heavy rains : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान; तलाठी थळगे यांची पाहणी

हिमायतनगर| अतिवृष्टीमुळे कारला शिवारातील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. गावातील शिवार पाण्याखाली गेल्याने विशेषतः नाल्यालगतच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बोरगडी सज्जाचे तलाठी थळगे यांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन शेतकऱ्यांना भेट दिली. पिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगडी सज्जाचे तलाठी थळगे यांनी पिकांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली, यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितले की, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याप्रसंगी गावातील नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button