Friday, May 15

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Pandharpur Wari : सावधान ! वारीची भक्तीपरंपरा विकृत केली जात आहे !

Pandharpur Wari : सावधान ! वारीची भक्तीपरंपरा विकृत केली जात आहे !

मुंबई, लेख
Beware! The devotional tradition of Wari is being distorted! पंढरपूरची वारी म्हणजे जणू विठ्ठलभक्तांचा चालता कुंभमेळाच ! शेकडो वर्षांची ही वारी परंपरा आध्यात्मिक परंपरेचे प्रतिनिधत्व करते. ही वारी एखाद्याने थोडीदेखील अनुभवली असेल, पाहिली असेल, ती व्यक्ती वारकऱ्यांचा भोळा भाव, साधेपणा, शिस्त पाहून भारावून गेल्याविना रहाणार नाही. या वारीमध्ये कुणी एकमेकांना जात विचारत नाही, प्रांत विचारत नाही, आर्थिक उत्पन्न विचारत नाही; पण सर्व जण एकमेकांशी आपुलकीच्या आणि विठ्ठलभक्तीच्या धाग्याने जोडलेले असतात. भक्तीची ही ताकद आहे; पण गेल्या काही वर्षांपासून ही वारी विकृत करण्याचा प्रयत्न चालू आहे. संविधान समतेच्या नावाखाली देवा-धर्माला (केवळ हिंदु धर्माला) शिव्या देणे, हे आयुष्याचे इतिकर्तव्य मानणारी मंडळी ‍वारीत शिरकाव करू पहात आहे. या अश्रद्ध लोकांच्या दिंडीचे नाव समता दिंडी असले, तरी त्यांचा मूळ हेतु मात...
Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती दिन आणि विस्मृतीतील जनआंदोलन

Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती दिन आणि विस्मृतीतील जनआंदोलन

नांदेड, लेख
17 सप्टेंबर – मराठवाडा मुक्ती दिन, ही केवळ एक तारखेची नोंद नाही, तर ती मराठवाड्यातील जनतेच्या शौर्य, त्याग आणि अस्मितेचा ऐतिहासिक ठसा आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले, पण मराठवाडा भाग मात्र हैदराबादच्या निजामाच्या जुलमी राजवटीखाली अडकलेला होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात सामील झाले आणि मराठवाड्याला खरी स्वातंत्र्याची अनुभूती मिळाली. मराठवाडा मुक्ती संग्राम : जनतेचा लढा - हा लढा फक्त काही नेत्यांनी किंवा संस्थांनी दिलेला नव्हता. हा जनतेचा लढा होता, रजाकारांच्या अत्याचाराच्या विरोधात उभा ठाकलेला हिंदू समाजाचा लढा होता. या लढ्याला ठोस नेतृत्व नव्हते, पण त्यात सामान्य माणसाचा असाधारण सहभाग होता. शेकडो गावांमध्ये भूमिगत चळवळी, सशस्त्र संघर्ष, गुप्त बैठका आणि प्रचार याच्या माध्यमातून जनता संघटित झाली होती. जर ही चळवळ, हे युद्ध...
Sanatan Rashtra Shankhnaad Festival : आध्यात्मिक आणि राष्ट्रीय चेतना जागवणारा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !

Sanatan Rashtra Shankhnaad Festival : आध्यात्मिक आणि राष्ट्रीय चेतना जागवणारा सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव !

लेख, नांदेड, मुंबई
प्रस्तावना : सध्या भारतासह विश्वभरात युद्धज्वर वाढत आहे. जागतिक वातावरण इतके अस्थिर आहे की, तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी कधी पडेल, ते सांगता येत नाही. अशा वेळी सनातन राष्ट्र म्हणून भारताची विजयीपताका सर्वत्र फडकावी, तसेच भारताच्या ऊर्जेचे केंद्र असलेली सनातन शक्ती बळकट व्हावी, यांसाठी गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा भव्य सोहळा पार पडला. या सोहळ्याला भारतासह २३ देशांतील ३० हजारांहून अधिक सनातन धर्मप्रेमी उपस्थित होते. यामध्ये संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ नेते, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, साधक, धर्मप्रेमी, भाविक यांचा समावेश होता. देश-विदेशांतून अडीच लाख जणांनी हा कार्यक्रम ‘लाईव्ह’ पाहिला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्यमहोत्सवी वर्ष या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते....
Mahavitaran ; मुर्दाड लोकप्रतिनिधी आणि अंधारात बुडालेली जनता ; बॉयलर कोंबड्या सारखं जगत आहेत डरकाळ्या फोडणारे फेसबुक वरचे वाघ

Mahavitaran ; मुर्दाड लोकप्रतिनिधी आणि अंधारात बुडालेली जनता ; बॉयलर कोंबड्या सारखं जगत आहेत डरकाळ्या फोडणारे फेसबुक वरचे वाघ

नांदेड, लेख
कॉ.गंगाधर गायकवाड,नांदेड.मो.नं.7709217188 नांदेड शहर गेल्या चार दिवसांपासून अंधारात बुडालेले आहे. वीजपुरवठा तब्बल ६-६ तास बंद राहत आहे, आणि याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानात, जेव्हा पंखे आणि वातानुकूल यंत्रणा बंद पडतात, तेव्हा घराघरांतून हाहाकार उमटतो. पण या सगळ्या गोंधळात आपले लोकप्रतिनिधी कुठे आहेत? त्यांचा आवाज का ऐकू येत नाही? का त्यांना जनतेच्या समस्यांशी काही देणेघेणे नाही? हा प्रश्न जनतेतून छुप्या आणि दबक्या आवाजात ऐकू येत आहे. सोशल मीडियावर डरकाळ्या फोडणारे वाघ मात्र घराच्या समोर असलेल्या नाली वर बसून मोबाईल चार्जिंग कसा करावा हा विचार करताना दिसत आहेत. लाईट बंद, जनता हैराण नांदेडमधील वीजपुरवठ्याची समस्या नवीन नाही, पण गेल्या चार दिवसांपासून तर परिस्थिती असह्य झाली आहे. सकाळी ६ तास, रात्री ६ तास, असे वीजेचे लपंडाव सुरू आहे. विद्यार्थ्य...
Sp Abinash kumar ; मिशन उडान : नांदेडच्या राजकारणाला धडा शिकविणारे एसपी अबीनाश कुमार

Sp Abinash kumar ; मिशन उडान : नांदेडच्या राजकारणाला धडा शिकविणारे एसपी अबीनाश कुमार

नांदेड, लेख
१७३ लाख कोटी रुपये कर्ज असलेल्या भारत देशात महागाईने उचांग गाठला आणि बरोजगारांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतांना नांदेड येथील पोलीस अधीक्षक असलेल्या श्रीमान अबीनाश कुमार यांनी नवा इतिहास घडवीला आणि राजकारण्यांना एक प्रकारे धडाच शिकवीला. २०१८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अबीनाश कुमार यांच्या इच्छाशक्तीची राज्यभर चर्चा होताना दिसते. त्यांनी नांदेड मध्ये जनहितवादी अनेक वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने गुन्हेगारी, अवैध धंदे आणि दादागिरी या त्रिसूत्री कार्यक्रमाचा नायनाट करण्याचा त्यांचा उद्देश पूर्ण होताना दिसतो आहे. नांदेडच्या गल्लीबोळातून गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला हद्दपार करणारे पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी 'मिशन उडान' च्याअगोदर 'मिशन फ्लॅश आऊट' च्या माध्यमातून भल्याभल्याना धूळ चारली. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आणि सामान्य जनतेल...
Water supply through 184 tankers in Marathwada : मराठवाड्यात 184 टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water supply through 184 tankers in Marathwada : मराठवाड्यात 184 टँकरद्वारे पाणीपुरवठा

नांदेड, मुंबई, लेख
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही दुप्पटीने वाढ होत आहे. मराठवाड्यात 184 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तहानलेली गावे मराठवाड्यातच नोंदली गेली आहेत. विभागीय आयुक्तालयाने यावर शिक्कामोर्तबही केले आहे. पाणीटंचाईची भीषण परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत जाणवत आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला असला तरी, टंचाई मात्र कमी झालेली नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 135 टँकरद्वारे तहानलेल्या 93 गावांत व 12 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यात मागच्या आठवड्यापर्यंत 47 टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. तर नांदेड जिल्ह्यात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची नोंद विभागीय आयुक्तालय कार्यालयात आहे. मराठवाड्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे लव...
Right to Service Day : महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा, 28 एप्रिल हा “सेवा हक्क दिन”

Right to Service Day : महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा, 28 एप्रिल हा “सेवा हक्क दिन”

लेख, नांदेड
महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 एप्रिल, 2025 रोजी '28 एप्रिल' हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचा-यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक 28 एप्रिल,2015 रोजी महाराष्ट्र शासनाने विशेष करुन तत्कालीन मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणविस यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील जनतेला  नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क देणारा 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015' अंमलात आणला आहे. या अधिनियमातील कलम 4 अन्वये महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचा-यांवर अशा नियत कालमर्यादेतच जनतेला लोकसेवा देण्याची जबाबदारी दिली आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे त्याचे उत्तरदायित्व निश्चित केले आहे. हा कायदा प्रशासकीय अधिका-यांना कर्तव्य भावनेतून जनतेची सेवा करण्यासाठी प्रेरीत करत आहे. या कायद्याने नव्याने निर्मित केलेल्...
Waves 2025 : ‘वेव्हज 2025’ : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

Waves 2025 : ‘वेव्हज 2025’ : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

नांदेड, लेख
देशातील माध्यम व मनोरंजन (Media & Entertainment) क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या ‘WAVES 2025’ या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे. 1 मे रोजी, प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री. अश्विनी वैष्णव व मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 1 ते 4 मे दरम्यान होणारी ही परिषद भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. महाराष्ट्र – ‘ग्लोबल क्रिएटर इकॉनॉमी’कडे वाटचाल बॉलीवूड, टीव्ही आणि ओटीटी इंडस्ट्री यांचे केंद्रस्थान असलेली मुंबई भारताच्या मनोरंजन क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता याच मुंब...
World Fever Day ; ” जागतिक हिवताप दिन ” दि.२५ एप्रिल

World Fever Day ; ” जागतिक हिवताप दिन ” दि.२५ एप्रिल

लेख, नांदेड
" जागतिक हिवताप दिन " हा दिनांक २५ एप्रिलला दर वर्षी साजरा करण्यात येतो. हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरीकांपर्यंत माहिती पोचविण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी दि.२५.०४.२०२५ रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्याचे योजिले आहे. या वर्षाचे घोषवाक्य " Malaria Ends With Us: Reinvest, Reimagine, Reignite " आहे. त्याचे मराठी भाषांतर " चला हिवतापाला संपवू या : पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा " असे आहे. भारत सरकारच्या धेय्य धोरणानुसार हिवताप राष्ट्रीय हिवताप कार्यक्रमाचे दुरिकरण सन २०२७ अखेरपर्यत करायचे असल्याने त्याबाबतचे ध्येय व नियोजन करावे. या करिता सदर मोहिमेच्या अधिक प्रभावी...
…therefore, opposition to Shaktipeeth Highway …म्हणून शक्तीपीठ महामार्गाला विरोध

…therefore, opposition to Shaktipeeth Highway …म्हणून शक्तीपीठ महामार्गाला विरोध

नांदेड, लेख
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व बीड या सहा जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग बनविण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी महाराष्ट्रातील 28 हजार एकर जमीन या महामार्गासाठी बाधीत होणार आहे. हा महामार्ग बेकायदेशीर पद्धतीने केला जात असल्याचे मत कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित महामार्ग पवनार ते पत्रादेवी (नागपुर-गोवा) असल्याचे घोषित केले आहे. सदर महामार्गाची प्रस्तावना पाहिली असता माहूर, कोल्हापूर व पवनार येथील असलेल्या तिन्ही देवींच्या मंदीरांना तसेच इतर धार्मिकस्थळांना जोडणारा रस्ता असे सांगण्यात आले आहे. तीन शक्तीपीठे प्रस्तावित महामार्गाने जोडत असल्यामुळे त्यास शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु भूसंपादन, वाजवी नुकसानभरपाई हक्क व पारदर्शकता, पुनर्वसन आणि पूर्नस्थापना (महाराष्ट्र सुधारणा) कायदा 2018 कलम 2(1) मधील ...
error: Content is protected !!