Wednesday, May 20

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Prakash Abitkar ; हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी आरोग्य विभागाच्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला सहकार्य करावे : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Prakash Abitkar ; हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी आरोग्य विभागाच्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला सहकार्य करावे : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, आरोग्य
मुंबई l हत्तीरोग दुरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या औषधांचे सेवन करून हत्तीरोगापासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. आरोग्यभवन येथे आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आज हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस डॉ. नितीन अंबाडेकर सर संचालक, डॉ. बबिता कमलापूरकर मॅडम , सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग), डॉ. प्रेमचंद कांबळे सहायक संचालक, हत्तीरोग तसेच विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा संबंधित रुग्णांनी...
Eknath Shinde : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे – एकनाथ शिंदे

Eknath Shinde : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे – एकनाथ शिंदे

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नवी दिल्ली| भाषा ही आपली ओळख, अस्मिता, आणि अभिमान असून भाषा हेच आपले अस्तित्व आहे. भाषा संपली तर आपले अस्तित्वही संपेल हे लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटीबद्ध व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी केले. मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही देताना नवी दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली. राजधानीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत गेले तीन दिवस सुरू असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज सायंकाळी झाला. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री उदय सामंत, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ....
Special Train for Holi : होळी निमित लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते हजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या

Special Train for Holi : होळी निमित लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते हजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| होळी निमित होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक 01105 / 01106 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते हजूर साहिब नांदेड दरम्यान विशेष गाडीच्या दोन फेऱ्या करण्याचे ठरविले आहे. या विशेष गाड्या पुढील प्रमाणे धावतील. गाडी क्रमांक 01105 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते हजूर साहिब नांदेड: हि विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक 12 आणि 19 मार्च 2025 रोजी मध्य रात्री 00.50 वाजता सुटेल आणि ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे नांदेड येथे त्याच दिवशी रात्री 21.00 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01106 हजूर साहिब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई : हि विशेष गाडी हजूर साहिब नांदेड येथून दिनांक 12 आणि 19 मार्च, 2025 रोजी रात्री 22.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच (परभणी-लातूर-पुणे मार्गे) लोकमान्य टिळक टर्मिनस ...
Prime Minister Narendra Modi : मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Prime Minister Narendra Modi : मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नांदेड, देश विदेश, महाराष्ट्र, मुंबई
नवी दिल्ली| भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ....
Clarification of the State Board of Education : दहावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातमीसंदर्भात राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

Clarification of the State Board of Education : दहावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातमीसंदर्भात राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

करियर, नांदेड, मुंबई
मुंबई| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी इ. १० वी ची परीक्षा दि. २१/०२/२०२५ रोजी सुरू झाली आहे. सदरच्या दिवशी सकाळ सत्रात प्रथम भाषेचे पेपर होते, या पेपरच्या वेळी जालना जिल्हयातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर ता. बदनापूर जि.जालना येथील परीक्षा केंद्र कमांक ३०५० या केंद्रावर मराठी प्रथम भाषेचा पेपर फुटला असल्याबाबत व यवतमाळ जिल्हयातील महागाव व कोठारी या परीक्षा केंद्रांवर मराठी प्रथम भाषा विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलव्दारे व्हायरल झाल्याबाबत, तसेच जिल्हा परिषद प्रशाला, तळणी, ता.मंठा, जि.जालना, केंद्र क्रमांक ३४३६ या परीक्षा केंद्रासंदर्भात काही माध्यमांमधून बातम्या प्रसारित झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने सदर बातम्यांसंदर्भातील वस्तुस्थिती खालील प्रमाणे- १) जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर, ता. बदनापूर, जि. जालना येथील...
The Storyteller : द स्टोरीटेलर: कला आणि बाजार यांच्यातील संघर्ष

The Storyteller : द स्टोरीटेलर: कला आणि बाजार यांच्यातील संघर्ष

लेख, नांदेड, मनोरंजन, मुंबई
सत्यजित राय यांच्या लघुकथेवर आधारित "गल्पो बोलिये तरिणी खुरो," आनंद महादेवन यांचा चित्रपट द स्टोरीटेलर (2025) (The Storyteller: The Conflict Between Art and Market) हा खरी मेहनत आणि भांडवलदारीमधील संघर्ष याभोवती फिरतो. या चित्रपटात दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्तिमत्त्वांची कथा आहे: तारिणी बंद्योपाध्याय (परेश रावल) – एक वृद्ध बंगाली कथाकथनकार, ज्याच्या विचारांवर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे, आणि रतन गरोडिया (अदिल हुसेन) – एक श्रीमंत गुजराती व्यापारी, जो अनिद्रेमुळे अनेक वर्षांपासून झोपलेला नाही. त्यांच्या परस्परविरोधी जगांनी हे स्पष्ट केले आहे की, नफा मिळविण्याच्या हव्यासापोटी चालणाऱ्या व्यवस्थेत सर्जनशीलतेचा कसा शोषण केला जातो. हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही, तर तो प्रश्न विचारतो – कथा कोणाची असते? श्रेय कोणाला मिळते? आणि सर्जक आपल्या सृजनशीलतेच्या शोषणाविरुद्ध कसा लढतो? ‘द स्टोरीटे...
Chief Minister Devendra Fadnavis : पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| 'महालक्ष्मी सरस' हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचा साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करणार. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात उमेद मॉल तयार करणार आहोत. त्याचं बरोबर राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. सध्या राज्यात १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा, मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५” चे उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कद...
cancel the recognition of the center : सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा – कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

cancel the recognition of the center : सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा – कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते. इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून १८ मार्चपर्यंत ३,३७३ परीक्षा केंद्रावर होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च कालावधीत ५,१३० परीक्षा केंद्रावर होणार आहे. यासाठी सर्व...
Explanation of Marketing Department : सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही; पणन विभागाचे स्पष्टीकरण

Explanation of Marketing Department : सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही; पणन विभागाचे स्पष्टीकरण

कृषी, नांदेड, मुंबई
मुंबई| महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दि. १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ दि. ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती. काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणामध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याचे वृत्त प्रसृत झाले. तथापि सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने दि. ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे....
Nana Patole : शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने खिसे भरले, नॅनो युरीया व नॅनो डीएपी खरेदीत ८७ कोटींचा भ्रष्टाचार: नाना पटोले

Nana Patole : शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने खिसे भरले, नॅनो युरीया व नॅनो डीएपी खरेदीत ८७ कोटींचा भ्रष्टाचार: नाना पटोले

मुंबई, राजकीय
मुंबई| देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी च्या १५८ कोटींचा खरेदीत ८७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून कृषी विभागातील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. कृषी विभागातील घोटाळ्याचा पर्दाफाश करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एकामागोमाग एक घोटाळा उघड करत आहेत. नाना पटोले यांनी आज नॅनो युरीया व नॅनो DAP खरेदीमधील घोटाळ्याचा पर्दाफाश केला आह...
error: Content is protected !!