नांदेड| Pulwama attack येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांना नांदेडकरांनी कृतज्ञतेने अभिवादन केले. हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त माजी मंत्री D. P. Sawant यांच्या उपस्थितीत पॅरामिलिटरी संघटनेतर्फे शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली.

शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.१५ वाजता शहरातील तिरंगा चौक येथील शहीद स्मारकापासून रॅलीला सुरुवात झाली. विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली आय.टी.आय. परिसरातील Mahatma Phule स्मारकापर्यंत पोहोचली. सहभागींच्या हातात तिरंगा, घोषणांनी दुमदुमलेले वातावरण आणि देशभक्तीच्या जयघोषामुळे परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला होता.

या रॅलीत पॅरामिलिटरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोणे, उपाध्यक्ष जनार्धन शेजुळे, पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महात्मा फुले व Savitribai Phule यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले.


यावेळी बोलताना डी. पी. सावंत म्हणाले, “देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शूर सैनिकांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही. त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित आहोत.” कार्यक्रमादरम्यान शहीदांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

नांदेडकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत पुलवामाच्या शूरवीरांना कृतज्ञतेची सलामी दिली. या रॅलीतून शहीद जवानांच्या स्मृती प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आजही जिवंत असल्याचा संदेश अधोरेखित झाला.

