Saturday, July 4

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

DRM Nanded inspects : डीआरएम नांदेड यांची स्थानकांची पाहणी; पायाभूत सुविधा विकास कामांचा आढावा

DRM Nanded inspects : डीआरएम नांदेड यांची स्थानकांची पाहणी; पायाभूत सुविधा विकास कामांचा आढावा

नांदेड, तेलंगणा, परभणी, महाराष्ट्र
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM) श्री. कल्याण राजू यांनी विविध रेल्वे स्थानकांची पाहणी करत सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान कार्यक्षमता, सुरक्षा मानके आणि प्रवासी सुविधांवर विशेष भर देण्यात आला. दौऱ्यादरम्यान नागरसोल ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर रियर विंडो निरीक्षण करून सुरू असलेल्या दुहेरीकरण (Doubling) कामांच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे मार्गाची क्षमता वाढून गाड्यांची वेळपालनता सुधारण्यासोबतच प्रवासी आणि मालवाहतुकीला मोठी गती मिळणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच नागरसोल, रोटेगाव, परतूर, सेलू आणि मानवत रोड या स्थानकांची अमृत भारत स्टेशन योजना (ABS) अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यात आली. या वेळी स्थानकांवरील प्रवासी सुविधा, स्वच्छता, सुरक्षा व्यव...
LCB’s crackdown : एलसीबीची धडक कारवाई : अवैध वाळू उपशावर मोठा घाव; ४९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

LCB’s crackdown : एलसीबीची धडक कारवाई : अवैध वाळू उपशावर मोठा घाव; ४९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल ४९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक २३ मार्च रोजी एलसीबीच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली. यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापा टाकण्यात आला. कारवाई दरम्यान १ ब्रास अवैध वाळू (₹५०,०००) तसेच हायवा (₹४९ लाख) असा एकूण ₹४९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाजेगाव,नांदेड आणि रा. बोंडार, उमरी येथील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वा...
Big relief for farmers : शेतकऱ्यांना मोठा दिलासा: दोन लाखांपर्यंत शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क पूर्ण माफ

Big relief for farmers : शेतकऱ्यांना मोठा दिलासा: दोन लाखांपर्यंत शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क पूर्ण माफ

कृषी, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत शेती किंवा पीक कर्जावरील दोन लाखांपर्यंतचे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व बँका व वित्तीय संस्थांना तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक, पुणे यांनी जारी केलेल्या सूचनांनुसार, शासन अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे शेती किंवा पीक कर्जाशी संबंधित विविध कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. यात अभिस्वीकृती पत्र, रोखपत्र करारनामा, हक्कविलेख निक्षेप, तारण/गहाणखत, हमीपत्र, प्रतिभूती बंधपत्र, तसेच गहाणाशी संबंधित सूचनापत्र किंवा घोषणापत्र यांचा समावेश आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी लागू असलेली ही मुद्रांक शुल्क माफी शेतकऱ्यांच्या आर्थिक भारात मोठी घट करणारी ठरणार आहे. शासनाने या ...
Aaple Sarkar Seva : आपले सरकार सेवा केंद्र वाटप आता पूर्णपणे ऑनलाईन; पारदर्शक प्रक्रियेला प्राधान्य

Aaple Sarkar Seva : आपले सरकार सेवा केंद्र वाटप आता पूर्णपणे ऑनलाईन; पारदर्शक प्रक्रियेला प्राधान्य

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे शासन निर्णयानुसार गुणांकन करून निवड केली जाणार आहे. या प्रक्रियेत शैक्षणिक पात्रता व अनुभवाला महत्त्व देण्यात आले आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास ३० गुण, पदव्युत्तर असल्यास २५ गुण आणि सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) चालविण्याचा अनुभव असल्यास २५ गुण देण्यात येणार आहेत. समान गुण असल्यासच मुलाखत -  एखाद्या गावासाठी एकापेक्षा अधिक अर्जदारांचे गुण समान असल्यासच मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीसाठी एकूण २० गुण निश्चित करण्यात आले असून, त्यात तांत्रिक ज्ञानासाठी ६ गुण, लोकसेवा हक्क अधिनियम २०२५चे ज्ञानासाठी ४ गुण आणि सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्व व सामाजिक कार्यासाठी १० गुण राखीव आहेत. उच्चस्तरीय समितीद्व...
Himayatnagar police raid : हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई : ४.८८ लाखांचा गुटखा-पान मसाला जप्त

Himayatnagar police raid : हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई : ४.८८ लाखांचा गुटखा-पान मसाला जप्त

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| अवैध गुटखा व पान मसाला विक्रीविरोधात हिमायतनगर पोलिसांनी मौजे पोटा बु.येथे धडक कारवाई करत तब्बल ४ लाख ८८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक २३ मार्चच्या रात्री ९.२० वाजताच्या सुमारास पोटा बु. परिसरात सापळा रचून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या ऑपरेशन प्लॅश अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथील मस्जिदच्या बाजूला शेख बाबा बलिसाब यांच्या टिन पत्र्याच्या घरामध्ये सय्यद सत्तार सय्यद खादर रा.पोटा याने विनापरवाना, बेकायदेशीर नागरिकांच्या आरोग्यास घातक असल्याने महाराष्ट्र शासनाने वाहतूक, साठवणुकीस बंदी असलेला गुटखा व पान मसाला विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आले. यात पो...
Hbp. Gajendra Chaitanya Maharaj : “तरुणांनो, दारू-तंबाखूच्या व्यसनाने लाखमोलाचा मनुष्य देह व्यर्थ घालवू नका” — ह.भ.प. गजेंद्र चैतन्य महाराज

Hbp. Gajendra Chaitanya Maharaj : “तरुणांनो, दारू-तंबाखूच्या व्यसनाने लाखमोलाचा मनुष्य देह व्यर्थ घालवू नका” — ह.भ.प. गजेंद्र चैतन्य महाराज

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर तालुक्यातील कारला येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात रविवारी सायंकाळी ह.भ.प. बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांची प्रभावी कीर्तनसेवा संपन्न झाली. यावेळी त्यांनी तरुणांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आणि संत विचार अंगीकारण्याचे भावपूर्ण आवाहन केले. कीर्तनात बोलताना महाराज म्हणाले की, “जन्माला आलेला प्रत्येक मनुष्यदेह हा अनंत जन्मांची पुण्याई असून त्याची किंमत लाखमोलाची आहे. मात्र आज अनेकजण दारू, गुटखा, तंबाखूच्या आहारी जाऊन स्वतःचे आरोग्य बिघडवत आहेत. यामुळे लिव्हर, किडनीसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळते आणि कुटुंबाचा आधारही हिरावला जातो.” व्यसनमुक्तीचा संदेश “देह एकदा गेला तर पुन्हा मिळत नाही, त्यामुळे त्याची जपणूक करा. कर्माला घाबरा, व्यसनाधीन होऊ नका आणि परमार्थाचा मार्ग स्वीकारा,” असे सांगत त्यांनी तरुणांना योग...
Every Home in Ram : “घराघरात राम, जीवनात समाधान” — राधाकृष्ण जी महाराज यांचे हृदयस्पर्शी प्रतिपादन

Every Home in Ram : “घराघरात राम, जीवनात समाधान” — राधाकृष्ण जी महाराज यांचे हृदयस्पर्शी प्रतिपादन

धार्मिक, नांदेड
हदगाव/हिमायतनगर/भोकर /नांदेड| हदगाव तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथे सुरू असलेल्या पवित्र श्रीराम कथेमध्ये तिसऱ्या दिवशी कथाव्यास राधाकृष्ण जी महाराज यांनी आपल्या ओजस्वी, प्रभावी आणि भावपूर्ण वाणीने उपस्थित भाविकांच्या अंतःकरणाला स्पर्श करत अध्यात्मिक विचारांचा अमृतवर्षाव केला. त्यांच्या प्रवचनातून भक्ती, ज्ञान आणि सदाचार यांचा सुंदर संगम साधत जीवनाला योग्य दिशा देणारा संदेश देण्यात आला. “घराघरात राम” — समाधानाचा खरा मार्ग “प्रत्येकाने आपल्या घरामध्ये राम आणावा,” असे सांगताना महाराजांनी स्पष्ट केले की, ज्या घरात रामाचे स्मरण असते, त्या घरात आपोआप कीर्तन, अर्चन, गोसेवा आणि ज्ञानेश्वरी गाथेचा पवित्र वास निर्माण होतो. कुटुंबातील प्रत्येकाच्या सुख-दुःखाची काळजी घेणारा, सर्वांना एकत्र बांधणारा जो भाव असतो, तोच खरा ‘राम’ असल्याचे त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दांत मांडले. ज्ञानाचे महत्त्व अ...
H.B.P. Balayogini Muktai Maheshwari Nath : “स्त्रीने संसार करताना जिवनसाथी व मोठ्यांचा आदर ठेवावा”

H.B.P. Balayogini Muktai Maheshwari Nath : “स्त्रीने संसार करताना जिवनसाथी व मोठ्यांचा आदर ठेवावा”

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर तालुक्यातील मौजे कारला येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात शिवपुराण कथेमधून समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश देताना ह.भ.प. बालयोगीणी मुक्ताई महेश्वरी नाथ यांनी स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक जीवनावर मार्मिक विचार मांडले. त्या म्हणाल्या की, “जन्माला आलेली मुलगी दोन कुळांचा उद्धार करते, तर मुलगा एका कुळाचा उद्धार करतो. मात्र तो मुलगा संस्कारित असेल तरच पिढ्यांचा उद्धार होतो; अन्यथा व्यसनाधीनतेमुळे संपूर्ण कुटुंबाचे नुकसान होते. त्यामुळे मुलीच्या जन्माचे स्वागत करणे आवश्यक आहे.” या सप्ताहात आयोजित भव्य शिवपुराण कथेमध्ये तिसऱ्या दिवशी माता सतीचा यज्ञ आणि भगवान शिवांची विरक्ती या प्रसंगावर त्यांनी प्रभावी कथन केले. राजा दक्षाने यज्ञात भगवान शिवांचा अपमान केल्यामुळे सतीने यज्ञाग्नीत देहत्याग केल्याची कथा सांगताना त्यांनी वैवाहिक जीवन...
District Collector Rahul Kardile : बीएलओ व बीएलए यांच्या समन्वयातून प्री एस आय आर मॅपिंग तात्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile : बीएलओ व बीएलए यांच्या समन्वयातून प्री एस आय आर मॅपिंग तात्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम 2025 च्या निमित्ताने नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष तालुका सचिव, सर्व नगरसेवक, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, रास्त भाव दुकानदार, पोलीस पाटील, निवडक बीएलओ आणि सर्व पर्यवेक्षक यांची कार्यशाळा आज संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बोलताना सांगितले, अद्याप निवडणूक आयोगाने एस आय आर (SIR) कार्यक्रम जाहीर केला नसला. तरी त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून सर्व मतदारांची 2002 च्या मतदार यादीशी मॅपिंग करणे आवश्यक आहे. यासाठी निवडणूक विभागाने पर्यवेक्षक आणि बीएलओ यांची यंत्रणा कामाला लावली आहे. त्या माध्यमातून सर्व मतदारांनी आपले नाव 2002 च्या मतदार यादीशी मॅप करून घेणे गरजेचे आहे. सदर काम...
demand for electric buses : खा. अशोकराव चव्हाण यांची महाराष्ट्रातील लहान शहरांसाठी इलेक्ट्रिक बसेसची मागणी

demand for electric buses : खा. अशोकराव चव्हाण यांची महाराष्ट्रातील लहान शहरांसाठी इलेक्ट्रिक बसेसची मागणी

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड| महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज संसदेत महाराष्ट्रातील टियर-२ व टियर-३ शहरांसाठी ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेस मागणी केली. या योजनेच्या पुढील टप्प्यात ३ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जास्तीत जास्त शहरांना बसेस उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मनोदय असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी उत्तरादरम्यान स्पष्ट केले. राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेबाबत आज झालेल्या चर्चेत सहभागी होताना खा. अशोकराव चव्हाण यांनी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३५ हजार इलेक्ट्रिक बसेसचे वितरण करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या योजनेमुळे नागरिकांना माफक दरात पर्यावरणपूरक प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी नमूद ...
error: Content is protected !!