Tuesday, June 30

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य -NNL

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य -NNL

Blog
मुंबई| केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC) २०२४ ही दि. १६ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ३६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी एकूण १४ हजार ५०९ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. पहिल्या सत्राची वेळ सकाळी ९.३० ते ११.३० (पेपर - ०१) आणि दुसऱ्या सत्राची वेळ दुपारी २.३० ते ४.३० (पेपर - ०२) अशी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने यापूर्वीच निर्गमित केलेल्या ३० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या लेखी सूचनेनुसार परीक्षार्थींनी आपल्या नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास (३० मिनट) अगोदर हजर राहणे अनिवार्य केले आहे. मुंबई शहर ज...
नांदेड ते नाळेश्वर सिमेंट रस्त्यावर दीड वर्षातच पडल्या भेगा -NNL

नांदेड ते नाळेश्वर सिमेंट रस्त्यावर दीड वर्षातच पडल्या भेगा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, आनंदा बोकारे| नांदेड ते नाळेश्वर हा रस्ता एक ते दीड वर्षापूर्वी तयार करण्यात आला असून निकृष्ट कामामुळे सिमेंट रस्त्याच्या मध्यभागी भेगा पडल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. नांदेड ते नाळेश्वर या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे जिल्हाभर चांगलेच गाजले होते. एक ते दीड वर्षापूर्वी सी.सी.रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्यावर मिल गेट ते मल्हार चौक, हसापूर व वाघी ते नाळेश्वर रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच मल्हार चौक ते वाघी आरटीओ पासिंग कार्यालयापासून नाळेश्वर पर्यंत मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर बर्‍याच प्रमाणात अपघात घडले आहे. नांदेड ते लिंबगाव रस्ता काम चालू असल्यामुळे या मार्गावरील बरीचशी वाहतूक नांदेड ते जैतापूर रस्त्यावर पूर्णा या मार्गाकडे जात असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वर्दळ निर्माण झाली असून व अपघाताचे प्रमाणही वाढले...
हिवताप टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन -NNL

हिवताप टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन -NNL

नांदेड
नांदेड। पावसाळ्याचे आगमन होत असताना हिवताप डेंगू मेंदू जोरासारख्या कीटकजन्य आजाराची साथ वाढण्याचा धोका असतो. सर्व आजार डासांपासून होत असतात. त्यामुळे हिवताप प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाडण्याच्या आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी जून महिन्यात हिवता प्रतिरोध महिना राबविण्यात येतो संपूर्ण पावसाळ्यात कीटकजन्य आजाराबाबत प्रतिबंधक अभियानाची अंमलबजावणी केली जाते नागरिकांनी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास घरामध्ये जास्त ओलावा राहणार नाही त्यासाठी दर आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाडणे आवश्यक आहे यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते डासानची संख्या कमी झाल्यास हिवताप डेंगू मेंदू जर सारख्या कीटकजन्य आजारांची संख्या कमी होते त्यामुळे या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आव...
महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा वाई येथे कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अभिनव उपक्रम -NNL

महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा वाई येथे कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अभिनव उपक्रम -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यांतील वाई बाजार येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा अभिनव कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा संभाजीनगर येथून नांदेड जिल्ह्यातील वाई येथील सहारा फॅशन हॉल येथे दि १३ जून रोजी संवाद यात्रा कार्यक्रम पार पडला. यात्रेतील वरिष्ठ अधिकारी सहाय्यक सर व्यवस्थापक सुहास कुमार संगमकर, पणमुख वानखेडे, क्षत्रिय व्यवस्थापक नांदेड संतोष प्रभावती,माहूर तहसीलचे नायब तहसीलदार राजकुमार राठोड वाई बाजार चे माजी सरपंच उस्मान खान, काँ. शंकर सिडाम, पत्रकार साजिद खान, राजकुमार पडलवार, पंडित धुप्पे, कैलास बेहेरे , माहूर बँकेचे शाखाधिकारी दीपंकर पाटील, वाई शाखेचे रोशन पेंदोर, उमरी शाखेचे संदीप सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्याने उपस्थित शेतकरी महिला, बचत गट, व्यापारी,किसान केडीट कार्ड, बचतगट, अर्थिक वित्तीय साक्षरता व ड...
आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त खतांचासाठा मंजूर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश -NNL

आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त खतांचासाठा मंजूर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश -NNL

नांदेड
मुंबई| राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस पडला असून शेतकऱ्यांनी पेरणीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात बी-बियाणे आणि खतांच्या मागणीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांना युरिया आणि डीएपी खतांचा पुरेसा पुरवठा केला जात असला तरी येणाऱ्या काळात खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्य शासनातर्फे खतांचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्यात येतो. पणन महासंघासह इतर संस्थांनी आवश्यकतेनुसार व प्राप्त उद्दिष्टानुसार आपल्या वाट्याच्या खतसाठ्याची संपूर्ण उचल करावी. त्यानंतरही आवश्यकता असल्यास कृषी विभागाने पणन महासंघास अतिरिक्त कोटा मंजूर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज पणन महासंघाच्या विविध मागण्यां संदर्भात बैठक घेतली. या बैठकीस कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित ...
विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट – नाना पटोले -NNL

विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट – नाना पटोले -NNL

Blog
मुंबई| लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हाच उद्देश आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अधक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर संघटनात्मक बांधणी केली होती, त्याचा फायदा काँग्रेस पक्षाबरोबरच महाविकास आघाडीला झाला. आताही विधान सभेसाठी २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकत्रित लढायचे अस...
हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा परिसरात शेतकऱ्यांनी केली कापूस लागवडीला सुरुवात -NNL

हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा परिसरात शेतकऱ्यांनी केली कापूस लागवडीला सुरुवात -NNL

नांदेड
सोनारी फाटा, शेख खय्युम। हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा व पोटा परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या मृग नक्षत्रातील पहिल्याच दमदार पावसाने बळीराजाची प्रतीक्षा संपली असून, या पावसानंतर शेतात रेघाटया ओढून कापूस लागवडीला सुरुवात केली आहे. मात्र कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची बी-बियाणे, खत विक्रीत होणारी लूट थोडी वेदनादायक ठरत आहे. हिमायतनगर तालुक्यातील काही भागात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे सोनारी फाटा व पोटा परिसरात नाल्यांना व शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांनी १२ जून रोजी बुधवारी कापूस लागवड व पेरणीला प्रारंभ केला आहे. पावसासाठी वातावरण अनुकूल झाल्याचे भासत असल्याने मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतकरी कापूस लागवड कामासाठी सज्ज झाला असून, सोनारी फाटा व पोटा परिसरामध्ये कापूस लागवडीला प्रारंभ झाले असल्याचे चित्र दिसत आहे. ११ जून रोजी सायंकाळी झालेल्या दम...
साहिल : एका शाळाबाह्य मुलाचा ‘निष्पाप बळी’ NNL

साहिल : एका शाळाबाह्य मुलाचा ‘निष्पाप बळी’ NNL

लेख, नांदेड
नवे शैक्षणिक वर्ष सुरुच होते आहे. कोणत्याही शैक्षणिक वर्षात कुठेही एकही शाळाबाह्य विद्यार्थी असू नये, असा राज्य सरकारचा दंडक आहे. स्तंभलेखक व शिक्षक मारोती कदम यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना शाळेत प्रवेश दिला. परंतु त्यापैकी एका मुलाचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांनी या वास्तव घटनेचे लेखस्वरुप चित्रण केले. वाशीम जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबातील एका मुलाच्या आकस्मिक निधनामुळे त्या कुटुंबावर आलेला काळाचा घाला म्हणजे मारोती कदम यांचा लेख म्हणजे 'निष्पाप बळी' होय. कदम हे अत्यंत संवेदनशील मनाचे लेखक आहेत. आजूबाजूला घडणाऱ्या ज्या अशा घटना त्या कदमांच्या नजरेतून सुटू शकत नाहीत त्या कागदावर शब्दबद्ध होणारच! ते जसे संवेदनशील लेखक आहेत तसे ते विद्यार्थ्यांच्या भावविश्वात रमणारे बालमूलक शिक्षक आहेत. त्यांच्या शाळेत म्हणजे पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा येथील...
सरसम करंजी जवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या युवकांचा मृत्यू.; अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल – NNL

सरसम करंजी जवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या युवकांचा मृत्यू.; अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या सरसम बु. ते करंजी अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट पुलाच्या सुरक्षा भिंतीच्या मध्यभागी रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत जखमी झालेला युवक बुधवारी आढळून आला होता. त्या जखमीं युवकावर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारांसाठी नांदेडला रेफर करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना युवकाची प्राणज्योत सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मालवली. अशिष साईनाथ जाधव वय २८ वर्ष असे मयत युवकाचे नावं आहे. युवकांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी गुरुवारी सकाळीच हिमायतनगर पोलीस ठाणे गाठून, युवकाला जीवानिशी मारणाऱ्यांचा शोध लावून न्याय देण्याच्या मागणी केली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ते भोकर...
खरीपहंगाम २०२३-२४ सोयाबीन कापूस, तुर पिकाच्या नुकसानीची विमा संरक्षित रक्कम देण्यात यावी -NNL

खरीपहंगाम २०२३-२४ सोयाबीन कापूस, तुर पिकाच्या नुकसानीची विमा संरक्षित रक्कम देण्यात यावी -NNL

नांदेड
नांदेड/मुंबई, अनिल मादसवार। खरीप हंगाम सन 2023/24 मधिल नुकासनग्रस्त शेतकरी बंधवाना विमा संक्रमित रक्कम तात्काळ देन्यात यावी अशी मागणी आज मंत्रीकृषि मा. ना. श्री धनंजय मुड़े यांची मुंबई येथे भेट घेउन आ. माधवराव पाटिल जवळगावकर यानी निवेदन देऊन केली आहे. मंत्री मोहोदय यांनी दखल घेऊन नांदेड जिल्हाधिकारी याना भ्रमणध्वनीद्वारा संपर्क करुण हा विषय 18 जून रोजी विमा कंपनी सोबत होनार्या बैठकित घेनार असल्याचे सांगुन माहिती पाठवा आश्या सूचना केल्या. उपोषणला बसलेल्या शेतकरी बंधवाना आश्वासन देउन उपोषण सोडवन्यासंबधी विनती करण्यास सांगीतले आहे. यामुळे विमा संरक्षण रक्कम मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. खरीप हंगाम २०२३-२४ सोयाबीन कापूस, तुर पिकाचे नुकसान झाल्यामुळे विमा संरक्षित रक्कम न मिळाल्यामुळे मतदार संघातील शेतकरी बांधव उपोषणास बसले आहेत. उपोषणकर्ते हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील असल्याची दखल ...
error: Content is protected !!