Blog

Mahur ; माहूर किनवट तालुक्यात मिशन उडान राबवा

श्रीक्षेत्र माहूर l माहूर किनवट नक्षलग्रस्त तसेच डोगरी भाग संबोधल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या शेवटचा टोक म्हणून ओळखल्या जात असल्यामुळे तालुक्यातील आदिवासी बंजारा बहुल व इतर मागासवर्गीय सर्व जाती धर्मातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना “मिशन “उडान” अंतर्गत माहूर किनवट येथे रोजगार मेळावा आयोजित करून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे बाबत चे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना दिले आहे.

किनवट माहूर तालुका हे अति दुर्गम नक्षल ग्रस्त डोंगराळ भागाने ग्रासला असून, तेलंगाना सीमा लगत महाराष्ट्राचें शेवटचे टोक म्हणून ओळखला जातो.

येथील 60 ते 70 टक्के लोकांचा शेतीवर उदरनिर्वाह होत असल्यामुळे उर्वरित 30 टक्के नागरिकांचा जंगलातील तेंदू पत्ता, तोडणे. मोह फुल वेचणे, झाडांचे गोंद काढण, पळसाच्या झाडांच्या पानाचे पत्रवळी तयार करून बाजारपेठेत विक्री करून हे त्रिमाई उत्पन्न घेत असतात. व काही लोक तेलंगानात कामाचा शोधात मोलमजुरी करिता स्थलांतर करत असतात, उर्वरित काही महिने स्थानिक शेती काम करून मोलमजुरी करत राब राब राबतात व आपल्या मुला व मुलींना काबाडकष्ट करून उच्चशिक्षित शिक्षण देऊन सुद्धा शासकीय किंवा शासकिय व खाजगी नोकरी, रोजगार मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई नागरिकांना उदरनिर्वाहाची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

सर्वच सुशिक्षित बेरोजगारांना 3 मे 2025 रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कवायत मैदान येथे ” मिशन उडान ” या लक्षवेधी अभियानांतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने भव्य रोजगार मेळावा घेतला या मेळाव्यात साधारणत 11000 सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल असं नियोजन केले वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांना आमंत्रित केल्याने पहिल्या सत्रात 3500 बेरोजगार नौकरी मिळाल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. नोकरीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूपच आनंदही होता त्याच पद्धतीने मिशन उडान चा दुसरा टप्पा म्हणून किनवट माहूर येथील अति दुर्गम भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध देण्याकरिता ग्रामीण भागातून टप्पा दोन ची सुरुवात माहूर किनवट येथे रोजगार मेळावा आयोजित करून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी असे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांनी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना दिले आहे

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button