Thursday, May 21

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Divisional Commissioner : विभागीय आयुक्तांकडुन नुकसानीचे पंचनामे व मदत वाटपाचा आढावा

Divisional Commissioner : विभागीय आयुक्तांकडुन नुकसानीचे पंचनामे व मदत वाटपाचा आढावा

छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर| विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, डीबीटीद्वारे नुकसान भरपाई वाटप, केरोसीन, धान्य वाटप, वाळु धोरण अंमलबजावणी व सेवा पंधरवाडा याबाबतचा आढावा घेतला. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करा, शासनाने यापूर्वी वितरित केलेली मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याची कार्यवाही तत्परतेने करा, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात दुरदृष्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी आज जिल्हानिहाय आढावा घेतला. यावेळी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे तर बैठकस्थळी अपर आयुक्त डॉ.अनंत गव्हाणे, अपर आयुक्त श्रीमती मंजुषा मिसकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री.पापळकर म्हणाले, नैसर्गिक आपत्तीत शेतक...

‘Short-Term Employability Courses’ ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे आज ऑनलाईन उद्घाटन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन 8 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एकाच वेळी राज्यातल्या ५६० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये विश्वकर्मा कारागिरांच्या उपस्थितीत अत्याधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे, अशी माहिती कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे दिली. कामगार हा समाजाचा अविभाज्य घटक असून या घटकाचा सन्मान झाला पाहिजे हा विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला असून याच अनुषंगाने कामगारांचा सन्मान करण्यात येत असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या महत्वकांक्षी उपक्रमाचे उदघाटन होत अस...
Chhatrapati Shivaji Maharaj : सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन छत्रपती शिवरायांचा पुतळा व शाळेशेजारी दोन वाईनमार्टचे नांदेडमध्ये स्थलांतर

Chhatrapati Shivaji Maharaj : सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन छत्रपती शिवरायांचा पुतळा व शाळेशेजारी दोन वाईनमार्टचे नांदेडमध्ये स्थलांतर

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन नांदेड शहरात महापुरुषांचा पुतळा व शाळेशेजारी दोन वाईनमार्ट स्थलांतरित करित प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करित असल्याचा आरोप करुन बेकायदेशीरपणे स्थलांतरीत केलेल्या दोन्ही वाईनमार्टचे परवाने रद्द करण्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नांदेड शहर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण व सहकांऱ्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.६ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी नांदेड वाईन मार्ट,शॉप व राजकॉर्नर चैतन्य नगर येथे कमल वाईनशॉप स्थलांतर करण्यात आले आहे.त्यासाठी सर्वौच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्यात आल्याने याबाबत नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण यांनी प्रश...
Chief Minister Devendra Fadnavis : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31,628 कोटींचे पॅकेज  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 31,628 कोटींचे पॅकेज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये 29 जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त 253 तालुके आणि 2059 मंडळांमध्ये मदतीसाठी 65 मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी 31 हजार 628 कोटींच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे. जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न राहणार असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मंत्रिमंडळाच्या बै...
Maha Akrosh Road blockade : माहूरमध्ये महाआक्रोश रास्ता रोकोलां अभूतपूर्व प्रतिसाद

Maha Akrosh Road blockade : माहूरमध्ये महाआक्रोश रास्ता रोकोलां अभूतपूर्व प्रतिसाद

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी यासाठी मौजे सारखंनी येथे दी 6 रोजी तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माहूर तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन कर्त्याचे निवेदन सिंदखेड चे सपोनि रमेश जाधव यांनी स्वीकारले. किनवट माहूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सरकारचा जाहीर निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले जवळपास राष्ट्रीय महामार्गावर सारखणी येथे तीन तास रास्ता रोको करण्यात आला. एपीआय रमेश जाधवर यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन सुद्धा देण्यात आला आहे सोबतच उपोषणास बसलेले मंगेश साबळे यांचे शेतकऱ्यांसाठी जवळपास सात दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे. चे सुद्धा निवेदन तहसीलदार साहेबांना एपीआय रमेश जाधव यांच्या मार्फत दिले रस्ता रोको ला अनेक शेतकऱ्यांनी संबोधित केले शेतकऱ्याला एकर...
Union Home Minister Amit Shah – पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार  – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Union Home Minister Amit Shah – पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मुंबई, पुणे, महाराष्ट्र
शिर्डी| अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली. लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभप्रसंगी श्री. शाह बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्र...
The goal of the Sangh : समाज सुसंघटित करून भारताला परमवैभव प्राप्त करून देणे हेच संघाचे ध्येय

The goal of the Sangh : समाज सुसंघटित करून भारताला परमवैभव प्राप्त करून देणे हेच संघाचे ध्येय

नांदेड, महाराष्ट्र
हदगांव, गौतम वाठोरे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हदगाव नगराचा विजयादशमी उत्सव स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा येथे संपन्न झाला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत असून, स्वाभाविकच त्याचा उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये आहे. संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचे आणि स्वयंसेवकांच्या परिवाराचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला आहे. परंतु संघाचे कार्य अविरत अखंडपणे चालणारे आहे. मातृभूमीला परम वैभवसंपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे. संघाच्या पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन आपल्याला घडवून आणायचे आहे असे वक्तव्य उत्सवाचे प्रमुख वक्ते आत्माराम बावस्कर यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर डॉ.सौ. जयश्री पवार ( योगतज्ञ ) व श्री जगदीश तावडे ( जिल्हा कार्यवाह ) हे उपस...
Tribal community : हिमायतनगरमध्ये आरक्षण बचाव मोटारसायकल रॅली; आदिवासी समाजाचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Tribal community : हिमायतनगरमध्ये आरक्षण बचाव मोटारसायकल रॅली; आदिवासी समाजाचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर | अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील आरक्षण अबाधित ठेवावे आणि कोणत्याही इतर समाजाला ST प्रवर्गात सामील करू नये, या मुख्य मागणीसाठी हिमायतनगर शहरात आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चौकातून रॅलीला सुरुवात होऊन तहसील कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चाचे रूपांतर झाले. तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, युवक-युवती आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले. तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये खालील प्रमुख मागण्या नमूद करण्यात आल्या: बंजारा, धनगर, हटकर, बडगा, कैकाडी, वडार इ. कोणत्याही समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात सामील करू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२,५२० अधिसंख्य पदे आणि ८५,००० रिक्त पदांची त्वरित भरती करावी. २५ फेब्रुवारी २०२२ रोज...
Work with honesty : प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करा : पालकमंत्री अतुल सावे

Work with honesty : प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करा : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आज नांदेड जिल्ह्यात अनुकंपा व एमपीएससी मार्फत नियुक्त 378 उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. शासकीय सेवेत नियुक्त उमेदवारांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकतेने कार्य करुन आपल्या कुटूंबाचा अभिमान, जिल्ह्याचा गौरव आणि राज्याचा सन्मान वाढवावा, अशी अपेक्षा राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी विविध विभागात नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. आज कुसूम सभागृहात अनुकंपासह एमपीएससीच्या 21 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. उर्वरित उमेदवारांना संबंधित विभागाच्यावतीने आदेशाचे वितरण यावेळी...
Chief Minister Devendra Fadnavis : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची  माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विमानतळाला  दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य शासनाचा इरादा बदललेला नाही आणि केंद्र शासनाचा देखील वेगळा विचार नाही. असे स्पष्टपणे नमूद करून  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ' केंद्र शासनाने विमानतळ बांधकामाला परवानगी देताना ' नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' अशा नावाने पूर्वी परवानगी दिली होती, त्यामध्ये नामविस्तार होऊन आता "लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमा...
error: Content is protected !!