Thursday, May 21

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Usmannagar ; उस्माननगरमध्ये ग्रामसभा वादळी: २.५६ कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सरपंच व ग्रामसेवक निरुत्तर, संतप्त नागरिकांचा बहिष्कार

Usmannagar ; उस्माननगरमध्ये ग्रामसभा वादळी: २.५६ कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सरपंच व ग्रामसेवक निरुत्तर, संतप्त नागरिकांचा बहिष्कार

नांदेड, महाराष्ट्र
उस्माननगर,माणिक भिसे l उस्माननगर ता.कंधार येथील ग्रामपंचायतीच्या कारभारावर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा, सरपंच आणि ग्रामसेवकांच्या मौनामुळे आणि ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे चांगलीच गाजली. सुमारे दोन कोटी छप्पन्न लाख रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केल्यानंतरही अध्यक्ष व सचिवांनी मौन बाळगल्याने, 'ही ग्रामसभा होती की शोकसभा?' असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. काय आहेत गावकऱ्यांचे आरोप? - गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. बोगस कामांचे बिल: गावात सुमारे २ कोटी ५६ लाख रुपयांची कामे झाल्याचे केवळ कागदोपत्री दाखवून, प्रत्यक्षात काम न करता ती रक्कम हडप केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे. निधीचा गैरवापर:  स्वच्छतेच्या नावाखाली, दलित वस्ती सुधार योजन...
Municipal Corporation ; अनधिकृत जाहिरात होडींगवर महापालिकेची धडक कारवाई

Municipal Corporation ; अनधिकृत जाहिरात होडींगवर महापालिकेची धडक कारवाई

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l नांदेड शहरातील अनधिकृत जाहिरात होर्डीग्जचा सुळसुळाट झाल्याने महानगरपालिका आता ॲक्शन मोडवर आली असुन दि.१०.१०.२०२५ रोजी पालिकेच्या पथकाने *उपआयुक्त स.अजित पालसिंघ संधु* यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य रस्त्यावरील अनधिकृत जाहिरात होर्डीग्जवर धडक कारवाई करत तब्बल ४० अनधिकृत होर्डीग्ज काढून टाकण्यात आले आहेत. महानगरपालिकेने मनपा हद्दीमध्ये जाहिरात फलक लावण्यासाठी एकुण ११८ ठिकाण निश्चित केले असुन प्रत्येक ठिकाणी जाहीरात फलकांच्या फ्रेम लावण्यात आलेल्या असुन त्या फ्रेमची साईज सुध्दा निश्चित करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये महानगर पालिकेने निर्धारीत केलेले शुल्क भरुन नागरीकांना / स्वंयसेवी संस्थांना तात्पुरती जाहिरात लावता येते. परंतु शहरातील मुख्य रस्त्यावर विनापरवानगी जाहिरात फलक लावण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेतार्फत शहर होर्डीग्ज मुक्त करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. ...
Important decision of the sChhatrapati Sambhajinagar ; छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Important decision of the sChhatrapati Sambhajinagar ; छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर l छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या प्रशासकीय नवकल्पनांना आता राज्य शासनाने राज्यस्तरावर स्वीकार दिला आहे. महसूल विभागाच्या कामकाजातील पारदर्शकता, समन्वय आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी राज्य शासनाने अलीकडेच जारी केलेल्या निर्णयाचा पाया जिल्हाधिकारी स्वामी यांनी १५ मे २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशात आहे. महसूल प्रशासनातील नवे पर्व - १५ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी स्वामी यांनी महसूल प्रशासनातील विविध पातळ्यांवरील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी, जबाबदाऱ्यांचे स्पष्ट विभाजन करण्यासाठी आणि कामकाज अधिक शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी एक सुसंगत कार्यप्रणाली तयार केली होती. या निर्णयामुळे तालुका व मंडळ स्तरावरील फाइल व्यवहार, नोंदणी, नागरिक सेवा आणि शासकीय योजना यामध्ये कार्यक...
Poor quality Paver Blocks : राष्ट्रीय महामार्ग लगतच्या फूटपाथवर निकृष्ट दर्जाच्या पेव्हर ब्लॉकचा वापर!

Poor quality Paver Blocks : राष्ट्रीय महामार्ग लगतच्या फूटपाथवर निकृष्ट दर्जाच्या पेव्हर ब्लॉकचा वापर!

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक 161 वरील कामावर पुन्हा एकदा वादाचे सावट आले आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या कासवगतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच, आता फूटपाथवर निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल करत दोन निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक तहसीलदारांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत विशेष म्हणजे, या कामावर महामार्ग विभागाचे अधिकारी कधीही प्रत्यक्ष पाहणीस येत नाहीत, अशी स्थानिक नागरिकांचीही तक्रार आहे. परिणामी, केवळ तीन वर्षांतच माहूर–किनवट महामार्गाच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याला भेगाही पडल्या आहेत. माहूर हे तीर्थक्षेत्र असल्याने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच...
Uposhan : अँड. प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांच्या आमरण उपोषणाला ५वा दिवस

Uposhan : अँड. प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांच्या आमरण उपोषणाला ५वा दिवस

नांदेड, महाराष्ट्र
माहूर, इलियास बावानी| बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीचा दर्जा व आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अँड. प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरू आहे. किनवट-माहूर परिसरासह सर्व बंजारा समाजाकडून या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे. याआधी १२ ते १७ सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे अँड. राठोड उपोषणावर होते. त्यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून आठ दिवसात बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्याने ६ ऑक्टोबरपासून त्यांच्या मूळ गावी – निराळा तांडा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत : हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला तत्काळ अनुसूचित जमाती (ST) आरक्षण लागू ...
S. M. Deshmukh ; सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हा छोटासा प्रयत्न- एस. एम. देशमुख

S. M. Deshmukh ; सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हा छोटासा प्रयत्न- एस. एम. देशमुख

महाराष्ट्र, मुंबई
बीड l बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आणि तलावातील पाणी सोडल्याने अनेक गावांचे मोठे नुकसान झाले. याबरोबर गोदाकाठ आणि सिंदफणा काठावरील शेतकऱ्यांचे ही मोठे नुकसान झालेले आहे. अनेकांची घरे वाहून गेली. अनेकांची घरे पडली. शेतकऱ्यांची शेती निस्तनाबूत झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आला. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी, मंजरथ, डेपेगाव, सांडस चिंचोली, आळसे वाडी, गंगामसला या ठिकाणी परिषदेच्या वतीने वतीने ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख सर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त देशमुख म्हणाले की पत्रकार हा समाजाचा घटक असतो आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे आम्ही शेतकऱ्यांना म...
Chief Minister Devendra Fadnavis : स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णय आणि जबाबदार अंमलबजावणी हे महाराष्ट्राच्या विकासाचे तीन स्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णय आणि जबाबदार अंमलबजावणी हे महाराष्ट्राच्या विकासाचे तीन स्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई| राज्याच्या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीत “स्पष्ट दृष्टिकोन, जलद निर्णयप्रक्रिया आणि जबाबदार अंमलबजावणी” हे तीन महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित "ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025" च्या कार्यक्रमामध्ये क्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसारखे अनेक प्रकल्प दशके प्रलंबित होते, परंतु ‘इन्फ्रास्ट्रक्चर वॉर रूम’च्या माध्यमातून निर्णयप्रक्रिया गतिमान करण्यात आली. पूर्वी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केवळ नियोजनासाठी सहा वर्षे लागली होती. मात्र आम्ही ३७२ किमी मेट्रो नेटवर्कसाठी केवळ ११ महिन्यांत निविदा टप्प्यापर्यंत पोहोचलो, असे त्यांनी सांगितले. सन २०३० पर्यंत महाराष्ट्...
India’s journey : डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

India’s journey : डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या महासत्तेच्या प्रवासात नैसर्गिक भागीदार असलेल्या ब्रिटनची भूमिका महत्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. फिनटेकचा उपयोग सामान्य नागरिकांच्या आयुष्यात समृद्धीसाठी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताने अतिशय कुशलतेने तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजिटल व्यवहारातून सुरक्षित, शाश्वत वित्तीय व्यवस्थेचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले असल्याचे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगाला भारतासोबत भागीदारी आणि जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या जागतिक महासत्तेच्या वाटचालीत सहभागी होण्याचे आवाहन केले. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक फिनटेक महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर सहभागी झ...
Flood Victims support : हिमायतनगर फर्टिलायझर्स असोसिएशनकडून पुरग्रस्तांना आर्थिक मदत

Flood Victims support : हिमायतनगर फर्टिलायझर्स असोसिएशनकडून पुरग्रस्तांना आर्थिक मदत

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेकडो नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काहींना जीव गमवावा लागला तर अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात म्हणून हिमायतनगर तालुका सीडस्, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइडस् डीलर्स असोसिएशन तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे. असोसिएशनतर्फे ₹८३,२०० (अक्षरी – त्र्याऐंशी हजार दोनशे रुपये) इतकी रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया, मेन ब्रांच, मुंबई येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खाते क्रमांक 10972433751 मध्ये जमा करण्यात आली. या अनुषंगाने धनादेशाची प्रत व मदतीचे निवेदन तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पळशीकर, उपाध्यक्ष मारोती पाटील लुम्दे, सचिव अमोल बंडेवार, तसेच सदस्य शाम ढगे...
error: Content is protected !!