Friday, May 15

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

The people’s election! ; लोकांनी आपल्या हाती घेतलेली लोकनिवडणूक – NNL

The people’s election! ; लोकांनी आपल्या हाती घेतलेली लोकनिवडणूक – NNL

लेख, राजकीय
लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल जाहीर झाला आणि ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली होती, अशी चर्चा रंगू लागली. भाजप आणि मित्रपक्षांच्या पराभवाची कारणमीमांसा होऊ लागली; मात्र निवडणूक निकालापूर्वीच कोण येणार आणि कुणाला घरचा रस्ता दाखवला जाणार यांचे आडाखे मोठ्या प्रमाणावर बांधले जाऊ लागले होते. मिडियाच्या एक्झिट पोलचे सगळे अंदाज फोल ठरले असले तरी पारावरच्या, चावडीवरच्या आणि चौका चौकातल्या सर्वसामान्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की लोकांनी आपले स्वतःचे एक्झिट पोल तयार केले होते. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात पूर्णांशाने लोकशाही नांदावी, तिची पाळेमुळे खोलवर रुजावीत अशी लोकशाहीप्रेमीची धारणा असते. लोकशाहीची व्याख्याही आपण तशा प्रकारचीच करतो. एकमेकांना सांगत असतो. मात्र, गेल्या काही दशकांत लोकशाहीप्रणीत आणि लोकशाहीप्रधान निवडणूक ही लोकांची राहिलेली नाही. ही खूपच गंभीर बाब आहे. येनकेन प्रकारे...
NSUI’s awareness ; महिला व मुलींच्या संरक्षणाच्या मुदद्यावर NSUI चे शाळा महाविद्यालयात जागृती आंदोलन: नाना पटोले – NNL

NSUI’s awareness ; महिला व मुलींच्या संरक्षणाच्या मुदद्यावर NSUI चे शाळा महाविद्यालयात जागृती आंदोलन: नाना पटोले – NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| बदलापूरच्या घटनेने राज्याची मान शरमेने खाली गेली असून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, व आंबेडकर यांच्या राज्यात महिला तसेच शाळा, कॉलेजातील मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. भाजपा महायुती सरकार महिला व मुलींचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या विरोधात काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआय राज्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये आंदोलन करणार आहेत, तसेच सह्यांची मोहिम राबवणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा युती सरकार महिला व मुलींना संरक्षण देऊ शकत नाही. मा. उच्च न्यायालयानेही या सरकारला फटकारले आहे तरीही त्यांना जाग येत नाही. महिलांचे संरक्षण तर ते करु शकत नाहीतच उलट मुलींनी ७ वाजल्यानंतर बाहेर पडू नये असे सल्ले देत आहेत. संवेदना न...
मविआचे सरकार आल्यानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करू: नाना पटोले -NNL

मविआचे सरकार आल्यानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करू: नाना पटोले -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| राज्यातील हजारो सरपंचांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु केले असून त्यांचा मागण्या रास्त आहेत. भाजपा महायुती सरकार त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचे काम करु आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करु, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. आझाद मैदानातील अखिल भारतीय सरपंच परिषद, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक यांच्या आंदोलनास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट दिली. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संगणक परिचालकांच्या प्रश्नी भाजपा युती सरकारची भू...
Prahar organization will take to the streets and protest : हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याना मुख्यालई राहणे बंधनकारक करा -NNL

Prahar organization will take to the streets and protest : हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याना मुख्यालई राहणे बंधनकारक करा -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| तालुक्यातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी हे मुख्यालयी न राहता सोयीच्या ठिकाणाहुन ये जा करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावं लागत आहे. हि बाब हेरून प्रहार संघटनेच्या वतीने आज तहसीलदार पल्लवी टेमकर याना निवेदन देऊन मुख्यालयी ना राहणार्यावर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या निवेदन म्हंटले आहे की, हिमायतनगर तालुक्यातील ग्रामिण भागातील शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग, निराधार, विधवा, अनाथ व शैक्षणिक विद्यार्थी यांचे अनेक कामे हे ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी हे त्यांना नेमुण दिलेल्या ठिकाणी राहात नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. व त...
village-to-village Tutari campaign : किनवट तालुक्यात शरदचंद्र गटाकडून गाव तिथे तूतारी अभियानाला सुरुवात -NNL

village-to-village Tutari campaign : किनवट तालुक्यात शरदचंद्र गटाकडून गाव तिथे तूतारी अभियानाला सुरुवात -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, पक्षाच्या गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी घरोघरी पोहचण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चालु असलेल्या अभियानाला किनवट तालुक्यातील ईस्लापुर जिल्हा परिषद सर्कलमधिल,भिसी, व पांगरी,या गावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे पदाधिकारी यांनी तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी गावातील लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आले असता या वेळी गावातील, पुरूष मंडळी,नवयुवकांनी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नावाने घोषणाबाजी करून यावेळी अबकी बार प्रदीप नाईक आमदार म्हणत विशेष पुढाकार घेतला होता. नवयुवकांनी यावेळी प्रदीप नाईक यांना आमदार बनविल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा निर्धार केला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ईस्लापुर शिवणी सर्कलच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ पंचफुलाबाई शिवराम जाधव, डॉ भगव...
The order of the District Collector : लिंबायतच्या महिला सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या आदेशाने जीवनदान -NNL

The order of the District Collector : लिंबायतच्या महिला सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या आदेशाने जीवनदान -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| मौजे लिबायत येथिल महिला सरपंच उज्वला मनोहरसिंग चुंगडे यांच्या विरुद्ध ५ विरूद्ध २ ने अविश्वास ठराव ११ मार्च रोजी पारीत करण्यात आला होता. मात्र या ठरावाच्या विरुद्ध चुंगडे यांनी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते दोन्ही बाजूतील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी ११ मार्च २४ रोजी च्या विशेष सभे मधील कामकाज व मंजूर ठराव वैधरित्या पारित न झाल्यामुळे तो रद्द ठरविण्यात येते आहे. असा आदेश दिनांक २१ ऑगस्ट रोजी काढल्याने लिंबायतच्या महिला सरपंचाला जीवनदान मिळाले आहे. लिबायत नेर ही ७ सदस्यीय गट ग्रामपंचायत आहे.येथील महिला सरपंच यांच्या विरोधात अनेक कारणे देत दिनांक ४ मार्च २४ रोजी ५ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता,त्यावर लिबायत येथिल ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक ११ मार्च रोजी तहसीलद...
Yuva Sarpanch Kailas Patil Pund : युवा सरपंच कैलास पाटील पुंड यांची जरांगे पाटलांकडे मागणी -NNL

Yuva Sarpanch Kailas Patil Pund : युवा सरपंच कैलास पाटील पुंड यांची जरांगे पाटलांकडे मागणी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| येथील नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विकासाभिमुख युवा सरपंच अशी ओळख असलेल्या व मराठा आरक्षण लढ्यातील आश्‍वासक चेहरा म्हणून सक्रिय असलेले युवा कार्येकर्ते तथा पुंड पिंपळगाव चे बिनविरोध सरपंच कैलास पाटील पुंड यांनी मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अंतरवाली सराटी येथे प्रत्यक्ष भेट घेत आपला सामाजिक कार्य अहवाल सादर केला आणि विधानसभा नांदेड दक्षिण -८७ मतदार निवडणूक लढवण्याची ईच्छा व्यक्त केली अशी माहीती सरपंच कैलास पुंड यांनी दिली आहे. आपल्या विद्यार्थी दशेपासूनच विविध सामाजि चळवळीतील सक्रीय आणि लढवय्या कार्यकर्ता म्हणून कैलास पुंड ओळखले जातात त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींसह स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठा अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच मराठा आरक्षण चळवळीसाठी स्वतःला झोकून देत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हयात महत्वपूर्ण ...
Basa Pujan of Hingoli : कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर, हिंगोलीचे बासापूजन मोठ्या थाटात संपन्न -NNL

Basa Pujan of Hingoli : कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर, हिंगोलीचे बासापूजन मोठ्या थाटात संपन्न -NNL

हिंगोली, राजकीय
हिंगोली| शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर व युवासेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम व मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या शुभहस्ते कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव, हनुमान नगर,हिंगोलीचे बासापूजन मोठ्या थाटात संपन्न झाले. यावेळी लक्ष्मण पाटील श्याम भाऊ कदम, विवेक जोजारे सर, सूर्यकांत राजुलवार सर, शेळके सर, चव्हाण सर,शंकर पुरी सर,दत्ता माने, पुरी सर, मार्कड सर, कऱ्हाळे सर, संतोष गोरे,कपिल शेवाळे, अनिल नायक,अमोल खिल्लारी,अमोल जाधव,प्रताप चौदांते ,कैलास मनबोलकर,अजय कान्हेड,गोपाळ बांगर, इंजि. संदीप बांगर,भैया ठाकूर,विजय अवचार,शंकर सावळे,शिवा पवार,अमित पवार,वसीम भाई,शुभम कदम,आकाश कदम,प्रशांत भुरुंगे,विरू चव्हाण,रवी धुळे,हरीश साहू,नितीन घोडके,नितेश कवाने,विशाल देशमुख कुलस्वामिनी नवदुर्गा महोत्सव समितीचे पदाधिकारी, हनुमान नगरचे रहिवासी, शिवसैनिक, ...
Nana Patole : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा: नाना पटोले -NNL

Nana Patole : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा: नाना पटोले -NNL

राजकीय
मुंबई| सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे. पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार हे कमीशनखोर आहे, हे सरकार सिमेंट, वाळू, विटा, लोखंड यातही कमीशन खाते...
Mp vasantrao chavan ; खा. वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार -NNL

Mp vasantrao chavan ; खा. वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज 27 ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत श्रध्दांजली अर्पण केली. नायगाव येथील चव्हाण कुटुंबीयांच्या स्मशानभूमीमध्ये या भूमीपूत्राला संपूर्ण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेतील आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली. यावेळी विधानसभेचे विरोधी प...
error: Content is protected !!