नांदेडराजकीय

Ashok chavhan ; नेरलीची पुनरावृत्ती टाळा – खा. अशोकराव चव्हाण -NNL

नांदेड। नेरली येथे दूषित पाणी पिऊन उद्भवलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने तत्परतेने पाऊले उचलली. मात्र, नेरलीच्या या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

नेरली येथील घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी प्रशासनाशी संपर्क साधून सद्यस्थिती जाणून घेतली. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती पावले उचलली आहेत. मात्र, भविष्यात इतरत्र असा प्रकार घडणार नाही, यासाठी योग्य ते खबरदारीचे उपाय प्रशासनाने करावेत, अशी सूचना मी दिली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button