Preserve Social Culture ; पारंपारिक बंजारा पेहराव परिधान करुन विवाह थाटत सामाजिक संस्कृति जपण्याचा माहूरातील जोडप्याचा प्रयत्न

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आजच्या घडिला विवाह सोहळ्यात नववधू /वर लग्ना करीता हजारो रुपयांचे खर्च करत तामझाम व विविध आकर्षक कापडांना पसंती देतात मात्र माहूर शहरातील बंजारा समाजातील युवक वर आशिष राठोड (मेघावत) व तालूक्यातीलच बामनगुडा तांडा येथील वधु प्रगती पवार (नुंळसावत) या नव जोडप्यांनी दि.१५ मे रोजी पार पडलेला आपल्या विवाह सोहळ्यात अभिनव पध्दतित पेहराव परिधान करत त्या कापडास बगल देत आपल्या संस्कृतित वापरात येणारी आणि लूप्त होत असलेल्या बंजारा पेहरावाचे कापड परिधान करुन समाज जागृती चा संदेश दिला .


किनवट/ माहूर तालूक्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तवास आहेत,व समाज संस्कृति आजही ठिकून आहे,मात्र आजच्या पिढिचे काही नवयुवक विवाह प्रसंगी परीधान करीत असलेले ‘फेटीया काचळी घुगरी टोपली धोतीनेरु’ घालत नाहीत, विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याची लग्न पत्रिका पण बंजारा भाषे मध्ये छापण्यात आली.


समाजात संस्कृति टिकली पाहीजे व पेहरावात संस्कृतिचे महत्व असून पेहरावावरुन बंजारा संस्कृतिचे दर्शन होते. ग्रामिण भागात आजही संस्कृतिचे दर्शन पुरातन पेहरावातून दिसते. याला मात्र शहरीलोक पसंती देत नाही. यातून पेहराव लुप्त होत असून संस्कृतिस घाला बसत आहे. त्यासाठीच “आपणो संस्कृति च्छ आपणचं जतनं करावो लागेण.” म्हणत नववधू वरांनी हा निर्णय घेतला असे वर आशिष यांनी सांगितले. या समाजजागृतीवर विवाह सोहळ्यात उपस्थित सर्वाचे लक्ष वेधले विवाह प्रसंगी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.





