Thursday, May 14

मुंबई

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Water supply through 184 tankers in Marathwada : मराठवाड्यात 184 टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water supply through 184 tankers in Marathwada : मराठवाड्यात 184 टँकरद्वारे पाणीपुरवठा

नांदेड, मुंबई, लेख
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही दुप्पटीने वाढ होत आहे. मराठवाड्यात 184 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तहानलेली गावे मराठवाड्यातच नोंदली गेली आहेत. विभागीय आयुक्तालयाने यावर शिक्कामोर्तबही केले आहे. पाणीटंचाईची भीषण परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत जाणवत आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला असला तरी, टंचाई मात्र कमी झालेली नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 135 टँकरद्वारे तहानलेल्या 93 गावांत व 12 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यात मागच्या आठवड्यापर्यंत 47 टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. तर नांदेड जिल्ह्यात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची नोंद विभागीय आयुक्तालय कार्यालयात आहे. मराठवाड्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे लव...
Emergency helpline : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

Emergency helpline : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| पहलगाम, जम्मू काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक असण्याची शक्यता आहे. जर या ठिकाणी मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष - मुंबई शहर दुरध्वनी क्रमांक : 022-22664232 (फक्त मुंबई शहर जिल्ह्याकरिता) संपर्क क्रमांक : 8657106273 संपर्क क्रमांक : 7276446432 पर्यटकांसाठी आपल्कालीन मदत कक्ष 24x7 Help Desk/ Emergency Control Room for Tourists has been established at District Headquarter, DC office, Srinagar for assistance of Tourists. Contact details : A) 0194-2483651 0194-2457543 B) WhatsApp Nos. 7780805144 काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांस...
Maharashtra ; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

Maharashtra ; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

करियर, मुंबई
नवी दिल्‍ली l केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून देशभरातून एकूण 1009 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातून 90 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. अर्चित पराग डोंगरे राज्यातून प्रथम आले असून देशात 3 रा क्रमांक पटकाविला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे यांना 26वी ऑल इंडिया रँक मिळाला आहे. पहिल्या 100 मध्ये राज्यातील 7 उमेदवार आहेत. राज्यातून यशस्वी झालेले उमेदवार अर्च‍ित पराग डोंगरे (03) शिवांश सुभाष जगदाळे (26) शिवानी पांचाळ (53) अदिती संजय चौघुले (63) साई चैतन्य जाधव (68) विवेक शिंदे (93) तेजस्वी प्रसाद देशपांडे (99) दिपाली मेहतो (105) ऐश्वर्या मिलिंद जाधव (161) शिल्पा चौहान (188) कृष्णा बब्रुवान पाटील (197) गौरव गंगाधर कायंदे पाटील (250) मोक्ष दिलीप राणावत (251)प्रणव कुलकर्णी (256) अंकित केशवराव जाधव (280) आकांश धुळ (295) जयकुमा...
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा –  मंत्री पंकजा मुंडे

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, महाराष्ट्र
मुंबई| पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन दिनांक २२ एप्रिल, २०२५ ते महाराष्ट्र दिन १ मे, २०२५ या कालावधीत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात 'पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा' (पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. 'पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा' या उपक्रमांतर्गत मंत्री पंकजा मुंडे या स्वतः २२ एप्रिल रोजी मुंबईतील पवई तलाव येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले आहे. नदी, नाले, तलाव स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे श्रीमती मुंडे म्हणाल्या, 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस आहे. या दिवशी आम्ही पर्यावरण वातावरणीय बदल विभागामार्फत एक अत्यंत ...
fake cheese sellers : बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

fake cheese sellers : बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

मुंबई, क्राईम
मुंबई| बनावट पनीर किंवा चीज ऍनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे. मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले, पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ असून त्याला बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे. मात्र काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज ऍनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून येते. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या पनीर विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006, तसेच 2011 आणि 2022 मधील नियमानुसार ही कारवाई केली जाईल. अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग व डिस्प्ले नियमन) 2020 च्या नियमांनुस...
132 railway station : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट – रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव

132 railway station : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट – रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री.वैष्णव यांचे आभार मानले. या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभ...
Geeta Chiknepawad Selected ; गोल्ला गोलेवार समाजातील कु.गिता चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी साहाय्यकपदी निवड

Geeta Chiknepawad Selected ; गोल्ला गोलेवार समाजातील कु.गिता चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी साहाय्यकपदी निवड

करियर, नांदेड, मुंबई
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे अंदेगाव सारख्या छोटूशा गावातील गिता राजेश चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरळ सेवेत अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यकारी साहाय्यक पदी निवड झाली आहे. सरळ सेवा अंतर्गत घेण्यात आलेल्या या पदासाठी एकुन १८४८ जागा उपलब्ध होत्या त्यापैकी भटक्या जमाती पैकी कूमारी गिता राजेश चिकनेपवाड हीची निवड झाली आहे. कु.गिता चिकनेपवाड हिचे वडील हे आदेगांव सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हिमायतनगर व समाज संघटनेचे तालुका उपाध्यक्ष या पदावर विराजमान आहेत. आदेगाव सारख्या खेड्यातील समाज हा स्त्री शिक्षणाचा अनादर करत आसतांना त्यांनी महात्मा फुले यांचे ब्रिद वाक्य स्त्रि शिक्षणाशिवाय आपल्या परीवाराचा उद्धार होणार नाही. हे वाक्य आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले व‌ आपल्या मुलीला शिक्षण देऊ केले, कुमारी गिता हिने आपल्या शिक्षणात कूठलीच कसर न ठेवता आल...
Chief Minister Devendra Fadnavis : सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी सायबर प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी सायबर प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

क्राईम, मुंबई
 मुंबई| सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांमधील तपासात सायबर प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी शासन प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोग शाळेचे डी. बी. नगर पोलीस स्टेशन येथे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच मुंबई (मध्य) भागासाठी वरळी पोलीस स्टेशन येथील व मुंबई (पूर्व) भागासाठी गोवंडी पोलीस स्टेशन येथील सायबर प्रयोगशाळांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, अप्पर मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंह चहल, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आदींसह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिक...
Deputy Chief Minister Eknath Shinde : तृतीयपंथीयांच्या हक्कांचेही होणार संरक्षण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Deputy Chief Minister Eknath Shinde : तृतीयपंथीयांच्या हक्कांचेही होणार संरक्षण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| राज्य शासन राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे. यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना ही करण्यात आली आहे. तृतीयपंथी यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक सक्षमतेने आणि प्रभावी होण्यासाठी या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे, याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या संबंधीच्या निर्णयाची प्रत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तृतीयपंथी समुदायाच्या प्रतिनिधींना सह्याद्री अतिथीगृह येथे देण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीय समुदायाच्या शिक्षण, रोजगार आणि आरोग्य यासंदर्भातील विविध योजना राबवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे तृतीयपंथीय समुदायाला अधिक सक्षम आणि न्याय्य प्रतिनिधित्व मिळेल, तसेच त्यांचे हक्क आणि कल्याण अधिक प्रभावीपणे सु...
insurance compensation : राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई

insurance compensation : राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई

कृषी, नांदेड, मुंबई
मुंबई| राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. २८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. या अंतर्गत खरीप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ या हंगामांसाठी रु. २.८७ कोटी, खरीप २०२३ साठी रु. १८१ कोटी, रब्बी २०२३-२४ साठी रु. ६३.१४ कोटी आणि खरीप २०२४ साठी रु. २३०८ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार...
error: Content is protected !!