Friday, May 15

Tag: due to heavy rains

Farmer commits suicide : मुसळधार पाऊस आणि नदीला सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer commits suicide : मुसळधार पाऊस आणि नदीला सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर तालुक्यातील कोठा येथील शेतकरी अशोक विठ्ठल दवणे यांनी सोमवारी सायंकाळी आत्महत्या (Farmer commits suicide) केल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. शेतातील उभे राहिलेले थोडेफार पीकसुद्धा पैनगंगा नदीत इसापूर धरणाचे दरवाजे उघडून सोडण्यात आलेल्या पाण्यात वाहून गेले. परिणामी दवणे यांच्या शेतात तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. या पाण्यात शेतीतील गाळ, पाईप, साहित्य वाहून गेले तर उभे पीक शंभर टक्के नुकसानग्रस्त झाले. झालेला खर्च कसा परत करायचा, सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समजते. गावचे पोलीस पाटील गौतम दवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठा गाव नदीकाठावर असल्याने संपूर्ण शिवार पाण्याखाली गेले होते. या संकटातून मार्ग न दिसल्यानेच शेतकऱ्यांन...
Himayatnagar : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

Himayatnagar : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीनाल्याच्या काठासह संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकाटात सापडला असून, यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी (Provide assistance of Rs 50,000 per hectare to farmers in Himayatnagar taluka who suffered losses due to heavy rains) अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारां मार्फत निवेदन देऊन करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसामुळे नदी नाल्याच्या काठावरील शेती खरडून पिके वाहून गेली आहेत. इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या निसर्गामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये व नाले व इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांना ह...
heavy rains : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान; तलाठी थळगे यांची पाहणी

heavy rains : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान; तलाठी थळगे यांची पाहणी

कृषी, नांदेड
हिमायतनगर| अतिवृष्टीमुळे कारला शिवारातील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. गावातील शिवार पाण्याखाली गेल्याने विशेषतः नाल्यालगतच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बोरगडी सज्जाचे तलाठी थळगे यांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन शेतकऱ्यांना भेट दिली. पिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगडी सज्जाचे तलाठी थळगे यांनी पिकांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली, यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितले की, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याप्रसंगी गावातील नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते....
Namdar Hemant Patil : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी – नामदार हेमंत पाटील

Namdar Hemant Patil : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी – नामदार हेमंत पाटील

नांदेड, राजकीय
नांदेड| मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यतः मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळी वारे व अतिवृष्टीमुळे केळी सह फळबाग व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त  शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना मुख्यानेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नामदार हेमंत पाटील यांनी केली. नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वादळी वाऱ्यासह मोठया प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे,पशूंचे नुकसान झाले आहे .यामध्ये प्रामुख्याने केळी बागा जमीनदोस्त झाल्याने  केळीच्या दरात  घसरण झाली असून ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.तसेच नदी नालयांना पूर येऊन शेतकऱ्यांच्या पशुधनाची हानी झाली आहे. त्यामुळेअतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला असून नुकसा...
error: Content is protected !!