Usmannagar ; उस्माननगरमध्ये ग्रामसभा वादळी: २.५६ कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सरपंच व ग्रामसेवक निरुत्तर, संतप्त नागरिकांचा बहिष्कार
उस्माननगर,माणिक भिसे l उस्माननगर ता.कंधार येथील ग्रामपंचायतीच्या कारभारावर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा, सरपंच आणि ग्रामसेवकांच्या मौनामुळे आणि ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे चांगलीच गाजली. सुमारे दोन कोटी छप्पन्न लाख रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केल्यानंतरही अध्यक्ष व सचिवांनी मौन बाळगल्याने, 'ही ग्रामसभा होती की शोकसभा?' असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.
काय आहेत गावकऱ्यांचे आरोप? - गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. बोगस कामांचे बिल: गावात सुमारे २ कोटी ५६ लाख रुपयांची कामे झाल्याचे केवळ कागदोपत्री दाखवून, प्रत्यक्षात काम न करता ती रक्कम हडप केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
निधीचा गैरवापर: स्वच्छतेच्या नावाखाली, दलित वस्ती सुधार योजन...








