Farmers are very angry : तुटपुंजी अतिवृष्टी मदतीने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप

नांदेड/नायगाव/उमरी/धर्माबाद/बिलोली| नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे शेती पिकाबरोबर जीवितानी आणि जनावरांची हानी झाली. ७ लाख ७४ हजार ३१३ बाधित शेतकऱ्याचे ६ लाख ४८ हजार ५३३.२१ हेक्टर शेत पिकाचे नुकसान झाले आहे.

या नुकसानीच्या भरपाईसाठी दि.१८ जुलै रोजी शासन निर्णयानुसार जिल्ह्याला ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्या मदतीनुसार जिरायदार शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ८,५०० रुपये दोन हेक्‍टरपर्यंत मदत देण्यात येणार आहे. या तुटपुंजी मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष दिसत आहे. त्याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, मागच्या सरकारच्या काळात शासन निर्णय दि.०१/०१/२५ व दि.१७/११/२०२२ अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना जी मदत जिरायदार शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १३,६०० रुपये तीन हेक्टर पर्यंत मदत दिली होती त्याचप्रमाणे यावर्षी मदत देण्यात यावी आणि बळेगाव आणि बाबळी बंधारा बॅकवॉटर मुळे नायगाव, उमरी, धर्माबाद, बिलोली तालुक्यातील लाखो हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये तात्काळ देण्यात यावी आणि या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करून कायमचा मावेजा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. भगवान मनुरकर, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते धोंडीबा पवार, प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल देशमुख, गोविंद जाधव, गोविंद हिवराळे, प्रकाश सोनकांबळे, संजय जाधव इत्यादी शेतकरी उपस्थित होते

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button