लोहा| दैनंदिन जीवनात गावातील भौतिक सुविधेचा अभाव असेल तर ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.लोकप्रतिनिधी जागरूक नसेल ते त्या भागातील जनतेंनी जावे कुठे(?) असा प्रश्न उभा राहतो.स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून ऐन पावसाळ्यात लोह्यात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेल्या बेरळी(खु) या गावाची नदीमुळे दोन भाग झाले. शाळेत विद्यार्थ्यांना जाण्यासाठी तसेच अन्य कामासाठी ग्रामस्थांना या नदीपात्रातून जाताना मोठी अडचण उदभवत आहे.

पूल व्हावा ही ग्रामस्थांची इच्छा ..! पण अकार्यक्षम लोकप्रतिनिधी व बहिरे प्रशासन याना अनेक वर्षा पासून बेरळी ग्रामस्थांच्या हाका ऐकू येत नाहीत ! लोहा शहराजवळ असलेल्या बेरळी खुर्द गावातून नदी छोटा ओढा गेला त्यामुळे गावचे विभाजन झाले आहे .अर्ध्येगाव नदी पल्याड आहे. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना दररोज नदी पात्रातून यावे लागते.,शेती तसेच अन्य कामासाठी दररोज होणारी हेळसांड खूपच त्रासदायक आहे.

जिल्हा प्रशालेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना नदी पात्रात उतरून दररोज शाळेला जावे लागते. शेतकर्यांना शेतीचा माल काढण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागतो.पावसाळ्या नदीला पूर येतो तेव्हा आवक जावक थांबते.अनेकदा जीव धोक्यात घालून जावे लागते अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या पण बधिर झालेल्या प्रशासन व लोकप्रतिनिधी याना या ग्रामस्थांच्या तक्रारीचा अजून आवाज ऐकूच आला नाही ना प्रशासनाने दखल घेतली नाही लोकप्रतिनिधी यांनी या प्रश्नाकडे जागरूकतेने पाहिले आहे.


नदीपात्रावर पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जाते पण अजून त्यास यश आले नाही नदी पत्रातून प्रवास करत अध्ययन अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्रास दूर वाहवा, आता तरी पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सरपंच नाईक, अकबर मौलाना , पत्रकार बाळासाहेब बुद्धे, ज्ञानोबा रायबोले, नामदेव बुद्धे,यासह ग्रामस्थांनी तहसीलदार ,बिडीओ यांच्याकडे पूल बांधणीसाठी मागणी केली आहे.


