Himayatnagar Morcha : भूमिहीन शेतमजुरदारांचा हिमायतनगर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा
हिमायतनगर,अनिल मादसवार | तालुक्यातील पैनगंगा नदीकाठी असलेल्या दिघी गावासह परिसरातील भूमिहीन शेत - मजुरदारांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आज (10 सप्टेंबर) बुधवारी हिमायतनगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हिमायतनगर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचे जवळपास 90 ते 100 टक्के पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. परिणामी शेतमजुरदारांच्या उपजीविकेवर गदा आली असून, त्यांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. येणारा दसरा दिवाळी सन कसा साजरा करायची आपल कुटुंब कस चालवायच मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न भूमिहीन शेतमजूरदारा समोर उभा टाकला आहे.
यावेळी मोर्चेकर्यांनी शेतमजुरदारांच्या प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदार याना दिले. यामध्ये भूमिहीन शेतमजुरदारांना गायरान जमिनीतून जमिनीचे वाटप ...









