Thursday, May 21

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Himayatnagar Morcha : भूमिहीन शेतमजुरदारांचा हिमायतनगर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

Himayatnagar Morcha : भूमिहीन शेतमजुरदारांचा हिमायतनगर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार | तालुक्यातील पैनगंगा नदीकाठी असलेल्या दिघी गावासह परिसरातील भूमिहीन शेत - मजुरदारांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आज (10 सप्टेंबर) बुधवारी हिमायतनगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हिमायतनगर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचे जवळपास 90 ते 100 टक्के पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. परिणामी शेतमजुरदारांच्या उपजीविकेवर गदा आली असून, त्यांच्या हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. येणारा दसरा दिवाळी सन कसा साजरा करायची आपल कुटुंब कस चालवायच मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न भूमिहीन शेतमजूरदारा समोर उभा टाकला आहे. यावेळी मोर्चेकर्यांनी शेतमजुरदारांच्या प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदार याना दिले. यामध्ये भूमिहीन शेतमजुरदारांना गायरान जमिनीतून जमिनीचे वाटप ...
Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटनुसार गोरबंजारा समाजाला एस.टी. आरक्षण द्या – गोरसेना

Hyderabad Gazette : हैदराबाद गॅझेटनुसार गोरबंजारा समाजाला एस.टी. आरक्षण द्या – गोरसेना

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| निजाम प्रांतातील 1901 ते 1948 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा, लंबाडा, लमाण या समाजांची नोंद अनुसूचित जमात म्हणून करण्यात आली होती. त्यानुसार तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील बंजारा-लंबाडा समाजाला अनुसूचित जमातीचे (एस.टी.) आरक्षण मिळत आहे. मात्र 1948 नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडा, विदर्भ व खानदेश महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाचे मूळ आरक्षण संपुष्टात आले आणि त्यांना विमुक्त जाती संवर्गात टाकण्यात आले. त्यामुळे समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करून गोरसेनेने एस.टी. आरक्षणाची मागणी केली आहे. तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर 10 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात गोरबंजारा समाजाक...
Shiva Sanghatana ; मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

Shiva Sanghatana ; मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार जात नोंदींमध्ये होत असलेला फेरफार थांबवावा, या मागणीसाठी “शिवा” अखिल भारतीय वीरशैव युवक संघटने तर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेचा स्टॅम्प क्रमांक ३०२९६/२०२५ असून, ती आज दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ही याचिका संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष धर्मवीर प्रा. मनोहर धोंडे (मो. ९४२२२१०५६७) यांनी प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. सतीश तळेकर यांच्या मार्फत दाखल केली आहे. या प्रकरणावर उद्या दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी मा. मुंबई उच्च न्यायालयात प्रथम सुनावणी होणार आहे. शिवा संघटनेचे म्हणणे आहे की, “ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारे व मूळ ओबीसींना अन्याय करणारे ...
Nanded flight service : नांदेड विमानसेवा दोन दिवसांत सुरु होणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा पुढाकार

Nanded flight service : नांदेड विमानसेवा दोन दिवसांत सुरु होणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा पुढाकार

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड (प्रतिनिधी) मागील महिन्यात धावपट्टी खराब झाल्याने बंद पडलेली नांदेड विमानसेवा येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी सातत्याने संपर्क ठेवून अल्पावधीतच धावपट्टीचे काम पूर्ण करून घेतले आहे. विमान प्राधिकरणाने चाचणी करून विमानसेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. नांदेड विमानतळावरून पूर्वी बेंगळुरू, हैद्राबाद, अहमदाबाद, पुणे, पंजाब अशा ठिकाणी विमानसेवा सुरू होती. मात्र दोन महिन्यांपूर्वी धावपट्टी खराब झाल्याने एका विमानाला हवेत भरकटावे लागले होते. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांची पाहणी करण्यात आली होती. त्यात नांदेडच्या धावपट्टीची दुरुस्ती होईपर्यंत सेवा थांबविण्याची शिफारस प्राधिकरणाने केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कर्डीले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रभा...
District Collector : भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा -जिल्हाधिकारी

District Collector : भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा -जिल्हाधिकारी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| भाषाविषयक नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात सर्वात समृद्धी जिल्हा असून येथे तेलगू, कन्नड, हिंदी, उर्दू, पंजाबी, इंग्रजी, बोली भाषा अशा विविध भाषा बोलल्या जातात. या विविध भाषेने समृद्ध असलेला नांदेड हा भारतातला एकमेव जिल्हा असून आपण सर्वांनी जिल्ह्यातील भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. आज नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन या विषयावर नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर तसेच वारसा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्र नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे बोलत होते. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य एम.वाय.कुलकर्णी, वै. ध...
filled with murram instead : शहापूर–कोटेकलूर रस्ता डांबराऐवजी मुरमाने बुजवू लागले खड्डे

filled with murram instead : शहापूर–कोटेकलूर रस्ता डांबराऐवजी मुरमाने बुजवू लागले खड्डे

नांदेड, महाराष्ट्र
देगलूर (गंगाधर मठवाले) शहापूर ते कोटेकलूर या रस्त्याचे उन्हाळ्यात गिट्टी-डांबर टाकून काम करण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरु होताच जागोजागी खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता मजबूत करण्यासाठी पुन्हा गिट्टी-डांबर टाकणे अपेक्षित असताना, ठेकेदाराने केवळ मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचा थातूरमातूर प्रकार सुरू केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात रस्ता बनविताना गिट्टी-डांबराचे प्रमाण अत्यल्प वापरले गेले. त्यामुळे रस्ता पूर्णपणे तयार होण्यापूर्वीच वाहनांच्या दाबामुळे डांबर उखडून रस्ता उघडा दिसू लागला. त्यावेळी पुन्हा गिट्टी-डांबर टाकून दुरुस्ती केली जाईल, असे कामगारांनी सांगितले होते. परंतु त्यानंतर कोण...
ehreek-e-Auqaf : शौकत मंगलकार्यालय चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – तहरीक ए औकाफ

ehreek-e-Auqaf : शौकत मंगलकार्यालय चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – तहरीक ए औकाफ

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/बिलोली| नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरातील ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक हजरत नवाब सरफराज खान शहीद मस्जिद दर्गाच्या हौजे ए खास विहिरीवर व परिसरात अवैध बांधकाम करून शौकत मंगल कार्यालय,शौचालय,टिनपत्राचे दुकाने उभारून संरक्षित स्मारकाचे विद्रूपीकरण करणा-या अतिक्रमण धारकावर फौजदारी गुन्हे दाखल करून अतिक्रमण निष्काशीत करण्याची मागणी तहरीक ए औकाफ संघटनेच्या वतीने अध्यक्ष शब्बीर अन्सारी नेतृत्वात शिष्यमंडळाने दि.४ सप्टेंबर रोजी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे केली आहे. मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक हजरत नवाब सरफराज खान सहाब मस्जिद दर्गा नगरखाना कब्रस्तान च्या परिसरात येथील स्थानिक भूमाफिया तथा स्वयघोषित वारसदार हे स्वतःच्या लाभापोटी राज्य संरक्षित स्मारक परिसराच विद्रूपीकरण करून शौकत मंगल कार्यालय बांधून या मंगल कार्यालयाचे शौचालयाचे बांधकाम हे राज्य संरक्षित स्मारकाच्या हौजे खास विहिर...
Justice Chandrashekhar : न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

Justice Chandrashekhar : न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली. शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. चंद्रशेखर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. शपथविधी सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, लोकायुक्त न्या. (नि.) विद्यासागर कानडे तसेच राजस्थान, झारखंड, दिल्ली, अलाहाबाद, कर्नाटक व मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश व सेवानिवृत्त न्यायाधीश उपस्थित होते. सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी न्या. चंद्रशेखर यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची ...
Pending waqf Cases : प्रलंबित वक्फ प्रकरणे तात्काळ निकाली काढा, अन्यथा चेअरमनांच्या घरांवर तीव्र आंदोलन – शब्बीर अन्सारी यांचा इशारा

Pending waqf Cases : प्रलंबित वक्फ प्रकरणे तात्काळ निकाली काढा, अन्यथा चेअरमनांच्या घरांवर तीव्र आंदोलन – शब्बीर अन्सारी यांचा इशारा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| तहरीक-ए-औकाफच्या वतीने वक्फ बोर्डाकडे ५४ प्रलंबित प्रकरणांचे निवेदन देण्यात आले होते. त्यातील सात प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन मिळूनही तब्बल सहा महिने उलटले आहेत. दुर्दैवाने एका प्रकरणाचा अपवाद वगळता उर्वरित सर्व प्रकरणांवर अद्याप धुळफेक होत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निकाल न लागल्यास वक्फ बोर्डाच्या सदस्यांच्या व चेअरमनांच्या घरांवर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तहरीक-ए-औकाफचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ ओबीसी नेते शब्बीर अन्सारी साहेब यांनी आज नांदेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. नांदेड जिल्ह्यातील हजरत दुलेशाह रहेमान दर्गाह आणि बिलोलीतील ऐतिहासिक काला पत्थर मशीद हजरत नवाब सर्फराज खान सहाब मखबरा झुजागणं नगारखाना काब्रस्तान परिसरातील भूखंडांची प्रकरणे विशेष महत्त्वाची अस...
Social responsibility : डीजे, बँड आणि महाप्रसाद रद्द करून गंभीर रुग्णाला मदतीचा हात…!

Social responsibility : डीजे, बँड आणि महाप्रसाद रद्द करून गंभीर रुग्णाला मदतीचा हात…!

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील निवघा (बाजार) येथील श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवित विसर्जन मिरवणुकीतील डीजे, बँड आणि महाप्रसाद रद्द करून संकलित झालेले 30 हजार रुपये गंभीर आजारी युवकाच्या उपचारासाठी दिले आहेत. गणेश मंडळाच्या सामाजिक दायित्वाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. हदगाव तालुक्यातील मौजे पळसा येथील विकास दिगंबर धनगरे (वय 22) हा युवक न्यूमोनिया आणि मलेरियाने ग्रस्त असून, हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. उपचाराचा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असल्याचे समजल्यानंतर निवघा (बाजार) येथील वार्ड क्र. 5 गोकुळनगर मधील श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने या वर्षी श्री गणपतीच्या विसर्जन मिरवणूक निमिताने लावलेला डी. जे. आणि बँड सोबतच महाप्रसाद रद्द करून मंडळाने न्यूमोनिया आणि मलेरियाने ग्रस्त युवकाच्या मदतीसाठी हात पुढ...
error: Content is protected !!