Thursday, July 16

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shahaji Umap : कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून नागरिकांचा वाचावीण्यासाठी व्यसनमुक्त गाव मोहीम – पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप -NNL

Shahaji Umap : कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून नागरिकांचा वाचावीण्यासाठी व्यसनमुक्त गाव मोहीम – पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| व्यसनाधिनतेमुळे ग्रामीण भागात पोहोचलेल्या कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात व्यसनमुक्त गाव मोहीम ही योजना राबविण्यात येत आहे. असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप केले. ते दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, व्यसनमुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील मौजे शिऊर, तालुका हदगाव येथून करण्यात आला यावेळी बोलत होते. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी, अहमदपूर तालुक्यातील मौजे खंडाळी तर गंगाखेड तालुक्यातील मौजे इसाद येथून अनुक्रमे लातूर व परभणी जिल्ह्यातील व्यसनमुक्त गांव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. सदर दोन्ही ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमास, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर, मौजे खंडाळी येथे झालेल्या कार्यक्रमास लातूरचे अपर पोलीस अधीक्षक ...
Organized Mass Mahabuddhavandan : ६८ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक महाबुद्धवंदनाचे आयोजन -NNL

Organized Mass Mahabuddhavandan : ६८ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त सामूहिक महाबुद्धवंदनाचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| भगावन बुद्धानी पंचवर्गीय भिक्खुना धम्म उपदेश देत प्रथम धम्म चक्र प्रवर्तन केले. दि. १४ ऑक्टोबर १९५६ अर्थात अशोक विजया दशमी दिनी बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या घटनेला येणाऱ्या अशोक विजया दशमीदिनी ६८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने नांदेडवासीयांतर्फे प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक ७ वा महाबुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रमुख भदंत विनयबोधी थेरो, भंदत पंय्यारत्न थेरो,भंन्ते अश्वजीत थेरो,भंन्ते शिलरत्न थेरो ,भंन्ते बुध्दभुषन,भंन्ते पय्यवंर्धन हिंगोली,भिक्षुणी चारुशीला थेरीया ची उपस्थित राहून वंदना देणार आहेत. अडीच हजार वर्षांचा दैदीप्यमान असा ऐतिहासिक वारसा लाभलेले नांदेड शहर अलीकडच्या काळामध्ये सामाजिक चलवळींचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आलेले आहे. सामा...
S.M. Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे फक्त निवडणूक जुमला : एस.एम.देशमुख यांची जोरदार टीका -NNL

S.M. Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे फक्त निवडणूक जुमला : एस.एम.देशमुख यांची जोरदार टीका -NNL

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| पत्रकार विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी कोणत्याही प्रमुख संघटनेनं कधी केली नव्हती. अथवा महामंडळाचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने कोणत्याही प्रमुख संघटनेबरोबर चर्चा केली नाही. तरीही अचानक महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे.. हे महामंडळ म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पत्रकारांना गाजर दाखविण्याचा प्रकार असून हा ही एक निवडणूक जुमला असल्याचा आरोप मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी एका पर्सिध्दी पत्रकाव्दारे केला आहे. महाराष्ट्र सरकारने पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज घेतला आहे.. या निर्णयाला विरोध करताना एस.एम.देशमुख म्हणाले. राज्यात पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी होत नाही, पेन्शन योजनेचे भिजतघोंगडे पडले आहे. अधिस्वीकृतीचे प्रश्न प्रलंबित आहेत, मजेठिया ची अंमलबजावणी होत नाही, छोट्या वृत्तपत्रांचे प्रश्न आहेत या सर्व बुनियादी प्रश्नांकडे दुर्...
Devotional atmosphere in Shiradhon : शिराढोण नगरीत आज व उद्या भक्तीमय वातावरण -NNL

Devotional atmosphere in Shiradhon : शिराढोण नगरीत आज व उद्या भक्तीमय वातावरण -NNL

नांदेड, धार्मिक
उस्माननगर, माणिक भिसे| दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री.भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा भवक्तीमय वातावरणात साजरा होत आहे. दि. ११ ऑक्टोबर शुक्रवारी रात्रौ तीन वाजता भीमाशंकर महाराजांची पालखी अग्नीकुंडातून प्रवेश होत असते.हे पहाण्यासाठी पंचक्रोशीतील व बाहेर जिल्ह्यातून भक्तमंडळी यांची गर्दी होत असते. मागील अनेक वर्षांपासून शिराढोण येथे श्री भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. याठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दररोज किर्तन सोहळा व श्री भीमाशंकर महाराज यांचे नामस्मरण करताना परिसर मंगलमय वातावरणाने पसरत असते. दि.१० ऑक्टोबर रोजी या दिवसापासून यात्रा भरण्यासाठी विविध प्रकारचे खेळणे , आकाश पाळणे , खसरगुडी , आशा अनेक दुकानांची गर्दी झाली आहे. ११ऑक्टोबर शुक्रवारी संध्याकाळी ७ ते १० महाप्रसाद , रात्रौ १० ते १ गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा...
maha vastra to the mother : मातेला गुलाबी रंगाच्या महा वस्त्रासह गाईच्या तुपाचे पायस नैवेद्य अर्पण -NNL

maha vastra to the mother : मातेला गुलाबी रंगाच्या महा वस्त्रासह गाईच्या तुपाचे पायस नैवेद्य अर्पण -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून नवरात्रोत्सवाचि आठवी माळ सप्तमी अष्टमीच्या दिवशी सकाळी ७ वाजता मातेच्या वेद घोषात वैदिक महापुजेस प्रारंभ करण्यात आला त्यानंतर मातेला अलंकारासह गुलाबी रंगाचे पैठणी महावस्त्र अर्पण करून वेद पारायण फुलोरा सुरु करण्यात आला. सरस्वती पूजन झाल्यानंतर मातेला गाईच्या शुद्ध तुपाचा पायस नैवेद्य अर्पण करून ५१ कुमारीकासह ५१ सूवासीनीचे पूजन करण्यात आले आले, यावेळी तहसीलदार तथा कोषाध्यक्ष किशोर यादव, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव सर्व विश्वस्थ तथा पुजारी यांच्या उपस्थितीत दुर्गा सप्तशती शतचंडीपाठास हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. श्री रेणुका मातेस दुपारी पायस नैवेद्य गाईचे तूप अर्पण करण्यात आले, आरती झाल्यानंतर छबीना मिरवणूक काढण्यात आली,परिवा...
Heavy rain disrupts : दमदार पावसाने सोयाबीन काढणीत व्यत्यय, कापूस, सोयाबीन खराब होण्याचा धोका – NNL

Heavy rain disrupts : दमदार पावसाने सोयाबीन काढणीत व्यत्यय, कापूस, सोयाबीन खराब होण्याचा धोका – NNL

कृषी, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| तालुक्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाला सुरुवात होवून दि.८ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले आहे.अशातच काल दुपारी १ वाजताच्या व दुपारी ३ च्या दरम्यान पून्हा जोरदार अर्धा तास पाऊस झाला. दरम्यान, काढणी सुरू असलेले सोयाबीन जाग्यावरच भिजल्याने अनेक शेतकर्‍याचे नूकसान झाल्याचे बोलल्या जात आहे. मंगळवारी व गुरुवारी पावसाने दिलेल्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.यात कापूस आणि सोयाबीन असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांची लागवड केली जाते. यावर्षी चांगला भाव मिळणार, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु या दोन्हीही पिकांचे पावसाने आता मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती अ...
Dnyaneshwar Bhartiji Maharaj : मठाधिश श्री श्री श्री १००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज यांच्या स्वखर्चातून वृध्द आश्रमाची उभारणी -NNL

Dnyaneshwar Bhartiji Maharaj : मठाधिश श्री श्री श्री १००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज यांच्या स्वखर्चातून वृध्द आश्रमाची उभारणी -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| जगात असंख्य वयोवृद्ध दाम्पत् आहेत ज्यांना एकतर जन्मतःच (मुलबाळ) नसते. किंवा अपत्य असलेले अपत्य (मुलबाळ) अकाली मृत्युमुखी पडून वयोवृद्धावर निराधार होण्याची वेळ आलेली असते. शिवाय त्यांना जवळचे नातेवाईकही नसतात. यामुळे अशा आधाराकरीता, वृद्धांना सामाजिक जवळीकतेकरीता आणि त्यांच्या विरंगुळ्याकरीता वृद्धाश्रमाचा आधार असतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून माहूरगड येथील मठाधिश श्री श्री श्री १००८ म.श्री महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज (श्री.ह.भ.प.आर्च बाळु महाराज काकाणी ) हे स्वखर्चातून वृध्द आश्रम उभारणार असून त्या वृध्द आश्रमाचे भुमिपूजन श्री श्री श्री १००८ श्री महंत उमाशंकर भारतीजी महाराज (अध्यक्ष श्री पंच दसणाम जुना आखाडा .काशी ) यांच्या शुभहस्ते व अनेक साधु संताच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. आज समाजात कित्तेक निराधार,बेघर,अनाथ वयोवृध्द आपल्याला आपल्...
Will donate 51 bottles of chemotherapy for cancer patients : कॅन्सर देव रतन टाटा यांच्या स्मरणार्थ वाढदिवस साजरा न करता कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरेपीच्या ५१ बाटल्या दान करणार -NNL

Will donate 51 bottles of chemotherapy for cancer patients : कॅन्सर देव रतन टाटा यांच्या स्मरणार्थ वाढदिवस साजरा न करता कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरेपीच्या ५१ बाटल्या दान करणार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| येथील ड्रायक्लिनींग उद्योगपती विनोद बाहेती यांच्या धर्मपत्नी सौ. कोकिळा बाहेती यांच्या वाढदिवसानिमित्त येथील शासकीय रुग्णालयातील कॅन्सर रुग्णांसाठी ५१ केमो थेरेपीच्या बाटल्या दान देण्याचा संकल्प केला आहे. भारतातील कॅन्सर रुग्णांचे 'कॅन्सर देव' म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी कॅन्सर रुग्णालयात काही काळ उपचार घेतले होते. तेथील उत्कृष्ट सेवेची प्रेरणा घेऊन 'नर सेवा ही नारायण सेवा' हा उद्देश घेऊन उभारलेल्या रतन टाटा कॅन्सर हाॅस्पिटलला सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही या निमित्ताने अक्षय ड्रायक्लिनर्सचे विनोद बाहेती, उत्तराधिकारी राजू चौडेकर, वैष्णवी व निमिता बाहेती यांनी केले आहे. 'सेवा हाच सर्वोत्तम धर्म आहे' हे ब्रीद घेऊन कॅन्सर रुग्णांच्या अविरत सेवेत असलेले मुंबई येथील रतन टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या उत्कृष्ट सेवेमुळेच नांदेड येथील सौ. कोकिला बाहेती या...
Navratri festival at Dagadgaon : दगडगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त महिला पालक मेळावा -NNL

Navratri festival at Dagadgaon : दगडगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त महिला पालक मेळावा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| शेवडी बाजीराव केंद्रांतर्गत दगडगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नवरात्र उत्सवानिमित्त महिला पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच औचित्याने शाळेच्या माता पालक संघाची बैठकही उत्साहात संपन्न झाली. यावेळी मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुनेगाव बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सरस्वती अंबलवाड, सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आणि महिला उपस्थित होत्या. यावेळी स्वच्छतेची प्रतिज्ञाही घेण्यात आली. या निमित्ताने इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गितांचे गायन केले. त्यानंतर माता पालक संघ व इतर माता पालकांचे इयत्ता सहावीच्या वर्गशिक्षिका गंगा नागरगोजे यांनी हळदी कुंकवाने औक्षण केले. या मेळाव्यात मुख्याध्यापक अशोक राऊत यांनी मार्गदर्शन केले. तसेच सहशिक्षिका गंगा नागरगोजे आणि अनुराधा राऊत यांनी आपल्या मुलींच्या बाबतीत सशक्तीकरण आणि ...
Chief Minister Vyoshree Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्यास 31 ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ -NNL

Chief Minister Vyoshree Yojana : मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्यास 31 ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज स्विकारण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 6 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे योणान्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उप...
error: Content is protected !!