HomeउमरखेडNitin Gadkari : 75 वर्षात काँग्रेसने फक्त जातीपातीचा राजकारण केलंय विकासाला प्राधान्य...

Nitin Gadkari : 75 वर्षात काँग्रेसने फक्त जातीपातीचा राजकारण केलंय विकासाला प्राधान्य दिले नाही – नितीन गडकरी यांची टीका -NNL

उमरखेड, अरविंद ओझलवार| 75 वर्षाच्या काळात काँग्रेसने ग्रामीण भागातील विकास कामाला प्राधान्य दिले नसून जातीपातीचा राजकारण केला फक्त शिक्षण संस्था वाटप करण्याचे काम केले त्यांच्या सोबतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोजगार हमी देत राहिले होते त्यामुळे काँग्रेस पक्षावर अशी वेळ आली असल्याची खणखणीत टीका उमरखेड येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली .

भाजपाचे किसनराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष माधव सुपारे , माजी आमदार उत्तमराव इंगळे, आमदार नामदेव ससाने ,अंबादास साकळे, महेंद्र मानकर, महेश काळेश्वरकर, चितांगराव कदम, आरती फुफाटे सह आदींची मंचावर उपस्थित होती . पुढे बोलताना गडकरी म्हणाले जातिवादावर निवडणूक लढविणे ही आजची परिस्थिती नाही काँग्रेस पक्ष जातीवादाचे विष पेरून राजकारण करत जात आहे. त्यांनी घराणे शाही जोपासली आहे तर देशात 75 वर्ष राज्य केले ग्रामीण भागात कधीच विकासासाठी काम केले नाही. फक्त काँग्रेस पक्षातील नेत्यांना शिक्षण संस्था वाटप करण्याचे काम केले शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. तर त्या ठिकाणी शिक्षक नव्हते दवाखाने उभे केले तर डॉक्टर न होते अशी परिस्थिती काँग्रेसने निर्माण केली होती. आत्मनिर्भर भारत बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आणि जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था या देशाला बनविण्याचे जे स्वप्न आहेत ते मतदारांचे आशीर्वादाने पूर्ण होणार आहेत .

विदर्भातील शेतकरी समृद्ध करण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायाला गती देण्यासाठी मदर डेअरी सुरू करण्यात आली आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे पाच गायी असणे गरजेचे आहेत पशुपालकांना कमी भावात पशुखाद्य दिल्यास चाळीस हजार शेतकऱ्यांची गरिबी दूर होईल आणि शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही शेतकरी आता अन्नदाता राहिला नसून तो आता ऊर्जादाता झाला आहेत बघता बघता शेतकरी इंधन दाता सुद्धा होणार आहेत प्रयोग केला तर नक्कीच शेतकऱ्यांची गरिबी दूर होईल .

येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आपल्या पिकाची पद्धत बदलावी लागेल शेतकऱ्यांनी शेतात उत्पादन वाढवायचं शिकायला पाहिजे तसेच पुढे बोलताना आपल्याला विकासाचा राजकारण करायचा आहे 60 वर्षात काँग्रेस सरकारने केले नाही ते मोदी सरकारने दहा वर्षात केले कोणतेही सरकार आली ते मूलभूत तत्वे बदलू शकणार नाही इंदिरा गांधी यांनी संविधान तोडले होते .व आज काँग्रेसची मंडळी संविधान बद्दल लोकांना भडकविण्याचा काम करीत आहे.

मुस्लिमांच्या मनात काँग्रेसने भाजपाच्या विरोधात भीती निर्माण केली
मागील दहा वर्षापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानात सर्वांसाठी वेगवेगळ्या योजना निर्माण केल्यात त्याचा फायदा सर्वांनी घेतला त्यात कधीही जातीपातीचा भेदभाव न करता एवढ्या मोठ्या योजनेत मुसलमानांना कधीच वगळले नाही तर काँग्रेस पार्टी देशाला विभाजन करीत आहेत जातीच्या नावावर राजकारण करीत आहेत तसेच या देशाचा विकास करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments