Wednesday, May 13

कृषी

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Cotton and soybean : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकसान भरपाई -NNL

Cotton and soybean : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकसान भरपाई -NNL

कृषी, नांदेड
मुंबई। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावीत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित आढावा व नियोजन बैठकीत श्री. मुंडे बोलत होते. या बैठकीस कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी संचालक विजयकुमार आवटे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते. सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादित) अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे 91 लाख हेक्टर वरील 83 लाख शेतकऱ्यांना 4194 कोटी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. 36 लाख शेतकऱ्यां...
25 percent advance to loss-affected farmers : नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याच्या विमा कंपनीला सूचना -NNL

25 percent advance to loss-affected farmers : नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याच्या विमा कंपनीला सूचना -NNL

कृषी, नांदेड
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे जिल्हास्तरीय समितीने आपले निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पिक विमा कंपन्यांनी 25 टक्के अग्रीम तातडीने द्यावा, अशी सूचना विमा कंपनीला करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत हंगामातील प्रतिकुल परिस्थिती अर्थात मिड सेशन ॲडव्हरसिटी अशी अधिसूचना लागू केली आहे. त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली आहे. त्यामुळे सर्व महसूल मंडळात...
Collector abhijit raut : शेतकऱ्यांनी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी -NNL

Collector abhijit raut : शेतकऱ्यांनी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| ई-पिक पाहणी तसेच सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेत प्रती शेतकरी 2 हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये ईपीक पाहणी पोर्टलवर नोंद नसणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी अपूर्ण माहिती पूर्ण करावी ई-पिक पाहणी नोंदीनुसार शेतकरी खातेदार यांच्या याद्या कृषि विभागाने गावनिहाय ठळक ठिकाणी प्रदर्शित केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कापूस /सोयाबिन पिकाची नोंद आहे मात्र ई-पिक पाहणी मध्ये त्यांचे नाव आले नाही अशा तक्रारी काही ठिकाणाहून प्राप्त झाल्या आहेत. कापूस व सोयाबिन पीक उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत यासाठी...
Cotton and soybean farmers : सन 2023 च्या खरीपातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य -NNL

Cotton and soybean farmers : सन 2023 च्या खरीपातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप/ पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यासाठी पात्र आहेत. पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रुपये तर 0.20 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रुपयांचे (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. तरी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे. या संमतीपत्रामध्ये आधारवरील असलेले नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक मराठी व इंग्रजीमध्य...
Pasha Patel : पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त – राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

Pasha Patel : पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त – राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

महाराष्ट्र, कृषी
मुंबई| जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे. १८ सप्टेंबर हा दिवस जगभरात बांबू दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित जागतिक बांबू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पद्मश्री भारत भूषण त्यागी, पद्मश्री कमल सिंग, पद्मश्री गेनाजी चौधरी, पद्मश्री सुलतान सिंग, पद्मश्री चंद्रशेखर, पद्मश्री जगदिश प्रसाद पारेख, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, प्रधान सचिव प्रवीण दराडे, दूरदर्शन निवेदिका म...
Farmers deprived of crop loans due ” बँकेच्या मुजोर व्यवस्थापनामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित -NNL

Farmers deprived of crop loans due ” बँकेच्या मुजोर व्यवस्थापनामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित -NNL

कृषी, नांदेड
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| खरीप हंगामात शेतकऱ्यांनी दिलेले प्रस्ताव धूळखात पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. येथील आयडीबिआय बँकेच्या मुजोर व्यवस्थापनामुळे शेतकरी पिक कर्जापासून वंचित असल्याने बँकेचे उबरवटे झिजत आहेत. खरीप हंगामात ग्रामीण भागातील शेतकरी खरीपाच्या पिकाची पेरणी करुन पिकांच्या देखभालीसाठी आर्थिक मदत म्हणून बँकांकाढून मिळणारे कृषी कर्ज घेतात. शेतकऱ्यांना एक एकरी प्रमाणे पिक कर्ज उपलब्ध करून खरीपाच्या पिकाची फवारणी कोळपणी, निंदणी करुन पिकाची देखभाल करतात. मात्र शेतकरी खरीपाच्या पिकाची पेरणी करुन बँकेकडे पिक कर्जाची मागणी केली असता जणू काय..? सोयाबीन खळे करायच्या वेळी हातात रक्कम मिळते की नाही...? असा सवाल शेतकऱ्यांना पडतो आहे. पिक कर्ज उपलब्ध करून देणारे अधिकारी सुट्टीवर गेल्याने त्यांच्या जागेवर अधिकारी मागवून शेतकऱ्यांना पिक कर्जाची लवकरात लवकर उपलब्धता क...
आसूड मोर्चाला यश…ई पीक पाहणी मध्ये नोंद नसलेला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार -NNL

आसूड मोर्चाला यश…ई पीक पाहणी मध्ये नोंद नसलेला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| राज्य सरकारने खरीप हंगाम २०२३ या काळातील सोयाबीन व कापूस उत्पादन शेतकऱ्यांना किमतीमध्ये घट झाल्यामुळे आर्थिक दिलासा देण्यासाठी हेक्टरी ५ हजार रुपयाची मदतीची घोषणा दि.२९ जुलै रोजी केली होती ही मदत देत असताना ई पीक पाहणी नोंद असेल त्याच शेतकऱ्याला मदत देण्यात येईल अशी जाचक अट घातली होती. त्यामुळे राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहत होते. या विषयावर गावोगावी जनजागृती करत नायगाव तालुक्यातील भूमिपुत्रांनी नायगाव तहसील कार्यालयावर दि.२२ ऑगस्ट रोजी भव्य शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा काढला होता. या मोर्चाने बैलगाडीच तहसील कार्यालयाच्या गेटला बांधली होती. या मोर्चामध्ये प्रामुख्याने ई पीक पाहणीची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्या...
देगलूर तालुक्यातील शहापूर परिसरातील शेतकर्यांचे आधारकार्ड नसल्याने अनूदान थांबले -NNL

देगलूर तालुक्यातील शहापूर परिसरातील शेतकर्यांचे आधारकार्ड नसल्याने अनूदान थांबले -NNL

नांदेड, कृषी
देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील मौजे शहापूर शहापूर येथील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी कृषी कार्यालयात कागदपत्र देऊनही अनुदान मिळत नसल्याने शासनाचे आश्वासन हवेत विरले की काय..? असा प्रश्न आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गातुन व्यक्त केला जात आहे. तर कृषी विभागाने ज्या शेतकऱ्यांनी आधार कानेकट केलं नाही त्यानी बैंक खाते आधार शी जोडुन घ्यावं तरच अनुदान मिळेल असं सांगितले आहे. शासनाने गेल्या वर्षी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपय देण्याचे आश्वासन दिले अन् दहा सप्टेंबर नंतर शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले, त्यामुळे शासनाचे अनुदान कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहेत. चार दिवस उलटून देखील रक्कम जमा न झाल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दोन हजार शेतकऱ्यांपैकी चारशे...
Ashokrao Chavan met the District Collector : खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; पीकविम्यासह शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा -NNL

Ashokrao Chavan met the District Collector : खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; पीकविम्यासह शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेत पंतप्रधान पीक विमा योजनेसह शेतकऱ्यांशी निगडीत अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली व आवश्यक ते निर्देश दिले. खा. अशोकराव चव्हाण यांनी यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी देखील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार, २०२३-२४ च्या खरिप हंगामात पीक विमा न मिळाल्याबाबत किंवा कमी भरपाई मिळाल्याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी विमाधारक शेतकऱ्यांना ३ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ती मुदत आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात आली. या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी नोंदवल्या असून, येत्या २५ सप्टेंबरपर्यंत त्यांची छाननी पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाने यावेळी सांगितले. मात्र, या कामाला अधिक गती देऊन छाननीचे काम २...
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – रयत क्रांती संघटनेची मागणी -NNL

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – रयत क्रांती संघटनेची मागणी -NNL

नांदेड, कृषी
नांदेड। जिल्ह्यात एक सप्टेंबर पासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले मूग, उडीद आणि बहरात असलेले सोयाबीन, कापुस, भाजीपाला-फळबागाचे तसेच जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे मांजरमकर यांचे नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. निवेदनात अशी म्हटले आहे की,अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे . काही ठिकाणी तर पिके पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. जमिनी खरडून गेली आहेत. पिक विमा तात्काळ लागू करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करावा. नांदेड जिल्ह्यातील दरवर्षी धरणे भरल्यामुळे परिसरातील शेतजमीन पूर्णता पाण्याखाली येते, त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते त्यासाठी सरकारने योग्...
error: Content is protected !!