Farmers are very angry : तुटपुंजी अतिवृष्टी मदतीने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप
नांदेड/नायगाव/उमरी/धर्माबाद/बिलोली| नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे शेती पिकाबरोबर जीवितानी आणि जनावरांची हानी झाली. ७ लाख ७४ हजार ३१३ बाधित शेतकऱ्याचे ६ लाख ४८ हजार ५३३.२१ हेक्टर शेत पिकाचे नुकसान झाले आहे.
या नुकसानीच्या भरपाईसाठी दि.१८ जुलै रोजी शासन निर्णयानुसार जिल्ह्याला ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्या मदतीनुसार जिरायदार शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ८,५०० रुपये दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यात येणार आहे. या तुटपुंजी मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष दिसत आहे. त्याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मागच्या सरकारच्या काळात शासन निर्णय दि.०१/०...
