विद्यार्थीच महासत्ताक भारत घडवू शकतात- आ.ग. ढवळे -NNL

अर्धापूर| भारत देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त विषमता, जातीयता, भ्रष्टाचार नष्ट करुन विज्ञानाची कास धरुन तंत्रज्ञानाने देश बलवान घडविण्याचे काम विद्यार्थीच करु शकतात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार, नाटककार आ.ग. ढवळे यांनी केले.

ते नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लोणी बु. येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये स्वलिखीत शाहिरी गीत गायनातून व एकपात्री नाट्यप्रयोग सादर करुन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. मुख्याध्यापक एस.आर. डमरे यांनी आ.ग. ढवळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला. गुरु गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नालंदा पाटील- भगत यांनी सुत्रसंचालन केले. अर्धापूरकर मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिंदे, डहाळे आदींनी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button