नांदेडलाइफस्टाइल

Accident News : आनंदाच्या क्षणी काळाने गाठले…! IDBI बँकेच्या तरुण मॅनेजरचा अपघाती मृत्यू

हदगाव, शेख चांदपाशा| जीवनात आनंदाचे क्षण उंबरठ्यावर उभे असतानाच काळाने एक तरुण जीव गाठला. लोहा (जिल्हा नांदेड) येथे IDBI बँकेच्या शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले आशिष देशमुख( 31) यांचा आज (दि. 6 जुलै2025 सकाळी नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आशिष देशमुख हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगापूर गावचे रहिवासी होते. या पूर्वी ते हदगाव तालुक्यातील निवघा (बाजार) शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची बदली नांदेड जिल्ह्यातील लोहा शाखेत त्यांची बदली झाली होती आणि ते तेथे रुजू देखील झाले होते. रविवारी सुट्टीच्या दिवशी ते हदगावहून लोह्याकडे आपल्या घर सामानासाठी येत असताना, वारंगा ते हदगांव दरम्यान रिमझिम पावसात त्यांच्या दुचाकी स्लीप झाली.

उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर माती पसरलेली होती. त्यात पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. कौठा गावा च्या परिसरात एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, आशिष देशमुख अविवाहित होते आणि नुकतेच त्यांचे लग्न निश्चित झाले होते. त्यांच्या पाठी मागे बहीण वयोवृद्ध आजारी आई असालयाची माहीती मिळाली.

अपघातासाठी जबाबदार कोण…?
राष्ट्रीय महामार्ग क्र.361 वरील वारंगा ते महागाव दरम्यानचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. ठिक ठिकाणी उड्डाणपूलांचे अर्धवट काम, रस्त्यावर पसरलेली माती, आणि पर्यायी मार्गांची कोणतीही स्पष्ट व्यवस्था नसल्यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.

वाहनधारकांना दिशा दाखवणारे फलक, स्पीड कंट्रोल, व वेगावर बंधने याचा पूर्णपणे अभाव दिसून येत वाहनचालकांच्या जिवाशी खेळ केला जात आहे अस पाहावायास मिळत आहेया मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून अनेकांनी आपले जीव गमावले आहेत.

लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जाग कराव…!
लोकप्रतिनिधींनी या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हा राष्ट्रीय महामार्गाचे काम मंद गतीने का होत आहेत. याचा जाब विचारावा व ह्या प्रशासनाचे अधिकार्यावर जबाबदारी निश्चित करावी स्थानीय नागरिक या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेतं आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण परिवहन विभाग व रस्ता सुरक्षा समिती यांच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामुळे जनतेत प्रचंड संताप असून, त्वरित उड्डाणपूल चे काम हे काम पूर्ण करून सुरक्षेच्या. उपाय योजना राबवण्याची मागणी होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button