नांदेडराजकीय

Provide help : शेतकरी व भूमिहीन शेतमजूरांना मदत व रोजगार द्या!

नांदेड (प्रतिनिधी) गत तिन महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी व भूमिहीन शेतमजूरांची दयनीय अवस्था झाली असून, त्यांना तातडीने आर्थिक मदतीसह हाताला काम द्यावे अशी मागणी कामारी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मा. भवरे कामारीकर, वैभव नरवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. शेतजमिनी, घरे, दुकाने व पशुधनाचे झालेले मोठे नुकसान, तसेच भूमिहीन शेतमजुरांवर आलेली उपासमारी याची सविस्तर माहिती देऊन सरसकट आर्थिक मदत व रोजगार हमी कामाची मागणी करण्यात आली.

या निवेदनावर लक्ष्मणराव मा. भवरे, वैभव नरवाडे, नथुराम कांबळे, भगवान शिंगणकर, बाबासाहेब नरवाडे, विनोद नरवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button