National Flag : कंधार तालुक्यातील तांड्यावरील चार भटक्या महिला करणार दिल्ली येथील लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वजास वंदन !
कंधार, सचिन मोरे| देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२६ रोजी राजधानी नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील तांड्यावरील ४ भटक्या महिलांना सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.ही बाब निश्चितच भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील महिलांसाठी अभिमानास्पद असल्याची चर्चा कंधार तालुक्यातील अनेक वाडी तांड्यामधून ऐकावायास मिळत आहे.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य या भटक्या महिलांना केवळ धान फाउंडेशनच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल तालुक्यातील समस्त बंजारा समाजाने धान फाउंडेशनचे आभार व्यक्त केले आहे.
नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनबीसीएफडिसी) आणि एसइइडी प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील धान फाउंडेशनच्या सहकार्याने या महिलांना राजधानी द...









