षेप, औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या आणि जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. मात्र हा समतोल बिघडण्याची कारणे शोधून मानवाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. जागतिक तापमानवाढ, जलप्रदूषण, हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिवापर यामुळे पर्यावरण संकटात आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा हा दुष्काळप्रवण प्रदेश असल्याने येथे पाण्याची कमतरता, भूजल पातळी घटणे, आणि शेतीला होणारे नुकसान या समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत. त्यामुळे जलसंधारण आणि वृक्षसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. मराठवाड्यातील अवर्षण मराठवाडा हा पावसाच्या कमी प्रमाणामुळे कायमच ...

Marathwada ; मराठवाड्यात उद्योग टिकले पाहिजेत

लेख
मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजी नगर वगळता अन्य सात जिल्ह्यात उद्योगांची म्हणावी तशी प्रगती नाही. दळणवळणाची साधने असतील तर कुठलाही उद्योग टिकतो. मराठवाड्यातील लातूर व नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भेटले होते. परंतु या दोन्ही जिल्ह्यातही उद्योगांची पीछेहाटच आहे. आता मराठवाड्यात रोजगार मेळावे भरत आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून कुशल कामगार तर भेटतील, परंतु मराठवाड्यात उद्योग आहेत का हा प्रश्न बेरोजगार व तरुण वर्गाला भेडसावत आहे. मराठवाड्यात नवनवीन उद्योग आली पाहिजेत व ते टिकले पाहिजेत . या दृष्टीने हालचाली होणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनी मनावर घेतले तर मोठ-मोठे उद्योग मराठवाड्याच्या जमिनीवर सुरू होऊ शकतात. परंतु त्या नेत्यांची उद्योजकांना मनधरणी करण्याची मानसिकता नाही की काय?असा प्रश्न मराठवाड्यातील बेरोजगार व युवा वर्ग उपस्थित करत आहे. स्था...
Students take the exam without compromise! विद्यार्थ्यांनो बिनधास्त परीक्षा द्या ! १० वी,१२ वी तर सुरुवात आहे.. !!

Students take the exam without compromise! विद्यार्थ्यांनो बिनधास्त परीक्षा द्या ! १० वी,१२ वी तर सुरुवात आहे.. !!

नांदेड, लेख
सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. काहींच्या परीक्षा मध्यात आल्या आहेत. दोन ते तीन पेपर होऊन गेलेले आहेत. मात्र कुठून तरी निराशा जनक बातम्या येत राहतात. अशावेळी विद्यार्थ्यांना सांगणे आहे की, विद्यार्थ्यांनो दहावी,बारावी इतर आयुष्याची सुरुवात आहे.या परीक्षा म्हणजे तुमच्या आयुष्याची शेवटची परीक्षा नाही. या परीक्षेला कोणतीही निराशा, दुःख, नैराश्य न बाळगता पुढे जा... एखाद्या वर्षी एखादी परीक्षा देता आली नाही किंवा अपयश आले म्हणजे सर्वच संपत नाही जीवन हे सुरूच असते.... अनेक वेळा काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांचे पेपर बरोबर जात नाहीत. किंवा अपेक्षित त्याला लिहिता येत नाही. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा पेपरही देता येत नाही. अशावेळी निराश होऊ नये. एखादी परीक्षा तुमच्या यशा अपयशाचे सूत्र ठरू शकत नाही... आज ज्यांना यशस्वी म्हणून तुम्ही बघता त्यांनाही कधी काळी दहावी बारा...
Shri Parameshwar Mandir : सामाजिक – धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाढोण्याचे 716 वर्षाहुन अधिकचे इतिहास कालीन श्री परमेश्वर मंदिर…

Shri Parameshwar Mandir : सामाजिक – धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाढोण्याचे 716 वर्षाहुन अधिकचे इतिहास कालीन श्री परमेश्वर मंदिर…

नांदेड, लेख
हिमायतनगर (वाढोणा/वारणावती) नगरीचे आराध्य दैवत श्री परमेश्वर भगवान मंदिर अंदाजे सातशे 116 वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. (Over 716 years of history growing as a symbol of socio-religious and national unity Shri Parameshwar Mandir) मंदिराचा इतिहास अतिप्राचीण हेमाडपंथी असून, उत्तरेकडे मुख असलेल्या मंदिरातील गाभा-यात शिवशंकर - विष्णुच्या अवातारातील हरीहर रुपातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती आहे. सर्वांग सुंदर, अत्यंत देखणी अद्वितीय अशी श्री परमेश्वराची मुर्ती एकसंघ असलेल्या काळ्या पाषाणात घडवीलेली असुन, परम अधिक इश्वर म्हणजेच परमेश्वर हे देवाधीदेव आहेत. या मुर्तीचे वर्णन किंवा या मुर्तीशी अन्य देवतांच्या मुर्तीशी साम्य असणारे वर्णण आढळुन येत नाही. त्यामुळे हि मुर्ती भारतात एकमेव मुर्ती आहे, असे म्हणता येईल. भक्तांच्या नवसाला पावणारा परमेश्वर म्हणुन...
error: Content is protected !!