Wednesday, May 20

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Chief Minister Devendra Fadnavis : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यश क्रीडा क्षेत्रासाठी सुवर्णक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यश क्रीडा क्षेत्रासाठी सुवर्णक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्पोर्ट्स, मुंबई
मुंबई| उत्तराखंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. खेळाडूंची ही उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद व सुवर्णक्षण असल्याचे गौरवउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या पथकातील खेळाडूनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष तसेच महिला संघाने  अजिंक्य पद पटकावल्याबद्दल आणि तेहरान येथे झालेल्या सहाव्या महिला आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने जेतेपद पटकावल्याबद्दल  अभिनंदनचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंचे, तसेच भारतीय खो-खो संघ आणि...
Local body elections : स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या कार्यक्रमाला मुहूर्त मिळेना; २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम

Local body elections : स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या कार्यक्रमाला मुहूर्त मिळेना; २७ टक्के ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम

नांदेड, मुंबई
हिमायतनगर| स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लांबत चालल्याने कार्यकर्त्यांत मात्र कमालीची नाराजी पसरली असून, गेल्या साडेतीन वर्षा पासून या निवडणुका लटकून आहेत. २७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिका मुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा अक्षरशः खोळंबा झाला असून, आता आणखीन विलंब होणार आहे. या प्रकरणाची आता येत्या ६ मे ला थेट न्यायालयात सुनावणी होणार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या पुर्वी ही या प्रकरणाचा निकाल लागला तरी राज्यात पावसाळ्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकां होणार नाहीत. याचा मुहूर्त आता दसरा दिवाळी दरम्यानच निघू शकते. हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाचा कालावधी २० मार्च २०२१ ला स़ंपलेला आहे. तेंव्हा पासून निगरगट्ट प्रशासन नागरीकांच्या छाताडावर बसलेले आहे. व तसेच जिल्हा परिषद व पंचायत समि...
The kind-hearted king of the world of friendship: Vijay Joshi : मैत्रीच्या दुनियेचा दिलदार राजा: विजय जोशी

The kind-hearted king of the world of friendship: Vijay Joshi : मैत्रीच्या दुनियेचा दिलदार राजा: विजय जोशी

नांदेड, मुंबई, लेख
मानवी जीवनामध्ये मैत्री एक असा दागिना आहे की, संपूर्ण जगतामध्ये या दागिन्याचे महत्त्व सर्वाधिक. आणि मग समान शिले समान व्यसनेसु सख्यम या न्यायाने आपले आहार आपले विचार आपले स्वातंत्र्य आपली अभिव्यक्ती आणि आपले छंद या सर्व प्रकारातून विविध मित्रांच्या गाठीभेटी आयुष्यभर होत असतात. जन्मापासून ते या जगाचा निरोप घेईपर्यंत अनेकविध पातळीवर आपण काम करत असतो, परंतु प्रत्येक ठिकाणी आपणाला भेटणारी माणसे त्यांच्याशी आपले होणारे अनुबंध आणि त्यातून निर्माण होणारा आनंद हा नेहमी सर्व आनंदांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो! अशाप्रकारे ओळख झालेला आणि अचानक जीवनामध्ये जिवलग मित्र बनून गेलेला आमचा हर हुन्नरी कलाकार कलंदर मित्र म्हणजे पत्रकार विजय जोशी! जे सामना पेपरचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून आहेत! विशेष म्हणजे विजय जोशी या नावाचं गारुड सगळ्या मित्रांनाच असतं! विजय जोशी हा माणूस अनेक विविध पातळीवर अनेक पैलू ब...
देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही...’ असे सांगत शेती, शेतीपूरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा अकरावा अर्थंसंकल्प विधानसभेत सादर करताना व्यक्त केला. तसेच विधापरिषदेमध्ये वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजमंत्री अजित पवार यांनी वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांन...
Chief Minister Devendra Fadnavis : अद्वितीय असलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनवू –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : अद्वितीय असलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनवू –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| महाराष्ट्र हे देशात सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे. उद्योग व्यवसायापासून ते शेती, सेवा क्षेत्र व आरोग्य सुविधा यामध्ये राज्य अग्रेसर आहे. पायाभूत सुविधांचा विकास देशात सर्वाधिक महाराष्ट्रमध्येच आहे. अद्वितीय असलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनविण्याची ग्वाही देत विरोधकांनी राज्यकारभारासाठी आपल्याकडील चांगल्या सूचना देण्याची अपेक्षाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरादरम्यान व्यक्त केली. उच्चांकी सोयाबीन खरेदी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोयाबीनसाठी ४८९२ इतका हमीभाव जाहीर करण्यात आला होता. राज्य शासनाने 562 केंद्रावर सोयाबीनच्या खरेदीची व्यवस्था केली.  सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारने दोन वेळा मुदतवाढ  दिली असून तिसरी मुदतवाढही...
Balance between daily work and personal life : दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन

Balance between daily work and personal life : दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन

नांदेड, नागपूर, मुंबई, लेख
आधुनिक जगात, जिथे कामाचा ताण आणि वेगवान जीवनशैली हे सर्वसाधारण बनले आहे, तिथे दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखणे हे एक आव्हानात्मक कार्य बनले आहे. कामाच्या ठिकाणी उच्च अपेक्षा, वेळेची कमतरता आणि वाढत्या जबाबदार्‍या यामुळे अनेकांना त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे दुर्लक्ष करावे लागते. परंतु, या दोन्ही बाजूंमध्ये योग्य संतुलन नसल्यास, ताण, थकवा आणि अगदी आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून, काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखणे हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर दीर्घकालीन आनंद आणि यशासाठी देखील आवश्यक आहे. दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन राखणे आजच्या धावपळीच्या जगात खूप महत्त्वाचे आहे. कामाच्या आणि वैयक्तिक जीवनातील ताण-तणाव कमी करण्यासाठी, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हे संतुलन आवश्यक आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये, दैनंदिन कामकाज आणि व...
The grand Shiva Mahapuran : पिंपळगाव येथील गुरुवारपासून भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाला होणार सुरुवात

The grand Shiva Mahapuran : पिंपळगाव येथील गुरुवारपासून भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाला होणार सुरुवात

धार्मिक, नांदेड, मुंबई
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे पिंपळगाव येथील तीर्थक्षेत्र श्री दत्त संस्थान परीसरात दिनांक ६ मार्च ते १३ मार्च दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून, या कथा सत्संग सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण (The grand Shiva Mahapuran story and 108 Kundi Mahayagna will begin from Thursday in Pimpalgaon) झाली आहे. दररोज एक लाख ते सव्वा लाख भाविक येथे येणार असून, त्यांसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. अशी माहिती बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, आमदार बाबुराव कदम, माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी परिसराची पाहणी करून सत्संग सोहळा नियोजनाचा आढावा घेतला आहे. भव्य शिवमहापुराण कथा मंचावरून ...
Minister Aditi Tatkare : राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

Minister Aditi Tatkare : राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| बालकांना सुरक्षित, सक्षम आणि विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. राज्य बालहक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांचा सन्मान करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्यावतीने ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार संजय केळकर, आमदार मनीषा कायंदे, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग पोलीस अपर महासंचालक अश्वती दोर्जे, आयोगाचे माजी आयुक्त प्रशांत नारनवरे, आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अवर सचिव वंदना जैन, शिक्षण अधिकारी माधुरी भोसले, सदस्य ...
HSRP : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी रोखण्यासाठी ‘एचएसआरपी’अनिवार्य

HSRP : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी रोखण्यासाठी ‘एचएसआरपी’अनिवार्य

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविणे अनिवार्य आहे.    सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ०१.०४.२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार  ०१.०४.२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.  नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना  बसविण्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि. ०१ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट  बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रादेशि...
Chief Minister Devendra Fadnavis’ instructions : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Chief Minister Devendra Fadnavis’ instructions : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

नागपूर, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सन 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरण केले. मागील बैठकी...
error: Content is protected !!