MLA Baburao Kohlikar’s demand in the session ; पीकविम्याची ५० टक्के मर्यादा जिल्हाधिकारी व 50 टक्के विमा कंपन्याकडे ठेवल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल – आमदार बाबूराव कोहळीकरांची अधिवेशनात मागणी -NNL
नागपूर/नांदेड। नांदेड जिल्ह्यातील विशेषतः हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे विमा भरूनही लाभापासून वंचित राहत आहे. सदर पीकविमा कंपन्यांवर प्रशासनाचा अंकुश नसल्याने कंपन्या आपल्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना हक्काच्या विम्याच्या लाभापासून वंचित ठेवत आहेत. त्यामुळे शेतकरी निसर्गाच्या संकटाखाली अनिखण दाबला जातो आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने यावर लक्ष केंद्रित करून पिकविम्याची मर्यादा २५ टक्क्यांवरून ५० टक्के रक्कम देण्यात लचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे ठेवायला हवा. हा निर्णय घेतला तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सत्रात हदगाव हिमायतनगर तालुक्यातील समस्या मांडताना सभागृहात केली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या सभागृहात आपली भुमिका मांडताना पुढे हदगाव विधानसभा मतदार संघा...
