Saturday, May 16

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Latur ; लातूर जिल्ह्यातील बालसाहित्य

लेख, लातूर
लातूर जिल्ह्यातील बालसाहित्यिकांची ओळख करुन द्यावयाची झाली तर या जिल्ह्यातील बाललेखकांची, कवींची लेखनी सकस आणि समृद्धच आहे. मराठी, कानडी, तेलगू आणि दखनी भाषेचा वावर या जिल्ह्यात आहे. तीन राज्याच्या सीमा असल्याने या परिसरातील बोली भाषेचा गोडवा बालसाहित्य लेखनात उमटलेला दिसतो. दिल्लीच्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त बालासाहित्यावर प्रकाश टाकणारा हा लेख. “मुलांसाठी अक्षरांचे सेतू बांधणं खूपच कठीण असते.” साहित्याच्या प्रांगणात विविध वाङ्मयप्रकार हाताळणाऱ्या लेखकांची संख्या खूप असली तरी बालसाहित्य लेखन करणाऱ्या लेखकांची संख्या खूप कमी आहे. बालकांचे बालविश्व घडविण्यासाठींचे लेखन करणे तितके सोपे नसते. मुलांसाठी अक्षरांचे सेतू बांधणं खूपच कठीण काम असते. लेखक वयाने मोठा असला तरी बालसाहित्य लेखन करतांना बालकांचे बालमन होऊनच पालकांच्या बालमनांशी नाते जोडण्याचा प्रयत्न मात्र नक्...
freedom struggle ; मराठी संपादकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

freedom struggle ; मराठी संपादकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

लेख, नांदेड
"सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?" असा अग्रलेख लिहिणारे लोकमान्य टिळक नि इंग्रजांना प्रखर लढा देणारे संपादक पंडित बाबुराव पराडकर नि माधवराव सप्रे यांचा वारसा पुढे नेणारे निर्भिड संपादक आजही कधी नव्हे तेवढे हवे आहेत. जेव्हा जनसामांन्यावर अन्याय, महागाई, रोगराई व रोजगार नि शेतकरी - दलितांचे व महिलांचे जीवन असह्य होते तेव्हा तेजस्वी पत्रकारिता पुढे येते. लोकशाही व्यवस्था पारतंत्र्यात असताना जे लोकमान्य टिळक, पराडकर नि सप्रे, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिनकर जवळकर, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील, दिनबंधूकार कृष्णराव भालेकर यांना जमले ते आज लोकशाही व्यवस्था असताना का जमू नये याचा विचार आजच्या संपादक नि पत्रकारितेने करायला हवा. नाही का ? पत्रकारिता हे क्षेत्र जनजागरणाचं नि लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आहे, हे सर्वज्ञात आहे. लोकशाही व्यवस्थेतील पत्रकारितेला गुणवत्ता नि अर्थवत्तेचे नवे धुमारे फुटता...
Myamrathi ; बोलीभाषांनी समृद्ध झालेली मायमराठी

Myamrathi ; बोलीभाषांनी समृद्ध झालेली मायमराठी

लेख, नांदेड
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एक संस्कृती आहे.तिच्या मातीत असंख्य उपभाषांचे,बोलींचे रोप बहरलेले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोलीभाषांचे वैविध्य आढळते. जशी गंगा अनेक उपनद्यांना सामावून घेत समुद्राला जाऊन मिळते, तशीच मराठी भाषा विविध बोलीभाषांना आपल्या प्रवाहात सामावून घेत समृद्ध झाली आहे.या बोली भाषेतील विविधतेमुळे मराठी भाषेची ताकद वाढली असून तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे. बोलीभाषांचे वैविध्य आणि त्यांचे योगदान महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी, मराठवाडी, झाडीबोली, खानदेशी, नागपुरी याशिवाय गोंडी, बंजारा, कोलामी या बोलीभाषांनी मराठी भाषेला बळ दिले आहे. म्हणतात, "दर बारा कोसांवर भाषा बदलते," हे महाराष्ट्राच्या भाषिक वैशिष्ट्यांवर अगदी तंतोतंत लागू होते. या बोलीभाषांमधील साहित्य, लोकसंस्कृती, गाणी, नाटकं, प्रवचनं यांनी ...
India Marathi Literary ; 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशनार्थ बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा

India Marathi Literary ; 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशनार्थ बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा

लेख, नांदेड
भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या माध्यमातूनच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित झाले आहे. भाषा कुठून येते ? आपण ' मातृभाषा ' असा शब्दप्रयोग करतो तेव्हा आईची जी भाषा ती मुलाची भाषा असा अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो काय ? लहान मुल त्याच्या परिसरातील भाषा आत्मसात करते.ते वाढत जाते , तसा त्याच्या परिसराचा विस्तार होतो आणि त्याचा त्याच्या भाषेवर परिणाम होतो. आमच्या छत्रपती संभाजीनगरला ( औरंगाबाद ) राहणारे लोकं घराबाहेर पडले की अगदी सहज हिंदी बोलतात.आपण ज्या विक्रेत्याकडून भाजी घेत आहोत , तो ग्रामीण भागातून आलेला आपल्यासारखाच मराठी माणूस आहे , याचा जणू विसरच पडतो आणि ' मेथी क्या भाव है ? ' असा प्रश्न हाती भाजीची जुडी घेत सह...
Sahitya Sanmelan ; साहित्य संमेलनाने जगविली मराठी भाषा संस्कृती

Sahitya Sanmelan ; साहित्य संमेलनाने जगविली मराठी भाषा संस्कृती

लेख, नांदेड
मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. या लिपीबद्ध संसाधनांमुळे भाषेच्या इतिहासाचा नेमका शोध घेता आला. या तुलनेत साहित्य संमेलनाचा इतिहास हा केवळ दीडशे वर्ष जुना आहे. ब्रिटिशांच्या आगमनानंतर आपल्याकडे लेखक-कवी ही व्यक्तिमत्वे स्वतंत्रपणे अस्तित्वात आली. समूहापेक्षा आपण निराळे आहोत, आणि वेगळा विचार करत आहोत, ही जाणीव या व्यक्तींकडे होती. (मध्ययुगात ही जाणीव असली तरी लेखक-कवी व्यापक लोकसमूहाचा भाग होते.) साहित्य संमेलनाचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रंथ व्यवहाराशी संबंधित काही मंडळी पुण्यात एकत्र आली आणि १८७८ मध्ये त्यांनी पहिले ग्रंथकार संमेलन घडवून आणले.  साधारणतः तेव्हापासून साहित्य संमेलनांना सुरुवात झाली असे म्हणता येते.  साहित...
The Storyteller : द स्टोरीटेलर: कला आणि बाजार यांच्यातील संघर्ष

The Storyteller : द स्टोरीटेलर: कला आणि बाजार यांच्यातील संघर्ष

लेख, नांदेड, मनोरंजन, मुंबई
सत्यजित राय यांच्या लघुकथेवर आधारित "गल्पो बोलिये तरिणी खुरो," आनंद महादेवन यांचा चित्रपट द स्टोरीटेलर (2025) (The Storyteller: The Conflict Between Art and Market) हा खरी मेहनत आणि भांडवलदारीमधील संघर्ष याभोवती फिरतो. या चित्रपटात दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्तिमत्त्वांची कथा आहे: तारिणी बंद्योपाध्याय (परेश रावल) – एक वृद्ध बंगाली कथाकथनकार, ज्याच्या विचारांवर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे, आणि रतन गरोडिया (अदिल हुसेन) – एक श्रीमंत गुजराती व्यापारी, जो अनिद्रेमुळे अनेक वर्षांपासून झोपलेला नाही. त्यांच्या परस्परविरोधी जगांनी हे स्पष्ट केले आहे की, नफा मिळविण्याच्या हव्यासापोटी चालणाऱ्या व्यवस्थेत सर्जनशीलतेचा कसा शोषण केला जातो. हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही, तर तो प्रश्न विचारतो – कथा कोणाची असते? श्रेय कोणाला मिळते? आणि सर्जक आपल्या सृजनशीलतेच्या शोषणाविरुद्ध कसा लढतो? ‘द स्टोरीटे...
Marathi Sahitya Sammelan ; आठवणीतले अ.भा. मराठी साहित्य संमेलन नांदेड -१९८५

Marathi Sahitya Sammelan ; आठवणीतले अ.भा. मराठी साहित्य संमेलन नांदेड -१९८५

नांदेड, लेख
नांदेड येथे १९८५ साली ५९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले.या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विख्यात कथालेखक शंकर पाटील हे होते.नांदेड येथील स्टेडियम परिसरात तीन दिवस हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.या संमेलनाच्या आयोजनाची धूरा पद्मश्री श्यामराव कदम यांच्या कडे होती. देशाचे केंद्रीय मंत्री स्व.शंकरराव चव्हाण हे आश्रयदाते होते.नांदेडचे हे साहित्य संमेलन अविस्मरणीय ठरले. उत्तम गुणवतेचे कार्यक्रम आणि खास मराठवाडी पध्दतीचे आदारातिथ्य व जेवण.यशवंत महाविद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात भोजन व्यवस्था केलेली होती.साहित्य संमेलनासाठी पुण्या - मुंबई वरून आलेल्या साहित्यिक पाहुण्यांनी खास नंदिग्रामी व्यंजनांची तोंड भरून तारीफ केली होती.दही,ठेसा आणि व-हाडी ज्वारीची भाकरी रूचीपालट करून गेली. मला आठवते.मी संयोजन समितीत होतो.तेव्हा दूरदर्शन सर्वदूर पोचले नव्हते.नांदेडवरून मुंबईसाठी ...
Marathi Language : मराठी भाषा : अभिजाततेचा सन्मान, जागतिक विस्तार

Marathi Language : मराठी भाषा : अभिजाततेचा सन्मान, जागतिक विस्तार

लेख, नांदेड
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, ही महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषिकांसाठी (Marathi Language) अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली पासून गल्लीपर्यंत एक मंतरलेले वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे. मराठी भाषा तिचा विस्तार (Honor of Elegance, Global Expansion) घराघरातील मराठी मराठीच्या अन्य भाषिक भगिनी मराठीचा विस्तार सात समुद्रापलिकडे गेलेली मराठी अशा अनेक विषयांवर चर्चा रंगत आहे ऊर भरून यावा असे वातावरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा ऐतिहासिक वारसा, तिची प्राचीनता, शासनाच्या योजना आणि जागतिक स्तरावरील आपल्या माय मराठीची नोंद या सर्व घटनाक्रमाचा उहापोह करणे औचित्यपूर्ण आहे. मराठी भाषेचे प्राचीन संदर्भ मराठी ही इंडो-आर्यन भाषाकुटुंबातील महत्त्वाची भाषा आहे. तिचा उगम संस्कृत भाषे...
Guru Ravidas ; गुरु रविदास जयंतीत वैचारिक प्रबोधन व्हावे..!

Guru Ravidas ; गुरु रविदास जयंतीत वैचारिक प्रबोधन व्हावे..!

नांदेड, लेख
तिथीनुसार १२ फेब्रुवारी आणि इंग्रजी तारखेनुसार १५ फेब्रुवारी रोजी देश विदेशात गुरु रविदास जयंती साजरी होत असून त्या संबंधाने हा वैचारिक लेख..! सामाजिक क्रांतीचे अग्रदूत गुरु रविदास यांची जयंती सध्या सर्वत्र साजरी होऊ लागली आहे. यात चर्मकार समाज प्रामुख्याने भाग घेत आहे. ही आनंदाची बाब आहे, पण हा आनंद पूर्ण नाही तर अपूर्ण आनंद आहे. जेंव्हा संपूर्ण बहुजन समाज गुरु रविदासांची जयंती मनापासून साजरी करु लागेल तेंव्हाच हा आनंद पूर्ण आनंद होऊ शकेल. कारण गुरु रविदासांनी केवळ आपल्याच एका जातीसाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी काम केले आहे. कोणीच साजरी करीत नसेल तर चर्मकार समाज आपले आद्य कर्तव्य म्हणून गुरु रविदासांची जयंती साजरी करु लागला. ज्या जातीत आपला जन्म झाला त्या जातीतील महामानवांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करणे यात कांहीही चुकीचे नाही. सुरुवातीस महार म्हणजे बौद्ध समाज परमपू...
Agristack scheme : अॅग्रीस्टॅक योजना आणि नांदेड जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी !

Agristack scheme : अॅग्रीस्टॅक योजना आणि नांदेड जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी !

नांदेड, लेख
शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी शासनाने ‘अॅग्रीस्टॅक’ (AgriStack) ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना एक शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) दिला जात आहे. हा क्रमांक मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या माहितीवर आधारीत विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यात ‘अॅग्रीस्टॅक’ची प्रभावी अंमलबजावणी नांदेड जिल्ह्यात कृषीक्षेत्र विस्तृत आहे आणि येथे लाखो शेतकरी विविध पिके घेतात. शासनाने नांदेडमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ची अंमलबजावणी प्रबळपणे सुरू केली आहे. जिल्ह्यातील सीएससी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी नोंदणी होत आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट अनुदाने, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांचा जलद लाभ मिळण्यास मदत होणार आहे. शेतकरी ओळखपत्र क्रमांकाचे मह...
error: Content is protected !!