Uddhav Thackeray : मोर्चा होऊ नये म्हणून शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला – उद्धव ठाकरें
Government cancelled Hindi compulsory GR to prevent march - Uddhav Thackeray मुंबई| दिनांक ०५ जुलै रोजी हिंदी सक्तीच्या विरोधात मोराचा आयोजित करण्यात आल्याने शासनाने हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत माहिती दिली आहे.
यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने घेतलेल्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देत मराठी माणसाचा मोर्चा होऊ नये म्हणून शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला असल्याचे उद्धव ठाकरें यांनी म्हंटले आहे. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. परंतु आपल्या देशात भाषावार प्रांतरचना झाली. प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे, त्या प्रांताच्या अनुसार तिथल्या मातृभाषेला सर्वोच्च मान दिलाच पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात मरा...









